शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Sanjay Raut: इकडे महाराष्ट्रात तांडव! तिकडे संजय राऊतांच्या घरी मेजवानी; भाजपाच्या खासदारांनाही निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 13:27 IST

Sanjay Raut arrange dinner party today: आता महाराष्ट्रातील घडत असलेल्या घडामोडी आणि केंद्रात वर्षभरापूर्वी भाजपाची साथ सोडल्याने शिवसेनेच्या खासदाराने बोलविलेल्या भोजनाला भाजपाचे खासदार जातात की नाही अशी चर्चा रंगली आहे. 

महाराष्ट्रात एकीकडे १०० कोटींच्या वसुलीप्रकरणावरून राजकारण तापलेले आहे. दुसरीकडे भाजपा या प्रकरणावरून राज्यपालांच्या भेटीपासून ते केंद्रापर्यंत आवाज उठवत आहे. या साऱ्या काळात महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या सत्तास्थापनेत मुख्य भूमिका निभावणाऱ्या संजय राऊतांनी (Sanjay raut ) दिल्लीत मोठी मेजवानी ठेवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात राऊतांच्या या डिनर डिप्लोमसीची चर्चा होऊ लागली आहे. (Uproar in Maharashtra, Shiv sena's Sanjay raut arrange Party in Delhi for Maharashtra MPs. )

राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या दिल्लीतील घरी रात्री पार्टीचे आयोजन केले आहे. महत्वाचे म्हणजे या पार्टीचे भाजपासह सर्व महाराष्ट्रातील खासदारांना निमंत्रण देण्यात आले आहे. आता महाराष्ट्रातील घडत असलेल्या घडामोडी आणि केंद्रात वर्षभरापूर्वी भाजपाची साथ सोडल्याने शिवसेनेच्या खासदाराने बोलविलेल्या भोजनाला भाजपाचे खासदार जातात की नाही अशी चर्चा रंगली आहे. 

खरेतर संजय राऊतांनी या पार्टीचे आयोजन काही दिवस आधीच केले होते. तेव्हा महाराष्ट्रात १०० कोटींची वसुली बॉम्ब फुटला नव्हता. राऊतांनी भाजपाच्या खासदारांनाही निमंत्रण दिले होते. 

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर(Prakash Javdekar) यांनी राज्यसभेत तर भाजपाचे खासदार राकेश सिंह यांनी लोकसभेत (Loksabha) हा मुद्दा उचलला होता. जावडेकर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री वसुली करतात हे साऱ्या देशाने पाहिल्याचा आरोप केला आहे. यामुळे राज्यसभेत गदारोळ उठल्याने राज्यसभेच्या सभापतींनी हे काहीही रेकॉर्डवर घेतले जाणार नसल्याचे सांगितले होते. तसेच राज्यसभा काही काळासाठी तहकूब करण्यात आली होती. या साऱ्या गदारोळावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार यांनी महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी मोठ्या काळापासून प्रयत्न सुरु आहेत. परमबीर सिंगांविरोधात काही आरोप आहेत, त्याची चौकशी होत असल्याचे सांगितले. 

खासदार नवनीत राणा यांनीदेखील मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. निलंबित झालेल्या पोलिसाला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतले? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सचिन वाझेला पोलीस दलात घेण्याची विनंती केली होती. फडणवीसांनी ती नाकारली. जेव्हा ठाकरे सरकार आले तेव्हा त्यांनी वाझेंना परत घेतल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना