शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारमध्ये लवकरच मोठ्या फेरबदलांची शक्यता; दोन मंत्र्यांना डच्चू, एकाला प्रमोशन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 20:20 IST

कामगिरी समाधानकारक नसल्यानं लवकरच दोन मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली/मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाचा जम्बो विस्तार झाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळातही लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. दोन मंत्र्यांना नारळ दिला जाणार असून एका राज्यमंत्र्याला प्रमोशन मिळणार आहे. कामगिरीच्या आधारे हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या याबद्दल दिल्लीतील काँग्रेसच्या वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं येत्या काही दिवसांत काँग्रेसकडून याबद्दलचे निर्णय घेतले जातील.

आदिवासी भागातील मंत्री असलेल्या एका नेत्याबद्दल पक्षात पक्षातच नाराजी आहे. या मंत्र्याच्या तक्रारी थेट दिल्लीपर्यंत गेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील या नेत्याला लवकरच नारळ दिला जाऊ शकतो. या मंत्र्याच्या कामाबद्दल तीव्र नाराजी आहे. मंत्री महोदय राष्ट्रवादीच्या अधीन राहून काम करतात की काय, अशी चर्चा त्यांच्याच पक्षात सुरू आहे. त्यामुळे लवकरच त्यांची गच्छंती होऊ शकते. तर मुंबईतील एका मंत्र्यालादेखील डच्चू दिला जाणार आहे. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

ग्रामीण भागातील एक आणि मुंबईतील एक अशा दोन मंत्र्यांना काँग्रेसकडून नारळ दिला जाऊ शकतो. कामगिरीच्या निकषावर दिल्लीतून याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. तर एका राज्यमंत्र्याला बढती मिळणार आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकेल. पक्षातील संतुलन विचार घेऊन लवकरच याबद्दलचा निर्णय होईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. मात्र काँग्रेस नेतृत्व याबद्दल फारसं अनुकूल नाही. नानांकडे सध्या पक्षवाढीची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी त्यासाठी पूर्णवेळ काम करावं, अशी नेतृत्त्वाची इच्छा आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे