शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"...हा तर राजकीय खेळ", खेलरत्नच्या नामांतरावरून शिवसेनेने मोदी सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 08:30 IST

Khel Ratna Award: राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयावरून शिवसेनेने सामनातील अग्रलेखामधून नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांवर नाव कोरले जात असतानाच मोदी सरकारने देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न असे नामांतर केले. या नामांतराची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनभावनेचा आदर करत हे नामांतर केल्याचा दावा केला होता. दरम्यान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयावरून शिवसेनेने सामनातील अग्रलेखामधून नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.("... This is a political game", Shiv Sena slammed the Modi government for name Changing Khel Ratna)

सामनातील आजच्या अग्रलेखामध्ये म्हटले आहे की, इंदिरा गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. राजीव गांधी यांनाही दहशतवादी हल्ल्याचे बळी व्हावे लागले. या दोघांच्या राजकीय विचारांशी मतभेद असू शकतात. लोकशाहीमध्ये मतभेदांना स्थान आहे. पण देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान असणाऱ्या पंतप्रधानांचे बलिदान हा चेष्टेचा विषय ठरू शकत नाही. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण करणे ही लोकभावना नसून हा तर राजकीय खेळ आहे. राजीव गांधी यांच्या बलिदानाचा अपमान न करताही मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता आला असता. भारताने ती परंपरा आणि संस्कृती गमावली आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

नीरज चोप्राने भालाफेकीत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्याने देशात सुवर्णक्षणाचा उत्सव सुरू असतानाच केंद्र सरकारने हा राजकीय खेळ केला आहे. या खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत. खेलरत्न हा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आतापर्यंत अनेक खेळाडूंना हा पुरस्कार प्रदान केला गेला आहे. मात्र कुणीही राजीव गांधी यांचे नाव असलेला हा पुरस्कार नको असल्याचे दिसत नाही. मात्र टोकियोमध्ये भारतीय संघाने कांस्यपदक जिंकताच मोदी सरकारने या पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करणे हे अनाकलनीय आहे, अशी टीका सामनामधील अग्रलेखातून करण्यात आली आहे.

मेजर ध्यानचंद यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो. ध्यानचंद यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठे आहे. ते एक उत्तम व्यक्ती होते. तसेच पंडित नेहरूंशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या राजीव गांधी यांचे नाव पुसून तेथे ध्यानचंद यांचे नाव लावणे हा ध्यानचंद यांचाही मोठा गौरव आहे, असेही मानता येणार नाही. राजीव गांधींचे नाव नको म्हणून ध्यानचंद यांचे नाव देणे हे द्वेशाचे राजकारण आहे, अशी खरमरीत टीकाही शिवसेनेने केली.  

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीIndiaभारत