शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकरांना पक्षात मिळणार मोठी जबाबदारी, लवकरच होणार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 22:24 IST

Ravi Shankar Prasad and Prakash Javadekar: मंत्रिमंडळातून बाहेर गेल्यानंतर आता पक्षातील ज्येष्ठ नेते असलेल्या रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना लवकरच पक्षामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाणार आहे.

नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील विस्तारापूर्वी रविशंकर प्रसाद, हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर यांच्यासह १२ मंत्र्यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिला होता. दरम्यान, मंत्रिमंडळातून बाहेर गेल्यानंतर आता पक्षातील ज्येष्ठ नेते असलेल्या रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना लवकरच पक्षामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाणार आहे. दोन्ही वरिष्ठ नेत्यांना पक्षामध्ये राष्ट्रीय सरचिटणीस किंवा राष्ट्रीय उपाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काळात निवडणुका होत असलेल्या राज्यांचे प्रभारीपद या नेत्यांकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, रमेश पोखरियाल निशंक आणि हर्षवर्धन यांच्यासह राही अन्य नेत्यांचा पक्षाच्या संघटनेमध्ये समावेश करून त्यांना या राज्यांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाऊ शकते. रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी आधीही पक्षसंघटनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. निशंक उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. तर हर्षवर्धन यांनी भाजपाच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. ७ जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलांमध्ये भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अन्नपूर्णा देवी यांच्यासह पक्षसंघटनेत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या पाच नेत्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. भाजपामध्ये एक व्यक्ती एक पद धोरण लागू आहे. त्यामुळे सरकारमध्ये सहभागी करण्यात आलेल्या नेत्यांच्या जागी संघटनेमध्ये नव्या लोकांना जबाबदारी दिली जाऊ शकते. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासह मंत्रिमंडळातून नारळ देण्यात आलेल्या अन्य नेत्यांनाही पक्षसंघटनेमध्ये महत्त्वाची भूमिका दिली जाऊ शकते.  

टॅग्स :BJPभाजपाRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादPrakash Javadekarप्रकाश जावडेकरPoliticsराजकारण