शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

राहुल गांधींची बदनामी, त्या जाहिरातीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते संतप्त, कंपनीचे कार्यालय फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 18:31 IST

Mumbai Politics News : STORIA या कंपनीने राहुल गांधी यांच्या भाषणातील ‘आलू से सोना’ या विधानाचा आधार घेत ‘यहा से घास डालुंगा वहा से दूध निकलेगा’ अशा आशयाची जाहिरात केली होती. त्याविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

मुंबई - एका कंपनीने जाहिरातीमधून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची बदनामी केल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले असून, मुंबईमध्ये संबंधित कंपनीचे कार्यालय काँग्रेसच कार्यकर्त्यांनी फोडले. दरम्यान, मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी या जाहिरातीविरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. माच्र आता या प्रकारावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार राजकारण पेटले आहे.  (Rahul Gandhi's notoriety, Congress workers angry over the advertisement )

STORIA या कंपनीने राहुल गांधी यांच्या भाषणातील ‘आलू से सोना’ या विधानाचा आधार घेत ‘यहा से घास डालुंगा वहा से दूध निकलेगा’ अशा आशयाची जाहिरात केली होती. दरम्यान, या जाहिरातीमधून काँघ्रेसचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांची बदनामी झाल्याचा दावा करत काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी संबंधित कंपनीच्या कार्यालयावर चाल केली. 

दरम्यान, या प्रकाराबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, आदरणीय सोनियाजी गांधी व आदरणीय राहुलजी गांधी यांची STORIA कंपनीने जाहिरातीमधून केलेल्या बदनामीला चोख उत्तर दिल्याबद्दल मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत तसेच युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक!! असले घाणेरडे धंदे खपवून घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असा इशाराही भाई जगताप यांनी दिला. 

दरम्यान, भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी या जाहिरातीवरून काँग्रेसला टोला लगावला आहे.  आलू से सोनाच्या धर्तीवर... यहा से घास डालुंगा वहा से दूध निकलेगा, अशी  जाहिरात केल्यामुळे खवळलेल्या काँग्रेसवाल्यानी कंपनीचे कार्यालय फोडले.संताप योग्यच आहे त्यांचा. कॉपीराईट वगैरे काही प्रकार आहे की नाही?  पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव आहेत, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.  

 

पंतप्रधान मोदींना चहावाला, मौत का सौदागर, शेठ अशी वाट्टेल ती हलकट विशेषणे लावणारे काँग्रेसचे फाजील नेते एका पप्पूमय जाहिरातीमुळे बिथरले. सत्ता आहे म्हणून ही मस्ती चालली आहे. तोडफोड करणाऱ्या या गुंडांच्या टोळीला लॉकडाउन च्या नियमातून उद्धवजीनी विशेष सूट दिलेली दिसते, असा टोलाही अतुल भातखळकर यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMumbaiमुंबईPoliticsराजकारण