शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Adhiveshan: 31 जुलैपर्यंत MPSC मधील सदस्यांची भरती, नोकर भरती नाही; घोषणेची फडणवीसांकडून 'पोलखोल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 14:09 IST

Vidhan Sabha Adhiveshan: देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. यानंतर अजित पवारांनी ही घोषणा केली होती.

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादग्रस्त ठरला आहे. अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. याचबरोबर स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरूनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. यावर अजित पवार (Ajit pawar) यांनी ३१ जुलै पर्यंत एमपीएससीमधील रिक्त जागा (MPSC recruitment announcement) भरण्याची घोषणा केली होती. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही फसवी घोषणा असल्याचा आरोप केला आहे. (Devendra Fadanvis told about what exact Ajit pawar told about MPSC recruitment till 31 july, 2021.)

Vidhan Sabha Adhiveshan: स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या; सुधीर मुनगंटीवार यांची सभागृहात मागणी

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. राज्य सरकार MPSC बाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशावेळी सरकार आणि आयोग नेमकं काय करतंय? असा सवाल फडणवीसांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीसांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलै २०२१ प्रयंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा अधिवेशनात केली. 

Vidhan Sabha Adhiveshan: स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या; सुधीर मुनगंटीवार यांची सभागृहात मागणी

मात्र, ओबीसी आरक्षणावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. यावेळी फडणवीसांनी विधानसभेच्या बाहेर येत अजित पवारांनी केलेल्या घोषणेवर गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांनी जी ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीतील रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केली आहे ती म्हणजे परिक्षा दिलेल्या उमेदवारांची भरती नव्हे, तर संस्थेत रिक्त असलेली पदे भरण्याची असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. एमपीएससी संस्थेमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी मुदत कशाला लागते, ती कधीही भरता येतात, असा आरोप करत ही फसवी घोषणा असल्याचे फडणवीस म्हणाले.

Vidhan Sabha Adhiveshan: ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार; अजित पवारांची मोठी घोषणा

तसेच ओबीसींच्या इम्पेरिकल डेटावर देखील त्यांनी आक्षेप घेतले. हा पॉलिटिकल इम्पेरिकल डेटा राज्याने तयार करायचा असतो, केंद्राने नाही. मग केंद्राकडून मागण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्याची दिशाभूल कशासाठी असे देखील फडणवीस यांनी विचारले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMPSC examएमपीएससी परीक्षा