शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Goa Election 2022: मनोहर पर्रिकरांच्या मुलाला शिवसेनेकडून तिकीट? संजय राऊतांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 13:34 IST

Goa Election 2022: गोव्यात भाजपला पर्याय म्हणून लोकं हिंदुत्ववादी पक्ष असलेल्या शिवसेनेचा विचार करतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.

मुंबई: देशातील पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये गोवा राज्याचाही समावेश असून, गोव्यात १४ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान (Goa Election 2022) होणार आहे. गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार असून, १० मार्च रोजी अन्य राज्यांबरोबर मतमोजणी होणार आहे. यातच महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यासाठी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) प्रयत्नशील आहेत. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांना, उत्पल मनोहर पर्रिकर यांना शिवसेना तिकीट देणार का, असा प्रश्न विचारण्यात आला.

गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढतायत. काँग्रेसलाही सोबत घेण्यास संजय राऊत प्रयत्न करीत आहेत. मात्र, काँग्रेसकडून अद्याप प्रतिसाद देण्यात आला नसल्याचे सांगितले जात आहेत. दादरा नगर हवेलीमध्ये आम्ही लोकसभेची निवडणूक जिंकलो. दिवंगत मोहन डेलकर यांचे कुटुंब शिवसेनेत आले आणि आम्ही संपूर्ण ताकद पणाला लावली. जर पर्रिकरांच्या कुटुंबाने हिंदुत्ववादी म्हणून शिवसेनेसोबत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच शिवसेना त्यांच्यासाठी ताकद पणाला लावेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

उत्पल पर्रिकर यांनी हिंमत दाखवायला हवी

उत्पल पर्रिकर यांनी हिंमत दाखवायला हवी. त्यांच्या वडिलांनी गोव्यात भारतीय जनता पक्षाला एक स्थान निर्माण करुन दिले. त्यांच्या वडिलांनी भारतीय जनता पक्ष गोव्यात रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच प्रतिमेवर भारतीय जनता पक्ष टिकला आहे. नाही तर तो गोव्यात आयाराम गयारामवरच होता. त्यामुळे हे उत्पल पर्रिकरांवर अवलंबून आहे की, त्यांनी काय करावे. शेवटी राजकारणात काही निर्णय हिंमतीने, धाडसाने घ्यायला लागतात. शिवसेना हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून लोक शिवसेनेचा भविष्यात विचार करतील असे मला वाटते, असेही ते म्हणाले. 

गोव्यात हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेना रहाते की भाजप?

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे जमिनीच्या वर चार हात चालतायत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते म्हणतात की, गोव्यात शिवसेनेला काय महत्व आहे, भारतीय जनता पक्षाला तरी कधी काळी लोक विचारायचे का गोव्यात? पण येणारा काळ ठरवले गोव्यात हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेना राहते की भाजप, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

दरम्यान, गोव्यामध्ये महाविकास आघाडीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही मनापासून प्रयत्न केले पण काँग्रेसच्या मनामध्ये आहे की, ते गोव्यामध्ये स्वबाळावर सत्ता आणू शकतात. त्यांनी तसे संकेत दिल्लीत दिले असतील त्यामुळे ते मागेपुढे करत आहेत. काँग्रेसने आम्हाला काही जागा दिल्या आहेत पण आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत पण शिवसेना निवडणुका लढणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत