शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

“माझा विरोध करा, एकत्र राहा, मस्जीदमधून घोषणा ”; केंद्रीय मंत्र्यांचा धक्कादायक आरोप

By प्रविण मरगळे | Updated: February 24, 2021 11:49 IST

Sanjeev Balyan News: समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचे १०-१२ कुटुंब सदस्यांनी माझ्यासोबत हुज्जत घातली, मी त्याठिकाणाहून गेल्यानंतरही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली

ठळक मुद्देआरएलडीचे ब्लॉक अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी पोहचून घोषणाबाजी केली, तेव्हा गावकऱ्यांना त्यांना तेथून पळवून लावलेया संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, कॉल डिटेल्स काढून खऱ्या गुन्हेगारांचा बुरखा फाडावाजनतेसोबत त्यांना देणंघेणं नाही, लाल किल्ल्यावरील हिंसक घटनेत यांचाच हात होता

मुजफ्फरनगर – उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगरच्या सोरम गावात मंगळवारी भाजपा आणि आरएलडी कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली, या घटनेवर बोलताना केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी दावा केलाय की, मस्जीदमधून त्यांच्याविरोधात लोकांना भडकवलं गेले, ही घटना पूर्वनियोजित होती, एका कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री सोरम येथे गेले असता त्याठिकाणी काही युवकांनी त्यांना विरोध केला, तेव्हा भाजपा कार्यकर्ते आणि युवकांमध्ये बाचाबाची झाली.

या बाचाबाचीचं रुपांतर हिंसक झटापटीत झाले, हे सगळं पूर्वनियोजित असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं, यामागे समाजवादी पार्टी आणि आरएलडीचा हात आहे. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचे १०-१२ कुटुंब सदस्यांनी माझ्यासोबत हुज्जत घातली, मी त्याठिकाणाहून गेल्यानंतरही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, माझ्याविरोधात एकजुट राहण्यासाठी मस्जीदमधून लोकांना आवाहन करण्यात आलं.

जयंत चौधरी यांच्यावर निशाणा  

मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. संजीव बालियान यांनी सांगितले की, सोमवारी राजवीर यांच्या एका कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते, त्यावेळी आरएलडीचे ब्लॉक अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी पोहचून घोषणाबाजी केली, तेव्हा गावकऱ्यांना त्यांना तेथून पळवून लावले, त्यानंतर आरएलडीचे माजी उमेदवार तिथे पोहचले, इतकचं नाही तर बालियान यांनी माजी खासदार अमीर आलम यांच्यावरही निशाणा साधला.

हे सगळं पूर्वनियोजित नाही तर काय आहे? असा प्रश्न बालियान यांनी उपस्थित केला, घटनेच्या काही मिनिटांनंतर आरएलडीचे मोठे नेते तेथे पोहचले, हे लोक लोकांमधील शांतता भंग करण्यासाठी आले होते, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, कॉल डिटेल्स काढून खऱ्या गुन्हेगारांचा बुरखा फाडावा असं बालियान यांनी म्हटलं आहे. याबाबत भाजपाचे जिल्हा प्रभारी डॉक्टर चंद्रमोहन म्हणाले की, काही लोकांनी अराजकतेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, या प्रकरणात तेच लोक दोषी आहेत जे दिल्ली आणि लखनऊ येथे बसून सोशल मीडियावर प्रगट होतात. जनतेसोबत त्यांना देणंघेणं नाही, लाल किल्ल्यावरील हिंसक घटनेत यांचाच हात होता असा थेट आरोप त्यांनी केला.  

जनतेत फूट पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न

राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांनी भाजपावर निशाणा साधत ते शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलं आहे, त्याशिवाय २६ फेब्रुवारीला ते सोरम येथे आरएलडीची महापंचायत रद्द करण्यात येत असून तेथील लोकचं ही पंचायत कधी करायची याचा निर्णय घेतील असं म्हणाले. शिवाय इंग्रजांप्रमाणे भाजपात लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे, ज्यापद्धतीने गुंडाद्वारे मारहाण केली गेली ती चुकीची आहे असं त्यांनी म्हटलं,

टॅग्स :BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी