शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कम्युनिस्टांचीच सत्ता चांगली होती, असे बंगालची जनता म्हणते आहे - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 06:27 IST

डाव्यांच्या सत्तेला कंटाळून पश्चिम बंगालमधील जनतेने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या हाती सत्ता दिली.

माल्दा : डाव्यांच्या सत्तेला कंटाळून पश्चिम बंगालमधील जनतेने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या हाती सत्ता दिली. पण कम्युनिस्टांची सत्ताच चांगली होती, अशी म्हणायची वेळ तृणमूलने जनतेवर आणली आहे, अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी केली.तृणमूलचे कार्यकर्ते व नेते यांच्या गुंडगिरीमुळे जनता त्रस्त झाल्याचा आरोप करताना शहा म्हणाले, आतापर्यंत भाजपा व अन्य राजकीय पक्षांच्या ६0 कार्यकर्त्यांचे राज्यात खून झाले आहेत. असा तृणमूलचा कारभार आहे. पण जनता यापुढे हे खपवून घेणार नाही, ही मला खात्री आहे. भाजपाने सभा, मेळावे घेऊ नयेत, म्हणून ममता सरकारने खूप प्रयत्न केले. पण त्यांना आता यश आले नाही आणि यापुढेही येणार नाही,अन्य देशांतील लोकांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी आम्ही कायदा करू पाहत आहोत. पण ममता बॅनर्जी यांचा त्याला विरोध आहे. म्हणजेच त्यांना राज्यात व देशांत घुसखोर यावेत, असेच वाटत असावे. मोदी सरकारने पश्चिम बंगाल सरकारच्या निधीमध्ये अडीचपट वाढ केली. पण ममता सरकारने या निधीचा वापरच केला नाही. त्यांनी राज्याला अधिक गरीब बनवले. गोतस्करांनाही त्यांचा आशीर्वाद आहे, अशी टीका त्यांनी केली.>हे खपवून घेणार नाहीबंगालमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही, इतकी तृणमूलच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी आहे, पण भाजपा ही गुंडगिरी खपवून घेणार नाही आणि जनता तृणमूलला सत्तेबाहेर केल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही अमित शहा यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शहा