शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

मी ओडिशाचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री अन् शरद पवारांशी बोलू शकत नाही; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 18:20 IST

भाजपा एक लोडेड व्हायरस पार्टी आहे. मी व्यक्तिगत नरेंद्र मोदींविरोधात बोलत नाही. मी शिष्टाचार पाळते परंतु मोदी राजकारणात खालच्या पातळीला गेले त्यांना लोकांनी उत्तर दिलं आहे असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ठळक मुद्देमी माझ्या राज्यातील लोकांचे आभार मानते. आम्ही पैसे, ताकद आणि सर्व एजेंसीविरोधात लढलो.बंगालमधील लोकांनी मतदान केले आणि देश, जगातील अनेकांनी आशीर्वाद दिला संपूर्ण देश बंगालमधील जनादेश पाहत आहे. लोकांना विकास हवा परंतु तुम्ही पक्षपाती राजकारण करता.

नवी दिल्ली – पेगासस प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा लोकशाहीवर हल्ला करत आहे. आमचे फोन टॅप केले जात आहे. पेगासस धोकादायक आणि क्रूर आहे. मी कुणाशीही बोलू शकत नाही. तुम्ही हेरगिरी करण्यासाठी खूप पैसे देत आहात. मी माझा फोन प्लास्टर केला आहे आता केंद्रालाही प्लास्टर करायला हवं नाहीतर देशात बर्बाद होईल असा घणाघात ममता बॅनर्जींनी केंद्रावर केला आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सर्वांचे फोन रेकॉर्ड केले जात आहेत. ते ऐकले जात आहे. मी ओडिशाचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि शरद पवार(Sharad Pawar) यांच्याशी बोलू शकत नाही. सरकारी पैशाचा वापर हेरगिरीसाठी केला जात आहे. पेगाससने न्यायाधीश, मंत्री, आमदार, खासदार सर्वांचे फोन ताब्यात घेतलेत. लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे. माझा फोन टॅप केला जात आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच भाजपा एक लोडेड व्हायरस पार्टी आहे. मी व्यक्तिगत नरेंद्र मोदींविरोधात बोलत नाही. मी शिष्टाचार पाळते परंतु मोदी राजकारणात खालच्या पातळीला गेले त्यांना लोकांनी उत्तर दिलं आहे. संपूर्ण देश बंगालमधील जनादेश पाहत आहे. लोकांना विकास हवा परंतु तुम्ही पक्षपाती राजकारण करता. मी माझ्या राज्यातील लोकांचे आभार मानते. आम्ही पैसे, ताकद आणि सर्व एजेंसीविरोधात लढलो. अनेक अडचणींना सामना करून विजय मिळवला. बंगालमधील लोकांनी मतदान केले आणि देश, जगातील अनेकांनी आशीर्वाद दिला असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

भाजपला सत्तेतून बाहेर करेपर्यंत 'खेला होबे'

ममता म्हणाल्या, मतदानानंतर राज्यात कसल्याही प्रकारचा हिंसाचार झाला नाही. मतदानाच्या बरोबर आधी, ते आमच्यावर कशा प्रकारे दबाव टाकत होते, आम्हाला माहीत आहे. आता जोवर भाजपला सत्तेतून काढत नाही, तोवर 'खेला होबे'. १६ ऑगस्टला खेला दिवस साजरा करणार असल्याचं ममता म्हणाल्या. बंगालच्या जनतेने 'मा, माटी आणि मानुष'ची निवड केली आहे. त्यांनी अर्थशक्तीला नाकारले आहे. भाजप हुकूमशाहीवर उतरला आहे. त्रिपुरात आमचा कार्यक्रम रोखला गेला, हीच लोकशाही आहे का? ते देशातील संस्था नष्ट करत आहेत. मोदी सरकारला प्लास्टर करण्याची आवश्यकता आहे. आता आपल्याला काम सुरू करायचे आहे असंही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी