शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

पक्ष बळकट झाला तरच राहुल गांधी पंतप्रधान; ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 07:23 IST

आझाद यांनी शुक्रवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधी यांची प्रशंसा करताना म्हटले की, ‘‘त्यांनी कठीण काळात पक्ष चालवला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीपासून ते सगळ्या पदांसाठी निवडणूक होत नाही तोपर्यंत पक्ष बळकट होणार नाही. पक्ष बळकट होईल तेव्हाच राहुल गांधी पंतप्रधान होणे शक्य आहे, अशी स्पष्ट भूमिका पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी घेतली. ते म्हणाले, ‘‘आम्ही हाच मुद्दा उपस्थित केल्यावर ज्या लोकांना जनाधार नाही तेच याला विरोध करीत आहेत. ते लोक फक्त लाळघोटेपणा करून पदावर राहू इच्छितात.’’

आझाद यांनी शुक्रवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधी यांची प्रशंसा करताना म्हटले की, ‘‘त्यांनी कठीण काळात पक्ष चालवला. त्या हंगामी अध्यक्ष होत्या त्यामुळे प्रदीर्घ काळ त्या पदावर राहू शकत नाहीत. राहुल गांधी अध्यक्ष होऊ इच्छित नाहीत त्यामुळे आम्ही पूर्णवेळ अध्यक्ष असावी, अशी मागणी केली.’’

पक्षातील राहुल गांधी यांचे समर्थन करणाऱ्या युवक नेत्यांवर थेट हल्ला करताना आझाद यांनी या मंडळींनी पक्षासाठी काय काम केले? असा प्रश्न विचारला. आम्ही या पक्षासाठी राजीव गांधी, सीताराम केसरी, पी. व्ही. नरसिंह राव आणि इंदिरा गांधी यांच्यासमवेत काम केले आणि संघटनेच्या निवडणुकाही पाहिल्या. परंतु, ३० वर्षांपासून निवडणूका झालेल्याच नाहीत. आमची मागणी आहे की, गटापासून जिल्हा, जिल्ह्यापासून प्रदेश आणि प्रदेशापासून केंद्रीय स्तरावर थेट निवडणुका व्हाव्यात. पूर्णवेळचा अध्यक्ष असावा. आम्ही बळकट होऊन भाजपला टक्कर देऊ शकू, असेही ते म्हणाले. गुलाम नबी आझाद यांचा आक्रमकपणा हे दाखवत होता की, हा संघर्ष राहुल गांधींचे पाठीराखे व जुन्या नेत्यांमधील असून तो असा सहज संपणारा नाही. २३ नेत्यांनी लिहिलेले पत्र आझाद यांना कोणत्याच दृष्टिकोनातून चुकीचे वाटत नाही. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, राहुल गांधींचे समर्थक लाळघोटेपणा करून पदांवर राहू इच्छितात.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस