शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

राज्यसभा खासदार नितीशकुमारांचा नवा राजकीय वारसदार; बिहारच्या राजकारणात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 16:52 IST

Nitish kumar, Bihar Politics: नितीशकुमार नेहमीच अचानक आणि धक्कादायक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. गेल्या निवडणुकीत राजदसोबत निवडणूक लढवत लालूपुत्रांला उपमुख्यमंत्री केले होते. मात्र, ते डोईजड होऊ लागताच अचानक भाजपाची साथ पकडत पुन्हा सत्ता स्थापन केली होती. यावेळीदेखील त्यांनी भाजपासोबतच निवडणूक लढविली होती. मात्र, ही निवडणूक त्यांच्यासाठी खूप कठीण गेली.

पटना : नुकत्याच झालेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नितीशकुमारांनी मोठी घोषणा केली होती. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नितीशकुमारांनी ही माझी शेवटची निवडणूक म्हणून घोषणा केली होती. यानंतर दीड महिन्यांनी नितीशकुमारांनी त्यांच्या राजकीय वारसदाराची घोषणा करून टाकली आहे. य़ामुळे पुन्हा एकदा बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

नितीशकुमार नेहमीच अचानक आणि धक्कादायक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. गेल्या निवडणुकीत राजदसोबत निवडणूक लढवत लालूपुत्रांला उपमुख्यमंत्री केले होते. मात्र, ते डोईजड होऊ लागताच अचानक भाजपाची साथ पकडत पुन्हा सत्ता स्थापन केली होती. यावेळीदेखील त्यांनी भाजपासोबतच निवडणूक लढविली होती. मात्र, ही निवडणूक त्यांच्यासाठी खूप कठीण गेली. हरण्याची चिन्हे दिसू लागताच नितीशकुमारांनी थेट निवृत्तीचेच का़र्ड खेळले. आता त्यांच्यासमोर उत्तराधिकारी शोधण्याचे आव्हान होते. कारण सातव्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर नितीशकुमारांना विरोधकांसह भाजप, स्वपक्षियांकडूनही विचारणा होणार होती. 

भाजपावर नाराज? नितीशकुमार सरकार लवकरच कोसळणार; राजदचा दावा

नितीश कुमार यांचे वारसदार हे त्यांच्याच पक्षाचे दिल्लीत बसणारे राज्यसभा खासदार रामचंद्र प्रसाद सिंह आहेत. पटनामध्ये जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु होती. तेव्हा अचानक नितीशकुमारांनी आरपीसी यांच्या नावाची घोषणा केल्याने बैठकीतही सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. नितीशकुमार य़ांनी आरपीसी यांना जदयूचा नवा अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला. याला सर्व सदस्यांनी होकार दिला.

नितीश 2022 पर्यंत पक्षाचे राष्ट्रीय़ अध्यक्ष राहू शकत होते. मात्र, त्यांनी मध्येच असा निर्णय का घेतला हे न समजण्यापलिकडचे आहे. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व निर्णय नितीशकुमारांचेच असणार आहेत, फक्त शिक्का आरसीपी सिंहांची असणार आहे. दुसरीकडे या निर्णयामागे भाजपाचे वाढलेले वर्चस्वही बोलले जात आहे. नितीशकुमार मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष असल्याने जर त्यांनी भाजपाबाबत काही कठोर निर्णय घेतला तर आघाडी धर्माच्य मर्यांदांवरून प्रश्न उपस्थित झाले असते. यामुळे नितीश यांनी हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. आरपीसी सिंह नितीश यांच्या जिल्ह्यातीलच नालंदातील आहेत. तसेच ते नितीश यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे नेते आहेत. 

Bihar Election Result : नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्री झाले खरे...; पुढ्यात 5 तगडी आव्हाने

सरकारवर आधीसारखे नियंत्रण ठेवता येणार?नितीशकुमारांना या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. जदयूचे आमदार घटले असून भाजपाचे आमदार वाढले आहेत. जदयूचे 43 तर भाजपाचे 74 आमदार आहेत. यामुळे मुख्यमंत्री जरी नितीशकुमार झाले तरीही त्या प्रमाणात मंत्रिपदे भाजपाच्याच वाट्याला अधिक जातील. तहामध्ये मोठी मोठी खाती भाजपाकडेच जातील, यामुळे आधीसारखे नियंत्रण ठेवणे त्यांना कठीण जाण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी जेव्हा त्यांनी राजदसोबत निवडणूक जिंकली होती, तेव्हा काही महिन्यांतच ते त्रस्त झाले होते. 

विरोधकही ताकदवाननितीशकुमारांना यावेळी सहकाऱ्यांसोबत विरोधकही ताकदवान लाभले आहेत. 2005 मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून लालूप्रसाद यादव यांचे पतन होत गेले. मात्र, यंदा विरोधात 115 आमदार असणार आहेत. एमआयएमचे पाच आणि राजद आघाडीचे 110. लालू प्रसाद यादव हे तुरुंग आणि हॉस्पिटलमध्ये असल्याने तेजस्वी यादव यांनी एकट्याच्या जिवावर ७५ आमदाप निवडून आणले आहेत. यामुळे तेजस्वी अनुभवाने कमी असले तरीही नितीसकुमारांना नाकीनऊ आणण्याचा प्रयत्न जरूर करणार. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBiharबिहार