शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

शरद पवार सतर्क; काँग्रेसमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी विश्वासू शिलेदारावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 07:05 IST

महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या भवितव्याची चिंता

हरीश गुप्ता नवी दिल्ली : काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत समस्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे चिंताग्रस्त आहेत. काँग्रेस हा विरोधी पक्षांतील महत्त्वाचा दुवा असून तो दुर्बळ होऊ नये म्हणून त्या पक्षातील स्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याची कामगिरी पवार यांनी आपले विश्वासू सहकारी व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपविली आहे. काँग्रेसमधील घडामोडींची खडान्खडा माहिती त्वरित द्यावी, असेही पवार यांनी पटेल यांना सांगितले आहे.

काँग्रेस पक्ष आणखी क्षीण झाला तर त्याचा परिणाम देशातील ज्या राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे आहेत, त्यांच्यावर होण्याची शक्यता आहे. तो धोका वेळीच ओळखून शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे खास जबाबदारी दिली आहे. त्यामुळेच पटेल हे मंगळवारी तातडीने मुंबईहून दिल्लीत परतले व आता दिल्लीतच तळ ठोकून आहेत.

काँग्रेसमध्ये संघटनात्मक खूप महत्त्वाचे बदल व्हायला हवेत, अशी मागणी करणारे एक पत्र त्या पक्षाच्या २३ महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची कार्यकारिणीची सोमवारी बैठक झाली होती. काँग्रेसमधील या घडामोडींबद्दल विचारलेल्या प्रश्नावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ‘लोकमत‘ला सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये आम्ही हस्तक्षेप करण्याचे काहीही कारण नाही. मात्र, महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचाही समावेश आहे. त्यामुळे अशा घडामोडींचा होणारा परिणाम लक्षात घेता सतर्क राहणे आवश्यक असते.

काँग्रेसच्या काही नेत्यांशी बोलणे झाले आहे का, असे विचारता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल त्यांनी स्मितहास्य करून उत्तर दिले की, आम्ही दररोज परस्परांशी संवाद साधत असतो. काँग्रेस ही अधिक सबळ बनावी अशी आमची इच्छा आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रामध्ये केलेला आघाडी सरकारचा प्रयोग राष्ट्रीय स्तरावरही करणे शक्य होईल. काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींबद्दल कोणतेही भाष्य करण्यास प्रफुल्ल पटेल यांनी नकार दिला. वित्तविषयक संसदीय स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आलो होतो, असेही प्रफुल्ल पटेल यांनी आवर्जून सांगितले....तर पवारांचे मत खरे ठरेल१९९९ साली काँग्रेस पक्षात जशी फूट पडली होती, तशीच स्थिती पुन्हा उद्भवल्यास ती नामी संधी असेल असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावर्षी शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. काही काँग्रेस नेते रोज खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा करीत आहेत. राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्यास पात्र नाहीत हे मत शरद पवार आधीपासून मांडत आले आहेत. काँग्रेसमध्ये तशा घडामोडी घडल्या तर पवारांचे मत खरे ठरेल असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींबाबत प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना इत्थंभूत माहिती दिली आहे, असे कळते.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी