शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राखीव मतदारसंघात प्रस्थापितांचीच झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 04:13 IST

शिर्डी मतदारसंघातील मागील दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या लाटांवर झाल्या.

- शिवाजी पवारशिर्डी मतदारसंघातील मागील दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या लाटांवर झाल्या. यंदा मात्र कोणतीही लाट नसताना स्थानिक प्रश्नांवर निवडणूक होत आहे. उमेदवारांच्या पात्रतेवर व कामावर प्रचारात चर्चा होत आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्यातच एकप्रकारे लढाई आहे.२००९ मध्ये अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत रिपाइं नेते रामदास आठवले यांना नकारात्मक प्रचारामुळे धक्कादायकरीत्या पराभूत व्हावे लागले. मागील खेपेला शिवसेनेचे सदाशिव लोखंडे मोदी लाटेवर अवघ्या तेरा दिवसांमध्ये खासदार झाले. मात्र नंतर ते मतदारसंघात फिरकलेच नाहीत, असा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामांना दिलेली चालना, मंजूर केलेल्या आठ कृषी उत्पादक कंपन्या तसेच पासपोर्ट कार्यालय या केलेल्या कामांचा ते दाखला देत आहेत.काँग्रेस उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या उमेदवारीसाठी प्रारंभी राधाकृष्ण विखे यांनीच प्रयत्न केले. मात्र, विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांना अहमदनगरची जागा राष्टÑवादीने न सोडल्यामुळे विखे यांनी कॉंग्रेसमधून अंगच काढल्यासारखे आहे. सुजय यांनी ‘मातोश्री’वर जात लोखंडे यांना मदत करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे हेही लोखंडेंसोबत राहतील. थोरात यांनी कांबळे यांना पहिल्याच यादीत उमेदवारी मिळवून देत विखेंची कोंडी करुन टाकली. कांबळेंसाठी त्यांनी कंबर कसली आहे. शिर्डी मतदारसंघ कॉंग्रेसने जिंकला तर त्याचे श्रेय थोरात यांना जाईल हे विखे ओळखून आहेत. त्यामुळे विखे लोखंडेंसाठी तर थोरात कांबळे यांच्यासाठी जोर लावत आहेत.दिवंगत पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या गैरहजेरीत प्रथमच ही निवडणूक होत आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांची कसोटी आहे. भाजपचे बंडखोर भाऊसाहेब वाकचौरे, वंचित आघाडीचे संजय सुखदान व भाकपचे कॉ. बन्सी सातपुते हे रिंगणात आहेत. ते किती प्रभावी ठरणार यावर गणिते अवलंबून आहेत.निळवंडेच्या कालव्यांना चालना, वैद्यकीय सुविधा केंद्र, आठ कृषी उत्पादक कंपन्या सुरू केल्या. महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य तसेच संत रोहिदास कौशल्य विकास कार्यक्रमातून रोजगार निर्मितीचा प्रयत्न आहे. पुढील पाच वर्षात पाणी हाच आमचा अजेंडा राहील.-खा. सदाशिव लोखंडे, शिवसेना>आपण सर्वसामान्य कुटुंबातील असून जनतेची सेवा करणे व त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम सातत्याने करीत आलो. नगरसेवक पदापासूनचा अनुभव पाठिशी आहे. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे. आपण स्थानिक व सतत जनतेला उपलब्ध आहोत. यावेळी येथे कॉंग्रेसच जिंकणार.-आ.भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसकळीचे मुद्देग्रामीण मतदारसंघ व साखर कारखानदारीवर अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने पाण्याचा मुद्दा कळीचा बनला आहे.लोकसंपर्काचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. लोकांच्या सुख दु:खात सहभागी होण्याचे व नेहमी उपलब्ध राहण्याचे आश्वासन दिले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Sadashiv Lokhandeसदाशिव लोखंडेshirdi-pcशिर्डी