शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

‘स्थानिक स्वराज्य’च्या निवडणुका पुढे ढकला; तिसऱ्या लाटेच्या अंदाजानंतर राज्य मंत्रिमंडळाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 12:03 IST

मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य टास्क फोर्सचे काही प्रमुख सदस्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन तिसऱ्या लाटेच्या अंदाजाविषयी त्यांच्याशी चर्चा करतील.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तिसऱ्या लाटेच्या अंदाजानंतरच घ्याव्यात. वेळ पडल्यास या निवडणुका काही काळ पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे करावी, असा सूर मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त झाल्याची माहिती, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य टास्क फोर्सचे काही प्रमुख सदस्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन तिसऱ्या लाटेच्या अंदाजाविषयी त्यांच्याशी चर्चा करतील. पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत ही संख्या ४० लाख लोकांपर्यंत गेली होती. आता तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक महाराष्ट्रात बाधित होतील, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला किमान १२ टक्के ऑक्सीजन बेडची गरज पडणार आहे. ही सगळी माहिती आयोगाला द्यावी, आणि जर रुग्ण संख्या वाढू लागली तर निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलाव्या अशी विनंती आयोगाला करावी, अशी चर्चा बैठकीत झाली.

एक हजार रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. ५०० रुग्णवाहिका आल्या असून, उर्वरित ५०० सप्टेंबरअखेर प्रत्येक आरोग्य केंद्रांपर्यंत जाणार आहेत. महाराष्ट्रात १०० टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये, जिल्हा रुग्णालयांना रुग्णवाहिका मिळतील असे सांगून टोपे म्हणाले, एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या वतीने, ५ हजार कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यात आरोग्य संस्थांच्या बांधकामांसाठी कर्ज घेण्याचा विषय आहे. 

केरळमध्ये ओनम सणानिमित्ताने जिथे मोठी गर्दी झाली होती, तिथे आता कोरोनाचा परिणाम जाणवत आहे. मी स्वतः केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी फोनवर बोललो. ३१ हजार केसेस एका दिवसात कशा आल्या, याची विचारणा केली. तपासणी वाढवली आणि सणामुळे झालेली गर्दी ही कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. सिरो सर्व्हिलन्सचा रिपोर्टमध्ये देशस्तरावर कमी बाधित केरळमध्ये ४२ टक्के आहेत. त्या खालोखाल ५५ टक्के महाराष्ट्रात आहेत, असे ते म्हणाले. 

आग्रीपाडामध्ये अनाथाश्रमात २२ कोरोनाबाधितकांदिवली (पश्चिम) येथील निवासी संकुलात १७ रहिवाशी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आता आग्रीपाडा येथील एका अनाथाश्रमात २२ जणांना संसर्ग झाला आहे. यात १८ वर्षांखालील १५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व बाधितांवर पालिका रुग्णालय आणि कोविड केंद्रात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीसाठी महापालिकेने अनाथाश्रम सील केले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र