शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

“माझा विरोध करा, एकत्र राहा, मस्जीदमधून घोषणा ”; केंद्रीय मंत्र्यांचा धक्कादायक आरोप

By प्रविण मरगळे | Updated: February 24, 2021 11:49 IST

Sanjeev Balyan News: समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचे १०-१२ कुटुंब सदस्यांनी माझ्यासोबत हुज्जत घातली, मी त्याठिकाणाहून गेल्यानंतरही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली

ठळक मुद्देआरएलडीचे ब्लॉक अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी पोहचून घोषणाबाजी केली, तेव्हा गावकऱ्यांना त्यांना तेथून पळवून लावलेया संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, कॉल डिटेल्स काढून खऱ्या गुन्हेगारांचा बुरखा फाडावाजनतेसोबत त्यांना देणंघेणं नाही, लाल किल्ल्यावरील हिंसक घटनेत यांचाच हात होता

मुजफ्फरनगर – उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगरच्या सोरम गावात मंगळवारी भाजपा आणि आरएलडी कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली, या घटनेवर बोलताना केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी दावा केलाय की, मस्जीदमधून त्यांच्याविरोधात लोकांना भडकवलं गेले, ही घटना पूर्वनियोजित होती, एका कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री सोरम येथे गेले असता त्याठिकाणी काही युवकांनी त्यांना विरोध केला, तेव्हा भाजपा कार्यकर्ते आणि युवकांमध्ये बाचाबाची झाली.

या बाचाबाचीचं रुपांतर हिंसक झटापटीत झाले, हे सगळं पूर्वनियोजित असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं, यामागे समाजवादी पार्टी आणि आरएलडीचा हात आहे. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचे १०-१२ कुटुंब सदस्यांनी माझ्यासोबत हुज्जत घातली, मी त्याठिकाणाहून गेल्यानंतरही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, माझ्याविरोधात एकजुट राहण्यासाठी मस्जीदमधून लोकांना आवाहन करण्यात आलं.

जयंत चौधरी यांच्यावर निशाणा  

मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. संजीव बालियान यांनी सांगितले की, सोमवारी राजवीर यांच्या एका कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते, त्यावेळी आरएलडीचे ब्लॉक अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी पोहचून घोषणाबाजी केली, तेव्हा गावकऱ्यांना त्यांना तेथून पळवून लावले, त्यानंतर आरएलडीचे माजी उमेदवार तिथे पोहचले, इतकचं नाही तर बालियान यांनी माजी खासदार अमीर आलम यांच्यावरही निशाणा साधला.

हे सगळं पूर्वनियोजित नाही तर काय आहे? असा प्रश्न बालियान यांनी उपस्थित केला, घटनेच्या काही मिनिटांनंतर आरएलडीचे मोठे नेते तेथे पोहचले, हे लोक लोकांमधील शांतता भंग करण्यासाठी आले होते, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, कॉल डिटेल्स काढून खऱ्या गुन्हेगारांचा बुरखा फाडावा असं बालियान यांनी म्हटलं आहे. याबाबत भाजपाचे जिल्हा प्रभारी डॉक्टर चंद्रमोहन म्हणाले की, काही लोकांनी अराजकतेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, या प्रकरणात तेच लोक दोषी आहेत जे दिल्ली आणि लखनऊ येथे बसून सोशल मीडियावर प्रगट होतात. जनतेसोबत त्यांना देणंघेणं नाही, लाल किल्ल्यावरील हिंसक घटनेत यांचाच हात होता असा थेट आरोप त्यांनी केला.  

जनतेत फूट पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न

राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांनी भाजपावर निशाणा साधत ते शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलं आहे, त्याशिवाय २६ फेब्रुवारीला ते सोरम येथे आरएलडीची महापंचायत रद्द करण्यात येत असून तेथील लोकचं ही पंचायत कधी करायची याचा निर्णय घेतील असं म्हणाले. शिवाय इंग्रजांप्रमाणे भाजपात लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे, ज्यापद्धतीने गुंडाद्वारे मारहाण केली गेली ती चुकीची आहे असं त्यांनी म्हटलं,

टॅग्स :BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी