शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिवसेना भवनासमोरच भाजपा-सेना कार्यकर्ते भिडले; दादरमध्ये तणाव, पोलीस बंदोबस्त वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 17:02 IST

Clashes Between Shivsena and BJP over Ram Mandir Land Scam Issue:राम मंदिरावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून शिवसेना भवनासमोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

ठळक मुद्देभाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. शिवसेना भवनाकडे निघालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवून त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. राम मंदिर जमीन खरेदी व्यवहारावरून झालेल्या आरोपावरून भाजपाने फटकार मोर्चा आयोजित केला होता

मुंबई – शिवसेना-भाजपा यांच्यातील संघर्ष आता रस्त्यावर पाहायला मिळत आहे. दादरच्या शिवसेना भवनासमोरच भाजपा आणि सेनेचे कार्यकर्ते भिडले आहेत. राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र शिवसेना भवनाच्या काही अंतरावरच पोलिसांनी त्यांना अडवले.

“खंडणी जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये; लायकीत राहावे”; भाजपा आमदाराचा इशारा

राम मंदिरावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून शिवसेना भवनासमोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर गेले. राम मंदिर जमीन खरेदी व्यवहारावरून झालेल्या आरोपावरून भाजपाने फटकार मोर्चा आयोजित केला होता. भाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. शिवसेना भवनाकडे निघालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवून त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. तेव्हा शिवसेना भवनासमोर आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. त्यांनी घोषणाबाजीला सुरूवात केली. शिवसैनिकांनी भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप लावण्यात येत आहे.

भाजपाचा आरोप काय?

अयोध्येत श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप करून शिवसेनेने हिंदू धर्म, धार्मिक स्थळ आणि रामभक्तांच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. शिवसेनेच्या या राजकीय षडयंत्राविरोधात भाजपा युवा मोर्चाने फटकार मोर्चाचं आयोजन केले होते. याच्या विरोधात निषेध करण्यासाठी शिवसेना भवनासमोर जमण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आलं होतं.

काय आहे शिवसेनेची भूमिका?

अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम आणि त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे! राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेने दिला होता.

खंडणी जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये; लायकीत राहावे

जय भवानी, जय शिवाजी, टाक खंडणी असं बोलून पैसे जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये. लायकीत राहावे अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी अलीकडेच शिवसेनेवर शरसंधान साधलं होतं.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाRam Mandirराम मंदिर