शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत, आहेराची पाकिटे घेऊन पळाला; उद्धव ठाकरेंचा घणाघात

By हेमंत बावकर | Updated: October 25, 2020 20:32 IST

Uddhav Thackeray: घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व. बाबरी वेळी शेपट्या घालणारे हिंदुत्त्वावर बोलत आहेत. आम्हाला विचारत आहेत तुमचे हिंदुत्व कुठे गेले? इथे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता, असा जोरदार प्रहार उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला.

देश संकटात आहे आणि भाजपा राजकारण करत आहे. कोरोना आहे, संकटं आहेत, जीएसटी नाही, पैसे येणार कुठून? आमचा जीएसटीचा निधी केंद्र सरकार का देत नाही. जवळपास ३८ हजार कोटी रुपये केंद्राकडे आहेत. जीएसटी सदोष असेल तर मोदींनी मागे घ्यावा आणि माफी मागावी, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. माझे काम पुढील महिन्यात तुमच्यापुढे ठेवणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

आज शिवसेनेचा दसरा मेळावा कोरोनामुळे 50 पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन घेण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.  तसेच आमच्यावर टीका करणाऱ्या रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही, अशा शब्दांत फटकारले. रावसाहेब दानवेंनी लग्न तुम्ही केले आणि बापाकडे मागताय असा सवाल केला होता. यावर ठाकरे यांनी समाचार घेतला. तुमचा बाप आहेराची पाकिटे घेऊन मोजतो असे सांगून गेला, त्याने ते पैसे खाल्ले का माहिती नाही, असा टोला लगावला.  मी आज मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून टाकलाय. मला संयमचा महत्त्व कळतं. महाराष्टाच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या छाताडावर गुढी पाडवा साजरा करेन. वाघाची अवलाद आहे, डिवचाल तर पस्तवाल असा इशारा त्यांनी भाजपाला दिला. 

घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व. बाबरी वेळी शेपट्या घालणारे हिंदुत्त्वावर बोलत आहेत. आम्हाला विचारत आहेत तुमचे हिंदुत्व कुठे गेले? इथे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता . गोव्यात गोवंश बंदी का नाही. सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या, असा सल्लाही त्यांनी भाजपाच्या नेत्यांना दिला. 

आमच्या अंगावरती येत आहात, महाराष्ट्र द्वेष पाहिल्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो, सावध रहा. आदित्य, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक झाली हे भयंकर होतं. बिहारच्या सुपुत्रार चिखलफेक करणारे महाराष्ट्राच्या सुपुत्रावर चिखलफेक करतायेत. तुम्ही रातोरात झाडांची कत्तल करत होता, आम्ही ८०८ एकराचं जंगल वाचवलं, एक रुपया खर्च न करता मेट्रो कारशेड उभारतोय. बेडूक आणि त्याची पिल्लं वाघ पाहून ओरडत सुटलेत, असा टोला राणे कुटुंबाला लगावला.

केवळ पाडापाडी करण्यात भाजपा रस आहे, ही अराजकता आहे. विरोधक म्हणजे अहंकारी राजा आणि कळसुत्री बाहुल्या आहेत. महाराष्ट्र आता कळसुत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही, असा इशारा देताना सरकार पाडून दाखवा असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा