शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

राजू शेट्टी यांची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 19:33 IST

Politics Bjp Raju Shetty Kolhapur : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने सुरू असल्याचे त्यांनी अलीकडील काही दिवसांत घेतलेल्या भूमिकेवरून दिसत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात त्यांना आगामी निवडणुकीत लढायचे असेल तर महाविकास आघाडीतून त्यांना संधी मिळणेच शक्य दिसत नाही.

ठळक मुद्देराजू शेट्टी यांची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने लोकसभेचे राजकारण : महाविकास आघाडीपासून दिवसेंदिवस दूर

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने सुरू असल्याचे त्यांनी अलीकडील काही दिवसांत घेतलेल्या भूमिकेवरून दिसत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात त्यांना आगामी निवडणुकीत लढायचे असेल तर महाविकास आघाडीतून त्यांना संधी मिळणेच शक्य दिसत नाही.

विधानपरिषदेच्या आमदारकीसाठीच्या यादीला राज्यपालांनी मंजुरी न दिल्याने लटकली आहे. त्यामुळे ते एकेक पाऊल महाविकास आघाडीपासून दूर जात असल्याचे दिसत आहे. आज महाराष्ट्रात ज्यांच्या मागे जनमत आहे, ज्यांची प्रतिमा चांगली आहे, असे ते एकमेव शेतकरी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला कायमच महत्त्व राहिले आहे.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीत त्यांनी पारंपरिक भूमिका बदलून सत्तारूढ आघाडीस पाठिंबा दिला. गेली काही वर्षे ते ज्यांना दुधातील काळे बोके म्हणून हिणवत होते, दूध दरवाढीसाठी ज्यांच्या विरुद्ध संघर्ष करत होते, त्यांनाच पाठिंबा देऊन गोकुळच्या कामकाजाबद्दल त्यांनी प्रमाणपत्र देऊन टाकले आहे. त्यामुळे शेट्टी यांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल तर्क-वितर्क लढविले जात आहेत परंतु गोकुळला पाठिंबा ही त्यांचा तत्कालिक निर्णय नसून तो लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे.

गेल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या पाठबळावर त्यांनी ही निवडणूक लढविली. ज्यांना आयुष्यभर चाबकाचे फटकारे देण्याची भाषा केली त्या साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही कसे बसला? अशा भूमिकेतील विरोधाभास तयार झाल्याने त्याचा फटका बसून त्यांचा पराभव झाला. तिथे शिवसेनेकडून धैर्यशील माने निवडून आले. त्यानंतरच्या घडामोडीत दोन्ही काँग्रेससह शिवसेनाही सत्तेत एकत्र आली. त्यामुळे जेव्हा केव्हा लोकसभा निवडणुका होतील तेव्हा विद्यमान खासदारांच्या जागा त्या-त्या पक्षाकडे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मतदारसंघात शेट्टी यांना उमेदवारी मिळणे दुरापास्त होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत विधान परिषदेच्या एका जागेचा ह्यशब्दह्ण दिला होता. त्यानुसार राजू शेट्टी यांचे नाव महाविकास आघाडीकडून राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविले; परंतु ते राजभवनात लटकले आहे. त्या अस्वस्थतेतून त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत स्वाभिमानीचा स्वतंत्र उमेदवार उभा केला. त्यानंतर त्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हारा नहीं हूँ मैं... बस, खेल समझ रहा था...! इसके बाद खेल भी मेरा होगा और खिलाडी भी मेरा..! असे ट्वीट करून आपण वेगळा विचार करत असल्याचे सुचित केले होते.

चारच दिवसांपूर्वी एकरकमी एफआरपी देण्याची पद्धत बदलण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू असताना त्यांनी तसे कराल तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, अशी टीका केली होती. या प्रश्नांवर सरकारशी संघर्ष करण्याची त्यांची भूमिका आहे. या सगळ्या घडामोडी ते महाविकास आघाडीपासून दिवसेंदिवस बाजूला जात असल्याचे प्रत्यंतर आणून देणाऱ्या आहेत....भाजप ते भाजप वर्तुळ पूर्णगोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीस पाठिंबा देण्यापूर्वी त्यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात घरफाळाप्रकरणी जाहीर टीका केली. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांचे विरोधक असलेल्या महाडिक गटाला पूरक होईल, अशी भूमिका त्यांनी घेतली. आगामी निवडणुकीत ह्यस्वाभिमानीह्णच्या चिन्हावरच परंतु भाजपपुरस्कृत उमेदवार म्हणून ते रिंगणात येऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकारण संपविण्याच्या नादात त्यांची स्वत:ची खासदारकी गेली. दोन्ही काँग्रेसच्या सोबत जावून फायदा कमी व नुकसानच जास्त झाल्याने ते पुन्हा राज्याच्या राजकारणात भाजपसोबत जाण्याची चिन्हे आहेत तसे झाले तर त्यांचेही राजकीय भूमिका बदलण्याचे वर्तुळ पूर्ण होईल.

टॅग्स :PoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरBJPभाजपाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना