शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शिवसंपर्क अभियानातील कार्यकर्ता म्हणाला, “भाऊ किती दिवस एवढे बंधनात राहायचे, खूप झाले ना....”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 12:40 IST

या निमित्ताने पदाधिकारी गावागावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून त्यांची निवेदनही स्वीकारत आहेत

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानं लोक पुन्हा बिनधास्तपणे वागायला लागले आहेत. तब्बल दीड वर्षापासून मास्क, फिजिकल डिस्टन्स वैगेरे नियम पाळल्यानंतर हे नियम आता लोकांच्या अंगवळणी पडले आहेत असे वाटत होते. फोनच्या कॉलर ट्यूनमधील बाई कोरोना अभी गया नही, तीन बाते याद रखे असे म्हणून किती कॅसेट घासत राहिली तरी लोक आता ऐकायला तयार नाहीत. ग्रामीण भागात तर लोकांनी मास्क केव्हाच काढून फेकले आहेत. गेल्या आठवडाभरापासून गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान जोमाने सुरू आहे.

या निमित्ताने पदाधिकारी गावागावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून त्यांची निवेदनही स्वीकारत आहेत. पण हे करताना सामाजिक अंतर सोडा, तोंडावर मास्कही लावण्याचं भान कुणाला राहत नाही. एका सज्जनाने सहज याबद्दल प्रश्न केला. त्यावर एक कार्यकर्ता म्हणाला, भाऊ किती दिवस एवढे बंधनात राहायचे, खूप झाले ना..गेला कोरोना आता....

संकटकाळातदेखील विरोधकांना चिमटे

कोकणात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा अद्यापही खंडित आहे. एरवी सोशल माध्यमांवर सक्रीय असणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या कालावधीत सातत्याने जनतेच्या प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन माध्यमातून संपर्कात राहणे अपेक्षित होते. मात्र ती दिवसांत त्यांनी या घटनेसंदर्भात शोक व्यक्त करणारे तीन आणि टोल फ्री क्रमांकाची माहिती देणारे एक असे एकूण चारच ट्विट केले आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे संघ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह विरोधकांवर टीका करणाऱ्या त्यांच्या ट्विटची संख्या जास्त आहे. संकटकाळात राज्यातील मंत्र्याने सातत्याने जनतेच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. मात्र पक्षातीलच अंतर्गत गटबाजी व विरोधकांवर टीका करण्यात ते व्यस्त असल्याने सोशल माध्यमांवर त्याचेच प्रतिबिंब उमटत आहे. मंत्र्याने पुढाकार घेतला तर अधिकारी कामाला लागतात असे म्हटले जाते. मात्र संकटकाळात जनतेच्या समस्या दूर करण्यापेक्षा विरोधकांना चिमटे काढण्यावरच नेत्यांचा भर असेल तर अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार?

(ही कुजबुज योगेश पांडे, अंकुश गुंडावार, मनोज ताजने, ज्ञानेश्वर मुंदे, सुरेंद्र राऊत यांनी लिहिली आहे)

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNitin Rautनितीन राऊत