शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“शिवसेना संपवायची अन् राष्ट्रवादीला ताकद द्यायची हा शरद पवारांचा प्रयत्न”; माजी मंत्र्याचा आरोप

By प्रविण मरगळे | Updated: October 6, 2020 18:18 IST

Shiv Sena, NCP, Shivaji Kardile News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडत नाही, लोकांच्या भेटीगाठी घेत नाहीत असा आरोप सातत्याने विरोधी पक्ष भाजपाकडून होत असतो.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडत नाही, लोकांच्या भेटीगाठी घेत नाहीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारचे कॅप्टन आहेत, मात्र त्यांना बाहेर पडू दिलं जात नाहीशिवसेना संपवायची आणि राष्ट्रवादीला ताकद कशी मिळेल यासाठी शरद पवार प्रयत्नशील

मुंबई – राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मात्र सरकारमध्ये कायम राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो, यातच भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी खासदार शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप लावला आहे.

याबाबत शिवाजी कर्डिले म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारचे कॅप्टन आहेत, मात्र त्यांना बाहेर पडू दिलं जात नाही, मात्र शरद पवार या वयातही जिल्ह्याजिल्ह्यात फिरत असतात, त्यातून एवढाचं हेतू दिसतो शिवसेना संपवायची आणि राष्ट्रवादीला ताकद कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील राहायचं असा टोला त्यांनी लगावला आहे. कोरोना काळात बेड उपलब्ध होत नाही, ऑक्सिजन नाहीत, लाखो रुपयांचे बिल होतं, सर्व सामान्य जनता आता सरकारच्या अपयशावर बोलतेय असंही ते म्हणाले.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडत नाही, लोकांच्या भेटीगाठी घेत नाहीत असा आरोप सातत्याने विरोधी पक्ष भाजपाकडून होत असतो, सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील असंही भाजपा नेत्यांनी म्हटलं होतं, त्यावर मुख्यमंत्रीही पलटवार करतात. मी व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही जिथे पोहचत नसाल त्याठिकाणी पोहचतो, काम करतो असा चिमटा मुख्यमंत्री विरोधकांना काढतात.

केवळ सत्तेला चिटकून बसलेले सरकार अशीच या सरकारची व्याख्या  

ठाकरे सरकारला राज्यातील जनतेशी काहीही देणे घेणे नाही. केवळ सत्तेला चिटकून बसलेले सरकार अशीच या सरकारची व्याख्या आहे. सहा महिन्यांपेक्षाही अधिक काळ गेला आहे. मात्र, तरीही रुग्णांना सुविधा देण्यात हे  सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात मोठे घोटाळे झाले आहेत. गव्हाचा घोटाळा असेल, तांदळाचा घोटाळा असेल. कारण केंद्र सरकारने लोकांसाठी दिलेले अन्नधान्य पोहोच करण्याची दानतही या सरकारमध्ये राहिली नाही. या सरकारमध्ये समन्वय नाही, 'काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगले समजते, की आपण कुठेच नव्हतो. मात्र आता आपण सत्तेत आहोत. यामुळे केवळ सरकार पडू द्यायचे नाही, सरकार चालवायचे आणि सरकारमध्येच रहायचे. असेच त्यांचे काम सुरू आहे असा टोला भाजपा नेते प्रा. राम शिंदेंनी लगावला होता.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे