शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत, आहेराची पाकिटे घेऊन पळाला; उद्धव ठाकरेंचा घणाघात

By हेमंत बावकर | Updated: October 25, 2020 20:32 IST

Uddhav Thackeray: घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व. बाबरी वेळी शेपट्या घालणारे हिंदुत्त्वावर बोलत आहेत. आम्हाला विचारत आहेत तुमचे हिंदुत्व कुठे गेले? इथे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता, असा जोरदार प्रहार उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला.

देश संकटात आहे आणि भाजपा राजकारण करत आहे. कोरोना आहे, संकटं आहेत, जीएसटी नाही, पैसे येणार कुठून? आमचा जीएसटीचा निधी केंद्र सरकार का देत नाही. जवळपास ३८ हजार कोटी रुपये केंद्राकडे आहेत. जीएसटी सदोष असेल तर मोदींनी मागे घ्यावा आणि माफी मागावी, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. माझे काम पुढील महिन्यात तुमच्यापुढे ठेवणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

आज शिवसेनेचा दसरा मेळावा कोरोनामुळे 50 पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन घेण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.  तसेच आमच्यावर टीका करणाऱ्या रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही, अशा शब्दांत फटकारले. रावसाहेब दानवेंनी लग्न तुम्ही केले आणि बापाकडे मागताय असा सवाल केला होता. यावर ठाकरे यांनी समाचार घेतला. तुमचा बाप आहेराची पाकिटे घेऊन मोजतो असे सांगून गेला, त्याने ते पैसे खाल्ले का माहिती नाही, असा टोला लगावला.  मी आज मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून टाकलाय. मला संयमचा महत्त्व कळतं. महाराष्टाच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या छाताडावर गुढी पाडवा साजरा करेन. वाघाची अवलाद आहे, डिवचाल तर पस्तवाल असा इशारा त्यांनी भाजपाला दिला. 

घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व. बाबरी वेळी शेपट्या घालणारे हिंदुत्त्वावर बोलत आहेत. आम्हाला विचारत आहेत तुमचे हिंदुत्व कुठे गेले? इथे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता . गोव्यात गोवंश बंदी का नाही. सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या, असा सल्लाही त्यांनी भाजपाच्या नेत्यांना दिला. 

आमच्या अंगावरती येत आहात, महाराष्ट्र द्वेष पाहिल्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो, सावध रहा. आदित्य, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक झाली हे भयंकर होतं. बिहारच्या सुपुत्रार चिखलफेक करणारे महाराष्ट्राच्या सुपुत्रावर चिखलफेक करतायेत. तुम्ही रातोरात झाडांची कत्तल करत होता, आम्ही ८०८ एकराचं जंगल वाचवलं, एक रुपया खर्च न करता मेट्रो कारशेड उभारतोय. बेडूक आणि त्याची पिल्लं वाघ पाहून ओरडत सुटलेत, असा टोला राणे कुटुंबाला लगावला.

केवळ पाडापाडी करण्यात भाजपा रस आहे, ही अराजकता आहे. विरोधक म्हणजे अहंकारी राजा आणि कळसुत्री बाहुल्या आहेत. महाराष्ट्र आता कळसुत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही, असा इशारा देताना सरकार पाडून दाखवा असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा