- अभय नरहर जोशी - इतके दिवस सभा, रॅली, दावे-प्रतिदावे, गाठी-भेटी, भाषणे, आश्वासने अशी धामधूम संपून या पातळीवर सारं कसं शांत होणार आहे. यासाठी लागणारी कार्यकर्त्यांची गरज काही काळ तरी संपणार आहे...त्यांची ही कथा आणि व्यथा...'' बेरोजगारीचा प्रश्न कायम भविष्यातला अंधार कायमनेते आमचे ‘कार्यसम्राट’ते दाखवतील आपल्याला वाटफ्लेक्स त्यांचा उभारून जा
...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - १
दुष्काळ आवडतो सर्वांनातशी निवडणूक आवडे सर्वांनाप्रत्येकाचे आपापले ‘दुकान’नेत्याच्या दरबारी एजंटांना माननिष्ठावंतांनो, सतरंज्या अंथरून जा
...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - २
औट घटकेचा तू असतोस राजानंतर मिळते गुलामीची सजाहुकमाचे एक्के वेगळेच असतातनिवडणुकीपुरतेच ते चमकताततू फक्त पत्ते तेवढे पिसून जा
...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - ३
नेत्यांची मुलंच होतात नेतेकार्यकर्त्यांची मुलं कार्यकर्तेरात्रंदिन राबून गाळतात घाम गळ्यात उपरण्याचा लगाम‘जिंदाबाद’च्या घोषणा देऊन जा
...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - ४
झोपडी फाटली, चूल थंडतरी करू नकोस तू बंड‘त्यांना’ विजयश्रीच्या माळात्यासाठी आपली घरे जाळापण नेत्यांना सोन्यानं मढवून जा
...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - ५
भाषणांतील शब्दांचा खेळकसा बसवायचा त्याचा मेळआश्वासनांचे पोकळ वारेदाखवती चंद्र-सूर्य-तारेमोहक स्वप्नांना या भुलून जा
...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - ६
गेला सुखद घोषणांचा सुकाळआता भवताली फक्त दुष्काळवणवण थेंब थेंब पाण्यासाठी फक्त कणकण जगण्यासाठीवारंवार असाच कोमेजून जा
...निवडणुकीनंतर सारं विसरून जा - ७