शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

राहुल गांधींची लोकप्रियता केरळात काँग्रेसला तारेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 04:23 IST

डाव्यांची दमछाक सुरूच; भारतीय जनता पक्षाची या खेपेस पुन्हा परीक्षा

- पोपट पवार तिरूअनंतपूरम: शबरीमाला मुद्द्यावरून विरोधकांनी डाव्या आघाडीला कोंडीत पकडले असतानाच, राहुल गांधी यांनीही केरळमधूनच लढण्याचा घेतलेला निर्णय काँग्रेसला लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. मल्याळी जनतेमध्ये सर्वाधिक लोकप्रियतेच्या यादीत राहुल गांधी यांनी स्थान पटकाविले आहे.मंगळवारी केरळच्या २० जागांसाठी मतदान होणार आहे. शबरीमाला आंदोलन, कार्यकर्त्यांवरील हल्ले, धार्मिक धुव्रीकरण या मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या असल्या तरी स्थानिक प्रश्नांवरही राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी डाव्यांवर निशाना साधला. त्यामुळे दक्षिणेतील हे राज्य पुन्हा डाव्याची सोबत करणार की काँग्रेसला तारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीत काँग्रेसप्रणित यूडीएफ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एलडीएफ आघाडीत खरा सामना रंगणार आहे. भाजप तिसऱ्या स्थानासाठी धडपडत असला तरी एक-दोन जागांवर भाजपही धक्कादायक निकाल देऊ शकतो. काँग्रेसप्रणित यूडीएफ ने सर्वच्या सर्व २० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये काँग्रेस १६ जागा लढवत असून मित्रपक्ष मुस्लीम लीग २, केरळ काँग्रेस( मणी गट) १, आणि आरएसपीला १ जागा दिली आहे. डाव्यांच्या एलडीएफ नेही २० उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी १४ जागा लढवत आहे. भाकपने ४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. एलडीएएफने दोन अपक्षांना पाठिंबा दिला आहे. डावे व काँग्रेस यांच्या बालेकिल्ल्यात भाजपनेही १५ जागांवर उमेदवार उभे केले असून भारतीय धर्म जन सेनेला ४ जागा सोडल्या आहेत. कधीकाळी राष्ट्रीय राजकारणात किंगमेकरची असलेल्या डाव्या पक्षांची अवस्था फारच वाईट झाली आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा व केरळमध्ये वर्षानुवर्षे सत्ता भोगणाºया डाव्यांचे सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतके खासदार आहेत. केरळमधील हाच त्यांचा आधार आहे.वायनाड काँग्रेससाठी सोपाकाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे वायनाडमधून निवडणूक लढवत असल्याने, या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ही जागा भाजपने भारतीय धर्म जन सेनेला सोडली असून, त्यांनी तुषार वेल्लापल्ली यांना मैदानात उतरवले आहे. एलडीएफच्या वतीने येथे पी.पी. सुन्नीर रिंगणात आहेत. वायनाडमध्ये मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाचे प्राबल्य असून, आदिवासी समाजही मोठा आहे. वायनाड हा काँग्रेसचा गड मानला जातो. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक सोपी मानली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKerala Lok Sabha Election 2019केराला लोकसभा निवडणूक 2019wayanad-pcवायनाडRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस