शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 16:02 IST

Sharad Pawar On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी वाशिम यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटक केले. याच कार्यक्रमात मोदींनी केलेल्या एका विधानावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. 

Sharad Pawar PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम दौऱ्यावर असताना काँग्रेसला लक्ष्य केले होते. बंजारा समाजाच्या कार्यक्रमात बोलताना मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला होता. पंतप्रधान मोदींनी केलेल्या विधानावर बोलताना शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, पंतप्रधान पदाची आम्हाला बदनामी करायची नाही, पण त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने त्याची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, असे पवार म्हणाले. 

मुंबई महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला शरद पवारांसह उद्धव ठाकरे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे उपस्थित होते. 

मोदींच्या विधानावर बोट, शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले, "पंतप्रधान आले आणि बंजारा संबंधीची मते त्यांनी मांडली, पोहरादेवीला. त्यांनी एक विधान असं केलं की, बंजारा समाजासाठी काँग्रेसने आणि यापूर्वीच्या सरकारने कुठेही त्यांना संधी दिली नाही. या राज्याचे ११ वर्ष मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते. ३ वर्ष सुधाकरराव नाईक होते. मनोहरराव नाईक हे मंत्रिमंडळात अनेक वर्ष होते", असे सांगत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.  

मोदींनी पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे -शरद पवार

"सगळ्या राज्याचं नेतृत्व करण्याच्या सबंधीची संधी काँग्रेसने बंजारा समाजाला दिली. त्यावर तो समाज कृतज्ञता व्यक्त करतो. आणि देशाचे पंतप्रधान, ते स्वतः येऊन सांगतात की, असं काही घडलेलं नाही. पंतप्रधान ही संस्था आहे, त्याची आम्ही बदनामी करू इच्छित नाही. पण, त्या पदावरील व्यक्तीने त्याची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, ती ठेवण्याची भूमिका सुद्धा घेतली जात नाही", अशा शब्दात शरद पवारांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या विधानाला उत्तर दिले.  

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

वाशिममध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, 'स्वातंत्र्यांनंतर काँग्रेसच्या सरकारांनी, काँग्रेसच्या धोरणांनी बंजारा समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष ज्यांनी ताब्यात घेतला त्यांचा विचार सुरुवातीपासून परदेशी राहिला. त्या लोकांनी बंजारा समाजाबद्दल नेहमी अपमानजनक वागणूक ठेवली." 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपाcongressकाँग्रेस