शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

Bihar Election 2020 : "10 लाख नोकऱ्यांसाठी बजेट कमी पडले तर मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचे पगार कापले जातील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 11:56 IST

Bihar Election 2020 Tejashwi Yadav And Nitish Kumar : 10 लाख नोकऱ्या देण्याचं आरजेडीचं आश्वासन हे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे असं नितीश कुमार यांनी म्हटलं होतं त्याला आता तेजस्वी यांनी उत्तर दिलं आहे. 

नवी दिल्ली - भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध राष्ट्रीय जनता दल यांच्यातील ‘काँटे की टक्कर’ यामुळे सगळ्या देशाचे लक्ष बिहारकडे लागलेले असले तरी तब्बल 56 जागांवर पोटनिवडणुकीसाठी 11 राज्यांमध्ये मतदान होणार आहे. याच दरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. 10 लाख नोकऱ्या देण्याचं आरजेडीचं आश्वासन हे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे असं नितीश कुमार यांनी म्हटलं होतं त्याला आता तेजस्वी यांनी उत्तर दिलं आहे. 

10 लाख नोकऱ्यांसाठी 1 लाख 44 हजार कोटींची आवश्यकता आहे. एवढा निधी कुठून आणणार? असा सवाल नितीश कुमार यांनी विचारला आहे. त्यांच्या या प्रश्नावर तेजस्वी यांनी "10 लाख नोकऱ्यांसाठी बजेट कमी पडले तर मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचे पगार कापले जातील" असं म्हणत आता पलटवार केला आहे. "सरकाऱ्याच्या बजेटमधील 80 हजार कोटी रुपये खर्च होत नाहीत. यानंतरही 10 लाख तरुणांना नोकरी उपलब्ध देण्यासाठी निधीची कमतरता असेल तर मुख्यमंत्री, मंत्री आणि सर्व आमदारांचे पगार कापले जातील" असं तेजस्वी यादव य़ांनी म्हटलं आहे. 

"सत्तेत आल्यास पाच लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज माफ केले जाईल"

तेजस्वी यांनीही शिक्षण कर्ज माफ करण्याचीही घोषणा केली आहे. सत्तेत आल्यास पाच लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज माफ केले जाईल. याशिवाय दोन नवीन विद्यापीठांची स्थापन करण्याची घोषणा देखील तेजस्वी यादव यांनी केली आहे. बेगुसरायमध्ये राष्ट्रकवी दिनकर आणि मिथिलांचलमध्ये जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या नावावर विद्यापीठ स्थापन केले जाईल असं तेजस्वी यांनी म्हटलं आहे. आरजेडीची आश्वासनं ही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. अर्थसंकल्पात यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, असं मुख्यमंत्री नितीश कुमार याआधी म्हणाले आहेत. 

"नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले..."; तेजस्वी यादवांचा सणसणीत टोला

10 लाख नोकऱ्या देण्याची भाषा करत आहेत. त्यांच्या 15 वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात संयुक्त बिहारमध्ये फक्त 95 हजार नोकर्‍या देण्यात आल्या होत्या असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना याआधीही सणसणीत टोला लगावला आहे. "नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले आहेत. त्यामुळे ते माझ्याबाबतीत जे काही बोलतील ते माझ्यासाठी आशीर्वादाप्रमाणेच आहेत" असं म्हणत तेजस्वी यादव यांनी निशाणा साधला. तेजस्वी यादव यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. "नितीश कुमार यांनी माझ्याबाबत कोणतेही अपशब्द उच्चारले तरी माझ्यासाठी तो आशीर्वाद आहे. नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले आहेत. त्यामुळे जे मन करेल किंवा ते काहीही बोलले तरी त्यांची प्रत्येक गोष्ट मी आशीर्वाद म्हणून घेतो. यावेळी बिहारने ठरवलं आहे. रोटी-रोजगार आणि विकासाच्याच मुद्दयावर निवडणुका पार पडणार" असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं होतं. 

"रोजगारासाठी नाही तर हौस पूर्ण करण्यासाठी बिहारमधील लोक मुंबई-दिल्लीला जातात"

जेडीयूचे आमदार आणि सध्या उमेदवार असलेले शशि भूषण हजारी यांनी बिहारच्या जनतेबद्दल एक विधान केलं असून सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. "रोजगारासाठी नाही तर हौस पूर्ण करण्यासाठी बिहारमधील लोक हे मुंबई-दिल्लीला जातात" असं शशि भूषण हजारी यांनी म्हटलं आहे. "माझ्या मतदारसंघामध्ये दरवर्षी पुराची समस्या असते. मात्र येथील लोक कामाच्या शोधात इतर राज्यामध्ये जात नाहीत" असा दावा हजारी यांनी केला आहे. मात्र बिहारमधील काही ठिकाणचे लोक हे फक्त हौस म्हणून राज्याबाहेर जातात असं हजारी यांनी व्हिडीओमध्ये म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावरून निशाणा साधला आहे. दुसऱ्या राज्यांमध्ये रोजगाराच्या शोधात जाणाऱ्या बिहारी मजुरांऐवढेच पैसे गावातील मजुरांना मिळतात असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारElectionनिवडणूकTejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमार