शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

बहुभाषक मतदारांची भूमिका महत्त्वाची, उच्चभ्रूंच्या मतदानावर ठरणार गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 05:27 IST

मोदी लाटेमुळे २०१४ मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघावर भगवा फडकला.

- शेफाली परब-पंडितमोदी लाटेमुळे २०१४ मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघावर भगवा फडकला. दोन वेळा खासदार आणि केंद्रात मंत्रिपद भूषविणारे मिलिंद देवरा यांच्यासाठी हा मोठा झटका होता. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतही मुंबईत काँग्रेसची पीछेहाट झाल्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक संजय निरुपम यांच्याऐवजी देवरा यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्णय काँग्रेसने ऐन निवडणुकीच्या तोंडावर घेतला. ही प्रतिष्ठेची लढत जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष ताकदीनिशी उतरला आहे. दक्षिण मुंबईत उच्चभूंना मतदानासाठी उतरविण्याचे आव्हान पेलताना बहुभाषक मतदारांचा कौल मिळविण्यासाठी काँग्रेसने जोर लावल्याने ही लढत चुरशीची होईल. काँग्रेसच्या खास करून देवरा कुटुंबाच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारून तेथील विजयामुळे जायंट किलर ठरलेल्या अरविंद सावंत यांना यंदा जोरदार आव्हान पेलावे लागणार आहे. भाजपशी पुन्हा सूर जुळल्यामुळे शिवसेनेला यंदाही यश मिळेल, अशी खात्री आहे. मात्र, ‘शिवसेनेचा उमेदवार तुमचा नाही,’ असा प्रचार भाजपला पाठिंबा देणाऱ्या मतदारांत प्रतिस्पर्ध्यांकडून सुरू आहे नि भाजपच्या पाठबळावरच शिवसेनेच्या यशाचे गणित अवलंबून आहे. इमारतींचा पुनर्विकास, जुन्या चाळींचे प्रश्न, उच्चभ्रू मतदारांतील प्रतिमा हे मुद्दे येथे महत्त्वाचे ठरत आहेत.

>युतीचे आव्हान वाटते का?मुळीच नाही, शिवसेनेचा मुखवटा गळून पडला आहे. काही दिवसांपूर्वी ‘चौकीदार चोर है’ म्हणणारे शिवसेनेचे नेते आता ‘मैं भी चौकीदार’ म्हणू लागले आहेत. त्यांचा संधीसाधूपणा मतदारांपुढे आला आहे. या दुटप्पी धोरणामुळे येथील मराठी माणसांतही शिवसेनेविषयी प्रचंड नाराजी आहे. याचे परिणाम निवडणुकीत दिसतील. त्यामुळे यंदा युती हे अजिबात आव्हान नाही.>गुजराती-मारवाडी समाजाच्या मतांवर शिवसेना दावा करते आहे?शिवसेनेच्या धोरणांमुळे दक्षिण मुंबईतील गुजराती- मारवाडी समाज कधीच त्या पक्षाला मतदान करीत नव्हता. यापुढेही करणारही नाही. शिवसेनेचा उमेदवार त्यांचे प्रश्न सोडवू शकत नाही, याची त्यांना जाणीव आहे. मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे.>पराभवानंतरची पाच वर्षे तुम्ही मतदारसंघात कुठेच नव्हता, असा आरोप शिवसेनेकडून होत आहे, त्याबद्दल तुमचे मत काय?गेली १५ वर्षे मी दक्षिण मुंबईत काम करतो आहे. २००४ ते २०१४ या काळात खासदार असताना आणि पराभवानंतरही गेली पाच वर्षे माझे काम थांबलेले नाही. उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न, मुंबई पोर्ट ट्रस्ट, बीडीडी आणि बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचा मी सातत्याने पाठपुरावा केला. तेव्हा येथील खासदार कुठे होते? गेल्या पाच वर्षांत त्यांनी येथील जनतेचे प्रश्न का नाही सोडविले?भाजपकडून सहकार्य मिळतेय का?गेली २५ वर्षे शिवसेनेची भाजपशी युती होती. मध्यंतरीच्या काळात वैचारिक मतभेद होते. मात्र, आता तेही संपले आहेत. विकास हेच आमचे ध्येय असल्याने भाजपकडून पूर्ण सहकार्य मिळते आहे. कुठेही मतभेद अथवा नाराजी उरलेली नाही. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित काम करीत आहेत. त्यामुळे यंदाही येथे युतीचा झेंडा फडकेल, यात शंका नाही.
>गुजराती-मारवाडी मतांकडे काँग्रेसने मोर्चा वळवलाय?गुजराती, मारवाडी हे हिंंदू मतदार आहेत, तसेच ते भाजपचे पारंपरिक मतदार आहेत. त्यामुळे काँग्रेसने कितीही उड्या मारल्या, तरी त्याचा काही उपयोग नाही. उलट आम्ही यावेळी मुस्लीम मतेही मिळवू. काँग्रेसने कितीही प्रचार केला, मतदारांना प्रलोभने दाखविली, तरी ही बहुभाषक मते आम्हालाच मिळतील.>तुम्ही काही कामे केली नाहीत, असा आरोप काँग्रेसकडून होतो आहे? काँग्रेसकडे आता बोलण्यासारखे काहीच उरलेले नाही. माझ्या कार्यकाळात मुंबईतील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचे काम सुरू झाले. बीडीडी चाळीच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागला. मतदारसंघात ६१ कोटींचा निधी मी आणला. या निधीच्या माध्यमातून प्रसाधनगृह, रस्ते डांबरीकरण अशा कामांबरोबरच अत्याधुनिक कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका जे. जे. रुग्णालयाला देण्यात आली. अशी खूप कामे मी केली आहेत.

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019mumbai-south-pcमुंबई दक्षिण