शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

“शिवसेना संपवायची अन् राष्ट्रवादीला ताकद द्यायची हा शरद पवारांचा प्रयत्न”; माजी मंत्र्याचा आरोप

By प्रविण मरगळे | Updated: October 6, 2020 18:18 IST

Shiv Sena, NCP, Shivaji Kardile News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडत नाही, लोकांच्या भेटीगाठी घेत नाहीत असा आरोप सातत्याने विरोधी पक्ष भाजपाकडून होत असतो.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडत नाही, लोकांच्या भेटीगाठी घेत नाहीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारचे कॅप्टन आहेत, मात्र त्यांना बाहेर पडू दिलं जात नाहीशिवसेना संपवायची आणि राष्ट्रवादीला ताकद कशी मिळेल यासाठी शरद पवार प्रयत्नशील

मुंबई – राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मात्र सरकारमध्ये कायम राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो, यातच भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी खासदार शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप लावला आहे.

याबाबत शिवाजी कर्डिले म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारचे कॅप्टन आहेत, मात्र त्यांना बाहेर पडू दिलं जात नाही, मात्र शरद पवार या वयातही जिल्ह्याजिल्ह्यात फिरत असतात, त्यातून एवढाचं हेतू दिसतो शिवसेना संपवायची आणि राष्ट्रवादीला ताकद कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील राहायचं असा टोला त्यांनी लगावला आहे. कोरोना काळात बेड उपलब्ध होत नाही, ऑक्सिजन नाहीत, लाखो रुपयांचे बिल होतं, सर्व सामान्य जनता आता सरकारच्या अपयशावर बोलतेय असंही ते म्हणाले.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडत नाही, लोकांच्या भेटीगाठी घेत नाहीत असा आरोप सातत्याने विरोधी पक्ष भाजपाकडून होत असतो, सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील असंही भाजपा नेत्यांनी म्हटलं होतं, त्यावर मुख्यमंत्रीही पलटवार करतात. मी व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही जिथे पोहचत नसाल त्याठिकाणी पोहचतो, काम करतो असा चिमटा मुख्यमंत्री विरोधकांना काढतात.

केवळ सत्तेला चिटकून बसलेले सरकार अशीच या सरकारची व्याख्या  

ठाकरे सरकारला राज्यातील जनतेशी काहीही देणे घेणे नाही. केवळ सत्तेला चिटकून बसलेले सरकार अशीच या सरकारची व्याख्या आहे. सहा महिन्यांपेक्षाही अधिक काळ गेला आहे. मात्र, तरीही रुग्णांना सुविधा देण्यात हे  सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात मोठे घोटाळे झाले आहेत. गव्हाचा घोटाळा असेल, तांदळाचा घोटाळा असेल. कारण केंद्र सरकारने लोकांसाठी दिलेले अन्नधान्य पोहोच करण्याची दानतही या सरकारमध्ये राहिली नाही. या सरकारमध्ये समन्वय नाही, 'काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगले समजते, की आपण कुठेच नव्हतो. मात्र आता आपण सत्तेत आहोत. यामुळे केवळ सरकार पडू द्यायचे नाही, सरकार चालवायचे आणि सरकारमध्येच रहायचे. असेच त्यांचे काम सुरू आहे असा टोला भाजपा नेते प्रा. राम शिंदेंनी लगावला होता.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे