शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

Chandrakant Patil: राज्यपालांचे वय झालंय मग पवारांचं वय झालं नाही का?; भाजपाची शरद पवारांवर खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 19:26 IST

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यात शरद पवारांवर निशाणा साधला. 

कोल्हापूर – राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या निवडीवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. हायकोर्टानं १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली होती. त्यावरून भाजपाने पवारांना खरमरीत टोला लगावला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यात शरद पवारांवर निशाणा साधला. चंद्रकांतदादा म्हणाले की, शरद पवारांचे भाषण ऐकून मती गुंग झाल्यासारखं आहे. खोटं बोला पण रेटून बोला याची प्रचिती आज आली. माझं आव्हान आहे मंत्रालयात सगळ्या प्रमुख पक्षाच्या नेत्यांना बोलवा आणि काय खरं, खोटं एकदाच होऊन द्या. देवेंद्र फडणवीसांनी हायकोर्टात जे मराठा आरक्षण टिकवले ते सुप्रीम कोर्टात टिकवणं तुम्हाला का जमलं नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तसेच गावोगावी राष्ट्रवादी खोट्या सभा घेणार असेल तर त्यांच्यामागे आम्हीदेखील पोलखोल सभा घेत त्यांच्या खोटेपणाचा बुरखा फाडणार आहे. मराठा आरक्षण अंगावर शेकलं म्हणून शरद पवार(Sharad Pawar) आता पुढे येऊन खोटं बोलत आहेत. ५० टक्क्यांवर आरक्षण देता येत नाही असं सांगता केंद्रात तुम्ही सत्तेत असताना झोपा काढत होता का? तुम्ही ज्या ज्या गावांत सभा घेणार म्हणता, खोटं सांगणार तिथे भाजपा तुमची पोलखोल करणारी सभा घेणार आहे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

तसेच राज्यपालांचे वय झालंय आणि पवारांचे वय झालं नाही का? त्यामुळे शरद पवारांनी वयावर बोलू नये. राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही हे न्यायालयानं म्हटलं आहे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहे. परंतु ते निर्णय ठराविक काळातच घ्यावेत असा कुठेही कायदा नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हणत शरद पवारांवर खरमरीत टीका केली आहे.

शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका  

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने बैठक घेऊन घटनादुरूस्ती करून SEBC ( Socio- Economically Backward Class) ची ओळख पटवणे व तसा दर्जा देणे याचे अधिकार राज्य सरकारांना देण्याबाबत निर्णय घेतला आहे. बहुतांश राज्यांनी कमाल ५०% आरक्षण मर्यादा यापूर्वीच पार केली आहे. या राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने दि. ५ मे २०२१ रोजी दिलेल्या निकालातील भौगोलिक कसोटी,सामाजिक कसोटीचे निकष पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे राज्यांना ५०% कमाल आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याचे अधिकार देणे ही फसवणूक आहे. केंद्रसरकारने यापूर्वीच राज्यघटनेमध्ये १०३वी घटना दुरूस्ती करून १५(६) व १६(६) ही कलमे दाखल करून आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी १०% वाढीव आरक्षण दिले आहे व इंद्रा साहनी केस प्रकरणातील ५० टक्के मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे घटनादुरुस्ती हाच एक पर्याय शिल्लक राहतो असं त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी