शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करायला कोणी सांगितले?; राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 06:09 IST

अहवालात जे सांगितले आहे, तसे काहीही घडलेले नाही, ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या वेगवेगळ्या ठिकाणी, परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर ‘एनआयए’कडून माहिती येणे बंद झाले - जयंत पाटील

मुंबई : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केले आणि जो अहवाल दिला, त्यात दर्शविल्याप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्याच नाहीत. मात्र, शुक्ला यांना फोन टॅपिंगचे अधिकार कोणी दिले? त्यांनी कोणाची परवानगी घेतली होती का? त्यांना असे करायला कोणी सांगितले? या बाबी जास्त गंभीर आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. 

आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांचे पत्र माध्यमांमध्ये आल्यापासून ‘एनआयए’कडून माहिती बाहेर येणे कमी झाले आहे, असा टोला लगावत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांत कसलेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीत जिलेटिन सापडल्याचा तपास सुरू असताना, त्या विषयाला बगल देण्यासाठी फडणवीस असे वेगवेगळे विषय पुढे आणत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. 

पाटील म्हणाले, शुक्ला यांच्या अहवालात संदीप बिष्णोई यांची बदली नवी मुंबईला होईल, असे लिहिले आहे; पण त्यांची बदली रेल्वेत झाली. विनय कुमार चौबे यांची बदली पुण्याला होणार आहे, असे लिहिले आहे. मात्र, ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागात झाली आहे. संजय कुमार ठाण्याला आयुक्त म्हणून जातील, असे लिहिले होते, त्यांची बदली झालेलीच नाही. त्यामुळे त्या अहवालात जे सांगितले आहे, तसे काहीही घडलेले नाही. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिन ठेवल्याचे आढळले. नंतर मनसुख हिरेनची हत्या झाली. एटीएसचा तपास अंतिम टप्प्यात असताना एनआयएचे पत्र आले. आम्हाला चौकशी थांबवण्यास सांगण्यात आले. केंद्राच्या या एजन्सीने लवकरात लवकर चौकशी करावी. आमची चौकशी अंतिम टप्प्यात आलेली असताना ती थांबवण्यात आली आहे, हे आम्ही केंद्राच्या निदर्शनास आणून दिले आहे.

मूळ विषय अंबानींच्या घरासमोर जिलेटिन कोणी ठेवले हा आहे. त्या चौकशीपासून लक्ष विचलित करण्याचे काम फडणवीस जाणीवपूर्वक करीत आहेत. आता परमबीर सिंग यांचे पत्र बाहेर आल्यापासून ‘एनआयए’कडून देखील माहिती बाहेर येणे कमी झाले आहे, असे का झाले मला माहिती नाही, असा चिमटाही पाटील यांनी काढला.

फोन टॅपिंग करत असल्याने शुक्लांची बदली!रश्मी शुक्ला या अनधिकृत फोन टॅप करत होत्या म्हणूनच त्यांना वेगळ्या प्रकारची शिक्षा देऊन बदलण्यात आले. महाविकास आघाडी सरकार बनत असताना सर्वात महत्त्वाचे जे नेते होते त्यांचे फोनसुद्धा टॅप करण्याचे उद्योग रश्मी शुक्ला यांनी केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.    

मूळ विषय अंबानींच्या घरासमोर जिलेटिन कोणी ठेवले हा आहे. त्या चौकशीपासून लक्ष विचलित करण्याचे काम देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक करीत आहेत. - जयंत पाटील, जलसंपदामंत्री 

 

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसsachin Vazeसचिन वाझे