शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

शिवसंपर्क अभियानातील कार्यकर्ता म्हणाला, “भाऊ किती दिवस एवढे बंधनात राहायचे, खूप झाले ना....”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 12:40 IST

या निमित्ताने पदाधिकारी गावागावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून त्यांची निवेदनही स्वीकारत आहेत

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानं लोक पुन्हा बिनधास्तपणे वागायला लागले आहेत. तब्बल दीड वर्षापासून मास्क, फिजिकल डिस्टन्स वैगेरे नियम पाळल्यानंतर हे नियम आता लोकांच्या अंगवळणी पडले आहेत असे वाटत होते. फोनच्या कॉलर ट्यूनमधील बाई कोरोना अभी गया नही, तीन बाते याद रखे असे म्हणून किती कॅसेट घासत राहिली तरी लोक आता ऐकायला तयार नाहीत. ग्रामीण भागात तर लोकांनी मास्क केव्हाच काढून फेकले आहेत. गेल्या आठवडाभरापासून गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान जोमाने सुरू आहे.

या निमित्ताने पदाधिकारी गावागावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून त्यांची निवेदनही स्वीकारत आहेत. पण हे करताना सामाजिक अंतर सोडा, तोंडावर मास्कही लावण्याचं भान कुणाला राहत नाही. एका सज्जनाने सहज याबद्दल प्रश्न केला. त्यावर एक कार्यकर्ता म्हणाला, भाऊ किती दिवस एवढे बंधनात राहायचे, खूप झाले ना..गेला कोरोना आता....

संकटकाळातदेखील विरोधकांना चिमटे

कोकणात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा अद्यापही खंडित आहे. एरवी सोशल माध्यमांवर सक्रीय असणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या कालावधीत सातत्याने जनतेच्या प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन माध्यमातून संपर्कात राहणे अपेक्षित होते. मात्र ती दिवसांत त्यांनी या घटनेसंदर्भात शोक व्यक्त करणारे तीन आणि टोल फ्री क्रमांकाची माहिती देणारे एक असे एकूण चारच ट्विट केले आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे संघ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह विरोधकांवर टीका करणाऱ्या त्यांच्या ट्विटची संख्या जास्त आहे. संकटकाळात राज्यातील मंत्र्याने सातत्याने जनतेच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. मात्र पक्षातीलच अंतर्गत गटबाजी व विरोधकांवर टीका करण्यात ते व्यस्त असल्याने सोशल माध्यमांवर त्याचेच प्रतिबिंब उमटत आहे. मंत्र्याने पुढाकार घेतला तर अधिकारी कामाला लागतात असे म्हटले जाते. मात्र संकटकाळात जनतेच्या समस्या दूर करण्यापेक्षा विरोधकांना चिमटे काढण्यावरच नेत्यांचा भर असेल तर अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार?

(ही कुजबुज योगेश पांडे, अंकुश गुंडावार, मनोज ताजने, ज्ञानेश्वर मुंदे, सुरेंद्र राऊत यांनी लिहिली आहे)

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNitin Rautनितीन राऊत