शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

चहाच्या मळ्यात मतांचे राजकारण; चहापत्ती वेचणारे हात काेणाला देणार मत? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 06:05 IST

भाजपने २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत या परिसरातील ७ पैकी ४ जागा जिंकल्या हाेत्या, तर २०१९ मध्ये या सर्व जागा कायम ठेवण्यातही भाजपला यश मिळाले.

गुवाहाटी : काेट्यवधी लाेकांच्या दिवसाची सुरुवात चहापासून हाेते. या चहासाठी लागणारी चहापत्ती ज्या ठिकाणाहून येते त्या आसाममधील राजकारण सध्या चहामय झाले आहे. आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये तब्बल आठ लाखांहून अधिक मतदार असून, प्रत्येक राजकीय पक्ष त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

आसाममध्ये तीन टप्प्यांत विधानसभा निवडणूक हाेणार आहे. एकूण १२६ जागांपैकी पहिल्या टप्प्यातील ४७ जागांसाठी २७ मार्चला मतदान हाेणार आहे. त्यापैकी ३८ मतदारसंघ हे चहाचे मळे असलेल्या जाेरहाट, गाेलाघाट, शिवसागर, दिब्रूगढ, टिनसुकिया, विश्वनाथ आणि साेनितपूर या जिल्ह्यांमध्ये आहे. या जिल्ह्यात चहाचे मळे तब्बल ८५० असून, आठ लाखांहून अधिक कामगार त्याठिकाणी आहेत. म्हणूनच सर्व राजकीय पक्षांना चहाच्या मळ्यांनी खुणावले आहे.

भाजपने २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत या परिसरातील ७ पैकी ४ जागा जिंकल्या हाेत्या, तर २०१९ मध्ये या सर्व जागा कायम ठेवण्यातही भाजपला यश मिळाले. केंद्रीय अर्थसंकल्पातही चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी एक हजार काेटींचे पॅकेजही जाहीर करण्यात आले हाेते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी या भागात यावेळी पाच प्रचार सभा घेतल्या आहेत. काँग्रेसचा यंदा या क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांना पुन्हा काबीज करण्यासाठी जाेरदार प्रयत्न दिसून येत आहे. 

लव्ह अँड लँड जिहाद रोखण्यासाठी कायदा करणार : शहाकमालपूर : आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास लव्ह अँड लँड जिहादच्या धोक्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे सांगितले. एका सभेत बोलताना ते म्हणाले की, आसामची संस्कृती आणि सभ्यता मजबूत करण्यासाठी योग्य कायदा व धोरणे तयार केली जातील. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एआययुडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांना आसामची ओळख, प्रतिनिधी बनविले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. राहुल गांधी हे एक पर्यटक असून केवळ निवडणुकीत ते दोन ते तीन दिवस राज्यात येतात, नंतर पाच वर्षे गायब होतात, अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :BJPभाजपा