शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
5
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
6
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
7
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या शेणॉय यांचा जागतिक स्तरावर डंका
8
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
9
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
10
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
11
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
12
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
13
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
14
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
16
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
17
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
18
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
19
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
20
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 

‘स्थानिक स्वराज्य’च्या निवडणुका पुढे ढकला; तिसऱ्या लाटेच्या अंदाजानंतर राज्य मंत्रिमंडळाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 12:03 IST

मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य टास्क फोर्सचे काही प्रमुख सदस्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन तिसऱ्या लाटेच्या अंदाजाविषयी त्यांच्याशी चर्चा करतील.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तिसऱ्या लाटेच्या अंदाजानंतरच घ्याव्यात. वेळ पडल्यास या निवडणुका काही काळ पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे करावी, असा सूर मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त झाल्याची माहिती, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य टास्क फोर्सचे काही प्रमुख सदस्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन तिसऱ्या लाटेच्या अंदाजाविषयी त्यांच्याशी चर्चा करतील. पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत ही संख्या ४० लाख लोकांपर्यंत गेली होती. आता तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक महाराष्ट्रात बाधित होतील, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला किमान १२ टक्के ऑक्सीजन बेडची गरज पडणार आहे. ही सगळी माहिती आयोगाला द्यावी, आणि जर रुग्ण संख्या वाढू लागली तर निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलाव्या अशी विनंती आयोगाला करावी, अशी चर्चा बैठकीत झाली.

एक हजार रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. ५०० रुग्णवाहिका आल्या असून, उर्वरित ५०० सप्टेंबरअखेर प्रत्येक आरोग्य केंद्रांपर्यंत जाणार आहेत. महाराष्ट्रात १०० टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये, जिल्हा रुग्णालयांना रुग्णवाहिका मिळतील असे सांगून टोपे म्हणाले, एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या वतीने, ५ हजार कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यात आरोग्य संस्थांच्या बांधकामांसाठी कर्ज घेण्याचा विषय आहे. 

केरळमध्ये ओनम सणानिमित्ताने जिथे मोठी गर्दी झाली होती, तिथे आता कोरोनाचा परिणाम जाणवत आहे. मी स्वतः केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी फोनवर बोललो. ३१ हजार केसेस एका दिवसात कशा आल्या, याची विचारणा केली. तपासणी वाढवली आणि सणामुळे झालेली गर्दी ही कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. सिरो सर्व्हिलन्सचा रिपोर्टमध्ये देशस्तरावर कमी बाधित केरळमध्ये ४२ टक्के आहेत. त्या खालोखाल ५५ टक्के महाराष्ट्रात आहेत, असे ते म्हणाले. 

आग्रीपाडामध्ये अनाथाश्रमात २२ कोरोनाबाधितकांदिवली (पश्चिम) येथील निवासी संकुलात १७ रहिवाशी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आता आग्रीपाडा येथील एका अनाथाश्रमात २२ जणांना संसर्ग झाला आहे. यात १८ वर्षांखालील १५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व बाधितांवर पालिका रुग्णालय आणि कोविड केंद्रात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीसाठी महापालिकेने अनाथाश्रम सील केले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र