शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांचे आजारपण अन् पदाधिकाऱ्यांची परीक्षा

By राजेश शेगोकार | Updated: September 25, 2021 11:02 IST

Prakash Ambedkar : शस्त्रक्रिया हाेण्याआधीच त्यांनी समाज माध्यामांवर जे निवेदन प्रसिद्ध केले आहे त्यामधून पदाधिकाऱ्यांनाच परीक्षेला बसविले आहे.

- राजेश शेगाेकार

 अकाेला : राजकारण हे ‘राजकीय प्रयोगां’चंही क्षेत्र आहे. आपल्या महाराष्ट्रात अगदी 'पुलोद'पासून तर सध्याच्या 'महाविकास आघाडी'पर्यंत अचाट राजकीय प्रयोग आपण पाहत आहाेत, अनुभवतही आहाेत. अशा अनेक प्रयाेगांनीच राजकारण हे प्रवाही व नित्य नवे राहत आहे. सध्याच्या राजकारणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वाधिक राजकीय प्रयाेग केेले आहेत. सध्या ते आजारी आहेत. त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली आहे, मात्र या आजारपणात विश्रांती घेतानाही त्यांनी संघटनेची ताकद अजमावण्याचा प्रयाेग सुरू केला आहे. शस्त्रक्रिया हाेण्याआधीच त्यांनी समाज माध्यामांवर जे निवेदन प्रसिद्ध केले आहे त्यामधून पदाधिकाऱ्यांनाच परीक्षेला बसविले आहे.

सध्या जिल्हा परिषदेचे राजकारण तापले आहे, अकाेल्यात शिवसेना-राष्ट्रवादीने वंचितच्या विराेधात एकत्रितरीत्या दंड थाेपटले आहेत, तर काँग्रेस आणि भाजपा स्वबळावरच वंचितची सत्ता खाली खेचण्याची रणनीती आखत आहेत. अकाेला जिल्हा परिषदेच्या आखाड्यात आतापर्यंत वंचितचेच पहेलवान जिंकत आहेत. आता हाेत असलेल्या १४ पैकी ८ जागांवर वंचितचा विजय झाला हाेता. त्यामुळे या जागा कायम ठेवत त्यामध्ये भर टाकून काठावरची सत्ता एकहाती कायम ठेवण्याचे वंचित समाेर आव्हान आहे. वाशिममध्ये गेल्यावेळी ५२ पैकी ८ जागा जिंकून वंचितने आपली ताकद दाखविली हाेती आता तेथे अनंतराव देशमुख यांच्यासारख्या जाणत्या नेतृत्वासाेबत वंचित रिंगणात आहे. अनंतरावांच्या गटाचे सात सदस्य विजयी झाले हाेेते. त्यामुळे १४ जागांमध्ये या दाेघांची ताकद वाढली तर वाशिम जिल्हा परिषदेच्या सत्तेची गणिते बदलू शकतात. या पृष्ठभूमीवर ॲड. आंबेडकर हे आजारपणामुळे निवडणुकीच्या रिंगणात नसतील, इतकेच नाही तर त्यांनी चक्क पक्षाच्या कार्यातूनच रजा घेतल्याने ते प्रचारालाही नसतील हे स्पष्टच आहे.

एकीकडे जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा घेऊन विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह ठेवल्यामुळे विराेधकांसाठी प्रचाराकरिता हा मुद्दा आयताच मिळाला आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसमाेर पक्षाला एकसंघ ठेवत वंचितचा झेंडा उंचावण्याचे आव्हान आहे. बरेचदा माेठ्या नेत्यांच्या सहवासात राहून लहान कार्यकर्त्यांनाही आपणच नेते असल्याचे भास हाेतात, मात्र नेतृत्वाने पाठ फिरवली की अशा भासमानी कार्यकर्त्यांची सावली किती लहान आहे हे स्पष्ट हाेते. मग त्यांची अस्तित्व टिकविण्यासाठी हाेणारी धडपड आपण सारेच पाहताे. आंबेडकरांच्या राजकीय कारर्किदीतही अशा अनेक भासमानी कार्यकर्त्यांनी आपणच नेते असल्याचा आभास निर्माण केला हाेता त्यातून त्यांच्या महत्त्वाकांक्षांना खतपाणी मिळाले व त्यांनी इतर पक्ष जवळ केला. त्यानंतर अशा नेतृत्वाचे काय झाले हे जगजाहीर आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत कस लागणार आहे ताे पहिल्या फळीतील नेतृत्वाचा. पक्षाची जबाबदारी ज्यांना दिली आहे त्यांनी पदाला किती न्याय दिला याचेही मूल्यमापन या निमित्ताने हाेणारच आहे. केवळ उपचार कालावधीसाठी प्रभारी अध्यक्ष नेमणाऱ्या ॲड. आंबेडकरांकडे पदाधिकाऱ्यांच्या अशा मूल्यमापनाची ब्ल्यू प्रिंटही तयारच असेल. त्यामुळे ही जिल्हा परिषद निवडणूक वंचितसाठी दुहेरी प्रतिष्ठेची ठरत आहे यात शंका नाही.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोलाPoliticsराजकारण