शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

"...हा तर राजकीय खेळ", खेलरत्नच्या नामांतरावरून शिवसेनेने मोदी सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 08:30 IST

Khel Ratna Award: राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयावरून शिवसेनेने सामनातील अग्रलेखामधून नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांवर नाव कोरले जात असतानाच मोदी सरकारने देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न असे नामांतर केले. या नामांतराची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनभावनेचा आदर करत हे नामांतर केल्याचा दावा केला होता. दरम्यान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयावरून शिवसेनेने सामनातील अग्रलेखामधून नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.("... This is a political game", Shiv Sena slammed the Modi government for name Changing Khel Ratna)

सामनातील आजच्या अग्रलेखामध्ये म्हटले आहे की, इंदिरा गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. राजीव गांधी यांनाही दहशतवादी हल्ल्याचे बळी व्हावे लागले. या दोघांच्या राजकीय विचारांशी मतभेद असू शकतात. लोकशाहीमध्ये मतभेदांना स्थान आहे. पण देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान असणाऱ्या पंतप्रधानांचे बलिदान हा चेष्टेचा विषय ठरू शकत नाही. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण करणे ही लोकभावना नसून हा तर राजकीय खेळ आहे. राजीव गांधी यांच्या बलिदानाचा अपमान न करताही मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता आला असता. भारताने ती परंपरा आणि संस्कृती गमावली आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

नीरज चोप्राने भालाफेकीत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्याने देशात सुवर्णक्षणाचा उत्सव सुरू असतानाच केंद्र सरकारने हा राजकीय खेळ केला आहे. या खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत. खेलरत्न हा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आतापर्यंत अनेक खेळाडूंना हा पुरस्कार प्रदान केला गेला आहे. मात्र कुणीही राजीव गांधी यांचे नाव असलेला हा पुरस्कार नको असल्याचे दिसत नाही. मात्र टोकियोमध्ये भारतीय संघाने कांस्यपदक जिंकताच मोदी सरकारने या पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करणे हे अनाकलनीय आहे, अशी टीका सामनामधील अग्रलेखातून करण्यात आली आहे.

मेजर ध्यानचंद यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो. ध्यानचंद यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठे आहे. ते एक उत्तम व्यक्ती होते. तसेच पंडित नेहरूंशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या राजीव गांधी यांचे नाव पुसून तेथे ध्यानचंद यांचे नाव लावणे हा ध्यानचंद यांचाही मोठा गौरव आहे, असेही मानता येणार नाही. राजीव गांधींचे नाव नको म्हणून ध्यानचंद यांचे नाव देणे हे द्वेशाचे राजकारण आहे, अशी खरमरीत टीकाही शिवसेनेने केली.  

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीIndiaभारत