शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

ठाकरे सरकारमध्ये लवकरच मोठ्या फेरबदलांची शक्यता; दोन मंत्र्यांना डच्चू, एकाला प्रमोशन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 20:20 IST

कामगिरी समाधानकारक नसल्यानं लवकरच दोन मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली/मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाचा जम्बो विस्तार झाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळातही लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. दोन मंत्र्यांना नारळ दिला जाणार असून एका राज्यमंत्र्याला प्रमोशन मिळणार आहे. कामगिरीच्या आधारे हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या याबद्दल दिल्लीतील काँग्रेसच्या वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं येत्या काही दिवसांत काँग्रेसकडून याबद्दलचे निर्णय घेतले जातील.

आदिवासी भागातील मंत्री असलेल्या एका नेत्याबद्दल पक्षात पक्षातच नाराजी आहे. या मंत्र्याच्या तक्रारी थेट दिल्लीपर्यंत गेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील या नेत्याला लवकरच नारळ दिला जाऊ शकतो. या मंत्र्याच्या कामाबद्दल तीव्र नाराजी आहे. मंत्री महोदय राष्ट्रवादीच्या अधीन राहून काम करतात की काय, अशी चर्चा त्यांच्याच पक्षात सुरू आहे. त्यामुळे लवकरच त्यांची गच्छंती होऊ शकते. तर मुंबईतील एका मंत्र्यालादेखील डच्चू दिला जाणार आहे. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

ग्रामीण भागातील एक आणि मुंबईतील एक अशा दोन मंत्र्यांना काँग्रेसकडून नारळ दिला जाऊ शकतो. कामगिरीच्या निकषावर दिल्लीतून याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. तर एका राज्यमंत्र्याला बढती मिळणार आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकेल. पक्षातील संतुलन विचार घेऊन लवकरच याबद्दलचा निर्णय होईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. मात्र काँग्रेस नेतृत्व याबद्दल फारसं अनुकूल नाही. नानांकडे सध्या पक्षवाढीची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी त्यासाठी पूर्णवेळ काम करावं, अशी नेतृत्त्वाची इच्छा आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे