शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

राहुल गांधींची लोकप्रियता केरळात काँग्रेसला तारेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 04:23 IST

डाव्यांची दमछाक सुरूच; भारतीय जनता पक्षाची या खेपेस पुन्हा परीक्षा

- पोपट पवार तिरूअनंतपूरम: शबरीमाला मुद्द्यावरून विरोधकांनी डाव्या आघाडीला कोंडीत पकडले असतानाच, राहुल गांधी यांनीही केरळमधूनच लढण्याचा घेतलेला निर्णय काँग्रेसला लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. मल्याळी जनतेमध्ये सर्वाधिक लोकप्रियतेच्या यादीत राहुल गांधी यांनी स्थान पटकाविले आहे.मंगळवारी केरळच्या २० जागांसाठी मतदान होणार आहे. शबरीमाला आंदोलन, कार्यकर्त्यांवरील हल्ले, धार्मिक धुव्रीकरण या मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या असल्या तरी स्थानिक प्रश्नांवरही राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी डाव्यांवर निशाना साधला. त्यामुळे दक्षिणेतील हे राज्य पुन्हा डाव्याची सोबत करणार की काँग्रेसला तारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीत काँग्रेसप्रणित यूडीएफ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एलडीएफ आघाडीत खरा सामना रंगणार आहे. भाजप तिसऱ्या स्थानासाठी धडपडत असला तरी एक-दोन जागांवर भाजपही धक्कादायक निकाल देऊ शकतो. काँग्रेसप्रणित यूडीएफ ने सर्वच्या सर्व २० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये काँग्रेस १६ जागा लढवत असून मित्रपक्ष मुस्लीम लीग २, केरळ काँग्रेस( मणी गट) १, आणि आरएसपीला १ जागा दिली आहे. डाव्यांच्या एलडीएफ नेही २० उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी १४ जागा लढवत आहे. भाकपने ४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. एलडीएएफने दोन अपक्षांना पाठिंबा दिला आहे. डावे व काँग्रेस यांच्या बालेकिल्ल्यात भाजपनेही १५ जागांवर उमेदवार उभे केले असून भारतीय धर्म जन सेनेला ४ जागा सोडल्या आहेत. कधीकाळी राष्ट्रीय राजकारणात किंगमेकरची असलेल्या डाव्या पक्षांची अवस्था फारच वाईट झाली आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा व केरळमध्ये वर्षानुवर्षे सत्ता भोगणाºया डाव्यांचे सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतके खासदार आहेत. केरळमधील हाच त्यांचा आधार आहे.वायनाड काँग्रेससाठी सोपाकाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे वायनाडमधून निवडणूक लढवत असल्याने, या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ही जागा भाजपने भारतीय धर्म जन सेनेला सोडली असून, त्यांनी तुषार वेल्लापल्ली यांना मैदानात उतरवले आहे. एलडीएफच्या वतीने येथे पी.पी. सुन्नीर रिंगणात आहेत. वायनाडमध्ये मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाचे प्राबल्य असून, आदिवासी समाजही मोठा आहे. वायनाड हा काँग्रेसचा गड मानला जातो. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक सोपी मानली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKerala Lok Sabha Election 2019केराला लोकसभा निवडणूक 2019wayanad-pcवायनाडRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस