शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

"...हा तर राजकीय खेळ", खेलरत्नच्या नामांतरावरून शिवसेनेने मोदी सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 08:30 IST

Khel Ratna Award: राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयावरून शिवसेनेने सामनातील अग्रलेखामधून नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांवर नाव कोरले जात असतानाच मोदी सरकारने देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न असे नामांतर केले. या नामांतराची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनभावनेचा आदर करत हे नामांतर केल्याचा दावा केला होता. दरम्यान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयावरून शिवसेनेने सामनातील अग्रलेखामधून नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.("... This is a political game", Shiv Sena slammed the Modi government for name Changing Khel Ratna)

सामनातील आजच्या अग्रलेखामध्ये म्हटले आहे की, इंदिरा गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. राजीव गांधी यांनाही दहशतवादी हल्ल्याचे बळी व्हावे लागले. या दोघांच्या राजकीय विचारांशी मतभेद असू शकतात. लोकशाहीमध्ये मतभेदांना स्थान आहे. पण देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान असणाऱ्या पंतप्रधानांचे बलिदान हा चेष्टेचा विषय ठरू शकत नाही. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण करणे ही लोकभावना नसून हा तर राजकीय खेळ आहे. राजीव गांधी यांच्या बलिदानाचा अपमान न करताही मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता आला असता. भारताने ती परंपरा आणि संस्कृती गमावली आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

नीरज चोप्राने भालाफेकीत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्याने देशात सुवर्णक्षणाचा उत्सव सुरू असतानाच केंद्र सरकारने हा राजकीय खेळ केला आहे. या खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत. खेलरत्न हा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आतापर्यंत अनेक खेळाडूंना हा पुरस्कार प्रदान केला गेला आहे. मात्र कुणीही राजीव गांधी यांचे नाव असलेला हा पुरस्कार नको असल्याचे दिसत नाही. मात्र टोकियोमध्ये भारतीय संघाने कांस्यपदक जिंकताच मोदी सरकारने या पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करणे हे अनाकलनीय आहे, अशी टीका सामनामधील अग्रलेखातून करण्यात आली आहे.

मेजर ध्यानचंद यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो. ध्यानचंद यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठे आहे. ते एक उत्तम व्यक्ती होते. तसेच पंडित नेहरूंशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या राजीव गांधी यांचे नाव पुसून तेथे ध्यानचंद यांचे नाव लावणे हा ध्यानचंद यांचाही मोठा गौरव आहे, असेही मानता येणार नाही. राजीव गांधींचे नाव नको म्हणून ध्यानचंद यांचे नाव देणे हे द्वेशाचे राजकारण आहे, अशी खरमरीत टीकाही शिवसेनेने केली.  

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीIndiaभारत