शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: इकडे महाराष्ट्रात तांडव! तिकडे संजय राऊतांच्या घरी मेजवानी; भाजपाच्या खासदारांनाही निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 13:27 IST

Sanjay Raut arrange dinner party today: आता महाराष्ट्रातील घडत असलेल्या घडामोडी आणि केंद्रात वर्षभरापूर्वी भाजपाची साथ सोडल्याने शिवसेनेच्या खासदाराने बोलविलेल्या भोजनाला भाजपाचे खासदार जातात की नाही अशी चर्चा रंगली आहे. 

महाराष्ट्रात एकीकडे १०० कोटींच्या वसुलीप्रकरणावरून राजकारण तापलेले आहे. दुसरीकडे भाजपा या प्रकरणावरून राज्यपालांच्या भेटीपासून ते केंद्रापर्यंत आवाज उठवत आहे. या साऱ्या काळात महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या सत्तास्थापनेत मुख्य भूमिका निभावणाऱ्या संजय राऊतांनी (Sanjay raut ) दिल्लीत मोठी मेजवानी ठेवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात राऊतांच्या या डिनर डिप्लोमसीची चर्चा होऊ लागली आहे. (Uproar in Maharashtra, Shiv sena's Sanjay raut arrange Party in Delhi for Maharashtra MPs. )

राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या दिल्लीतील घरी रात्री पार्टीचे आयोजन केले आहे. महत्वाचे म्हणजे या पार्टीचे भाजपासह सर्व महाराष्ट्रातील खासदारांना निमंत्रण देण्यात आले आहे. आता महाराष्ट्रातील घडत असलेल्या घडामोडी आणि केंद्रात वर्षभरापूर्वी भाजपाची साथ सोडल्याने शिवसेनेच्या खासदाराने बोलविलेल्या भोजनाला भाजपाचे खासदार जातात की नाही अशी चर्चा रंगली आहे. 

खरेतर संजय राऊतांनी या पार्टीचे आयोजन काही दिवस आधीच केले होते. तेव्हा महाराष्ट्रात १०० कोटींची वसुली बॉम्ब फुटला नव्हता. राऊतांनी भाजपाच्या खासदारांनाही निमंत्रण दिले होते. 

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर(Prakash Javdekar) यांनी राज्यसभेत तर भाजपाचे खासदार राकेश सिंह यांनी लोकसभेत (Loksabha) हा मुद्दा उचलला होता. जावडेकर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री वसुली करतात हे साऱ्या देशाने पाहिल्याचा आरोप केला आहे. यामुळे राज्यसभेत गदारोळ उठल्याने राज्यसभेच्या सभापतींनी हे काहीही रेकॉर्डवर घेतले जाणार नसल्याचे सांगितले होते. तसेच राज्यसभा काही काळासाठी तहकूब करण्यात आली होती. या साऱ्या गदारोळावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार यांनी महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी मोठ्या काळापासून प्रयत्न सुरु आहेत. परमबीर सिंगांविरोधात काही आरोप आहेत, त्याची चौकशी होत असल्याचे सांगितले. 

खासदार नवनीत राणा यांनीदेखील मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. निलंबित झालेल्या पोलिसाला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतले? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सचिन वाझेला पोलीस दलात घेण्याची विनंती केली होती. फडणवीसांनी ती नाकारली. जेव्हा ठाकरे सरकार आले तेव्हा त्यांनी वाझेंना परत घेतल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना