शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

राखीव मतदारसंघात प्रस्थापितांचीच झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 04:13 IST

शिर्डी मतदारसंघातील मागील दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या लाटांवर झाल्या.

- शिवाजी पवारशिर्डी मतदारसंघातील मागील दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या लाटांवर झाल्या. यंदा मात्र कोणतीही लाट नसताना स्थानिक प्रश्नांवर निवडणूक होत आहे. उमेदवारांच्या पात्रतेवर व कामावर प्रचारात चर्चा होत आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्यातच एकप्रकारे लढाई आहे.२००९ मध्ये अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत रिपाइं नेते रामदास आठवले यांना नकारात्मक प्रचारामुळे धक्कादायकरीत्या पराभूत व्हावे लागले. मागील खेपेला शिवसेनेचे सदाशिव लोखंडे मोदी लाटेवर अवघ्या तेरा दिवसांमध्ये खासदार झाले. मात्र नंतर ते मतदारसंघात फिरकलेच नाहीत, असा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामांना दिलेली चालना, मंजूर केलेल्या आठ कृषी उत्पादक कंपन्या तसेच पासपोर्ट कार्यालय या केलेल्या कामांचा ते दाखला देत आहेत.काँग्रेस उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या उमेदवारीसाठी प्रारंभी राधाकृष्ण विखे यांनीच प्रयत्न केले. मात्र, विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांना अहमदनगरची जागा राष्टÑवादीने न सोडल्यामुळे विखे यांनी कॉंग्रेसमधून अंगच काढल्यासारखे आहे. सुजय यांनी ‘मातोश्री’वर जात लोखंडे यांना मदत करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे हेही लोखंडेंसोबत राहतील. थोरात यांनी कांबळे यांना पहिल्याच यादीत उमेदवारी मिळवून देत विखेंची कोंडी करुन टाकली. कांबळेंसाठी त्यांनी कंबर कसली आहे. शिर्डी मतदारसंघ कॉंग्रेसने जिंकला तर त्याचे श्रेय थोरात यांना जाईल हे विखे ओळखून आहेत. त्यामुळे विखे लोखंडेंसाठी तर थोरात कांबळे यांच्यासाठी जोर लावत आहेत.दिवंगत पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या गैरहजेरीत प्रथमच ही निवडणूक होत आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांची कसोटी आहे. भाजपचे बंडखोर भाऊसाहेब वाकचौरे, वंचित आघाडीचे संजय सुखदान व भाकपचे कॉ. बन्सी सातपुते हे रिंगणात आहेत. ते किती प्रभावी ठरणार यावर गणिते अवलंबून आहेत.निळवंडेच्या कालव्यांना चालना, वैद्यकीय सुविधा केंद्र, आठ कृषी उत्पादक कंपन्या सुरू केल्या. महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य तसेच संत रोहिदास कौशल्य विकास कार्यक्रमातून रोजगार निर्मितीचा प्रयत्न आहे. पुढील पाच वर्षात पाणी हाच आमचा अजेंडा राहील.-खा. सदाशिव लोखंडे, शिवसेना>आपण सर्वसामान्य कुटुंबातील असून जनतेची सेवा करणे व त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम सातत्याने करीत आलो. नगरसेवक पदापासूनचा अनुभव पाठिशी आहे. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे. आपण स्थानिक व सतत जनतेला उपलब्ध आहोत. यावेळी येथे कॉंग्रेसच जिंकणार.-आ.भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसकळीचे मुद्देग्रामीण मतदारसंघ व साखर कारखानदारीवर अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने पाण्याचा मुद्दा कळीचा बनला आहे.लोकसंपर्काचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. लोकांच्या सुख दु:खात सहभागी होण्याचे व नेहमी उपलब्ध राहण्याचे आश्वासन दिले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Sadashiv Lokhandeसदाशिव लोखंडेshirdi-pcशिर्डी