शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

"...हा तर राजकीय खेळ", खेलरत्नच्या नामांतरावरून शिवसेनेने मोदी सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 08:30 IST

Khel Ratna Award: राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयावरून शिवसेनेने सामनातील अग्रलेखामधून नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांवर नाव कोरले जात असतानाच मोदी सरकारने देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न असे नामांतर केले. या नामांतराची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनभावनेचा आदर करत हे नामांतर केल्याचा दावा केला होता. दरम्यान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयावरून शिवसेनेने सामनातील अग्रलेखामधून नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.("... This is a political game", Shiv Sena slammed the Modi government for name Changing Khel Ratna)

सामनातील आजच्या अग्रलेखामध्ये म्हटले आहे की, इंदिरा गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. राजीव गांधी यांनाही दहशतवादी हल्ल्याचे बळी व्हावे लागले. या दोघांच्या राजकीय विचारांशी मतभेद असू शकतात. लोकशाहीमध्ये मतभेदांना स्थान आहे. पण देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान असणाऱ्या पंतप्रधानांचे बलिदान हा चेष्टेचा विषय ठरू शकत नाही. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण करणे ही लोकभावना नसून हा तर राजकीय खेळ आहे. राजीव गांधी यांच्या बलिदानाचा अपमान न करताही मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता आला असता. भारताने ती परंपरा आणि संस्कृती गमावली आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

नीरज चोप्राने भालाफेकीत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्याने देशात सुवर्णक्षणाचा उत्सव सुरू असतानाच केंद्र सरकारने हा राजकीय खेळ केला आहे. या खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत. खेलरत्न हा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आतापर्यंत अनेक खेळाडूंना हा पुरस्कार प्रदान केला गेला आहे. मात्र कुणीही राजीव गांधी यांचे नाव असलेला हा पुरस्कार नको असल्याचे दिसत नाही. मात्र टोकियोमध्ये भारतीय संघाने कांस्यपदक जिंकताच मोदी सरकारने या पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करणे हे अनाकलनीय आहे, अशी टीका सामनामधील अग्रलेखातून करण्यात आली आहे.

मेजर ध्यानचंद यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो. ध्यानचंद यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठे आहे. ते एक उत्तम व्यक्ती होते. तसेच पंडित नेहरूंशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या राजीव गांधी यांचे नाव पुसून तेथे ध्यानचंद यांचे नाव लावणे हा ध्यानचंद यांचाही मोठा गौरव आहे, असेही मानता येणार नाही. राजीव गांधींचे नाव नको म्हणून ध्यानचंद यांचे नाव देणे हे द्वेशाचे राजकारण आहे, अशी खरमरीत टीकाही शिवसेनेने केली.  

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीIndiaभारत