शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राहुल गांधी अचानक परदेशी का गेले?; खासदार सातव यांनी सांगितलं कारण

By कुणाल गवाणकर | Updated: December 28, 2020 12:49 IST

काँग्रेसच्या स्थापना दिनाला राहुल गांधी अनुपस्थित; भाजप नेत्यांकडून टीकास्त्र

नवी दिल्ली: काँग्रेसच्या १३६ व्या स्थापना दिनानिमित्त आज पक्षाकडून देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी परदेशात गेले आहेत. त्यावरून भारतीय जनता पक्षाकडून राहुल गांधींना लक्ष्य करण्यात येत आहे. भाजपकडून होत असलेल्या टीकेला काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.राहुल गांधींची आजी आजारी आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं राहुल गांधी देशाबाहेर गेले आहेत. आपल्या घरातील एखादी व्यक्ती, नातेवाईक आजारी असल्यास आपण सर्व काही सोडून त्यांच्यासाठी धावून जातो, असं राजीव सातव यांनी सांगितलं. 'दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना राहुल गांधी परदेशात गेल्याचं भाजप नेते म्हणतात. पण पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसोबत चर्चा करत नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाताहत झाली आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पण तरीही मोदी याबद्दल चकार शब्द काढत नाहीत,' अशा शब्दांत सातव यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.देशावर कोरोनाचं संकट येणार असा धोक्याचा इशारा राहुल गांधींनी फेब्रुवारी महिन्यातच दिला होता. पण राहुल यांनी सतर्कतेचा इशारा देऊनही सरकारनं काय केलं?, असा सवाल सातव यांनी उपस्थित केला. सगळे प्रश्न राहुल यांना विचारले जातात. पण पंतप्रधान ६ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेत नाहीत, असं सातव म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना सक्तवसुली संचलनालयानं नोटीस पाठवली आहे. त्यावरूनही सातव यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. भाजप, केंद्र सरकारच्या विरोधात बोललं की ईडी, सीबीआयच्या नोटीस येतात. भाजप नेत्यांना मात्र कधीही ईडी, सीबीआय नोटीस बजावत नाही. ईडी, सीबीआयनं आता त्यांचं कार्यालय भाजप कार्यालयात हलवावं. म्हणजे त्यांचा संवाद जास्त चांगला राहील, असा चिमटा सातव यांनी काढला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRajeev Satavराजीव सातवBJPभाजपा