शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

कम्युनिस्टांचीच सत्ता चांगली होती, असे बंगालची जनता म्हणते आहे - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 06:27 IST

डाव्यांच्या सत्तेला कंटाळून पश्चिम बंगालमधील जनतेने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या हाती सत्ता दिली.

माल्दा : डाव्यांच्या सत्तेला कंटाळून पश्चिम बंगालमधील जनतेने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या हाती सत्ता दिली. पण कम्युनिस्टांची सत्ताच चांगली होती, अशी म्हणायची वेळ तृणमूलने जनतेवर आणली आहे, अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी केली.तृणमूलचे कार्यकर्ते व नेते यांच्या गुंडगिरीमुळे जनता त्रस्त झाल्याचा आरोप करताना शहा म्हणाले, आतापर्यंत भाजपा व अन्य राजकीय पक्षांच्या ६0 कार्यकर्त्यांचे राज्यात खून झाले आहेत. असा तृणमूलचा कारभार आहे. पण जनता यापुढे हे खपवून घेणार नाही, ही मला खात्री आहे. भाजपाने सभा, मेळावे घेऊ नयेत, म्हणून ममता सरकारने खूप प्रयत्न केले. पण त्यांना आता यश आले नाही आणि यापुढेही येणार नाही,अन्य देशांतील लोकांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी आम्ही कायदा करू पाहत आहोत. पण ममता बॅनर्जी यांचा त्याला विरोध आहे. म्हणजेच त्यांना राज्यात व देशांत घुसखोर यावेत, असेच वाटत असावे. मोदी सरकारने पश्चिम बंगाल सरकारच्या निधीमध्ये अडीचपट वाढ केली. पण ममता सरकारने या निधीचा वापरच केला नाही. त्यांनी राज्याला अधिक गरीब बनवले. गोतस्करांनाही त्यांचा आशीर्वाद आहे, अशी टीका त्यांनी केली.>हे खपवून घेणार नाहीबंगालमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही, इतकी तृणमूलच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी आहे, पण भाजपा ही गुंडगिरी खपवून घेणार नाही आणि जनता तृणमूलला सत्तेबाहेर केल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही अमित शहा यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शहा