शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींची लोकप्रियता केरळात काँग्रेसला तारेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 04:23 IST

डाव्यांची दमछाक सुरूच; भारतीय जनता पक्षाची या खेपेस पुन्हा परीक्षा

- पोपट पवार तिरूअनंतपूरम: शबरीमाला मुद्द्यावरून विरोधकांनी डाव्या आघाडीला कोंडीत पकडले असतानाच, राहुल गांधी यांनीही केरळमधूनच लढण्याचा घेतलेला निर्णय काँग्रेसला लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. मल्याळी जनतेमध्ये सर्वाधिक लोकप्रियतेच्या यादीत राहुल गांधी यांनी स्थान पटकाविले आहे.मंगळवारी केरळच्या २० जागांसाठी मतदान होणार आहे. शबरीमाला आंदोलन, कार्यकर्त्यांवरील हल्ले, धार्मिक धुव्रीकरण या मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या असल्या तरी स्थानिक प्रश्नांवरही राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी डाव्यांवर निशाना साधला. त्यामुळे दक्षिणेतील हे राज्य पुन्हा डाव्याची सोबत करणार की काँग्रेसला तारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीत काँग्रेसप्रणित यूडीएफ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एलडीएफ आघाडीत खरा सामना रंगणार आहे. भाजप तिसऱ्या स्थानासाठी धडपडत असला तरी एक-दोन जागांवर भाजपही धक्कादायक निकाल देऊ शकतो. काँग्रेसप्रणित यूडीएफ ने सर्वच्या सर्व २० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये काँग्रेस १६ जागा लढवत असून मित्रपक्ष मुस्लीम लीग २, केरळ काँग्रेस( मणी गट) १, आणि आरएसपीला १ जागा दिली आहे. डाव्यांच्या एलडीएफ नेही २० उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी १४ जागा लढवत आहे. भाकपने ४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. एलडीएएफने दोन अपक्षांना पाठिंबा दिला आहे. डावे व काँग्रेस यांच्या बालेकिल्ल्यात भाजपनेही १५ जागांवर उमेदवार उभे केले असून भारतीय धर्म जन सेनेला ४ जागा सोडल्या आहेत. कधीकाळी राष्ट्रीय राजकारणात किंगमेकरची असलेल्या डाव्या पक्षांची अवस्था फारच वाईट झाली आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा व केरळमध्ये वर्षानुवर्षे सत्ता भोगणाºया डाव्यांचे सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतके खासदार आहेत. केरळमधील हाच त्यांचा आधार आहे.वायनाड काँग्रेससाठी सोपाकाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे वायनाडमधून निवडणूक लढवत असल्याने, या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ही जागा भाजपने भारतीय धर्म जन सेनेला सोडली असून, त्यांनी तुषार वेल्लापल्ली यांना मैदानात उतरवले आहे. एलडीएफच्या वतीने येथे पी.पी. सुन्नीर रिंगणात आहेत. वायनाडमध्ये मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाचे प्राबल्य असून, आदिवासी समाजही मोठा आहे. वायनाड हा काँग्रेसचा गड मानला जातो. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक सोपी मानली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKerala Lok Sabha Election 2019केराला लोकसभा निवडणूक 2019wayanad-pcवायनाडRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस