शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मी ओडिशाचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री अन् शरद पवारांशी बोलू शकत नाही; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 18:20 IST

भाजपा एक लोडेड व्हायरस पार्टी आहे. मी व्यक्तिगत नरेंद्र मोदींविरोधात बोलत नाही. मी शिष्टाचार पाळते परंतु मोदी राजकारणात खालच्या पातळीला गेले त्यांना लोकांनी उत्तर दिलं आहे असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ठळक मुद्देमी माझ्या राज्यातील लोकांचे आभार मानते. आम्ही पैसे, ताकद आणि सर्व एजेंसीविरोधात लढलो.बंगालमधील लोकांनी मतदान केले आणि देश, जगातील अनेकांनी आशीर्वाद दिला संपूर्ण देश बंगालमधील जनादेश पाहत आहे. लोकांना विकास हवा परंतु तुम्ही पक्षपाती राजकारण करता.

नवी दिल्ली – पेगासस प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा लोकशाहीवर हल्ला करत आहे. आमचे फोन टॅप केले जात आहे. पेगासस धोकादायक आणि क्रूर आहे. मी कुणाशीही बोलू शकत नाही. तुम्ही हेरगिरी करण्यासाठी खूप पैसे देत आहात. मी माझा फोन प्लास्टर केला आहे आता केंद्रालाही प्लास्टर करायला हवं नाहीतर देशात बर्बाद होईल असा घणाघात ममता बॅनर्जींनी केंद्रावर केला आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सर्वांचे फोन रेकॉर्ड केले जात आहेत. ते ऐकले जात आहे. मी ओडिशाचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि शरद पवार(Sharad Pawar) यांच्याशी बोलू शकत नाही. सरकारी पैशाचा वापर हेरगिरीसाठी केला जात आहे. पेगाससने न्यायाधीश, मंत्री, आमदार, खासदार सर्वांचे फोन ताब्यात घेतलेत. लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे. माझा फोन टॅप केला जात आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच भाजपा एक लोडेड व्हायरस पार्टी आहे. मी व्यक्तिगत नरेंद्र मोदींविरोधात बोलत नाही. मी शिष्टाचार पाळते परंतु मोदी राजकारणात खालच्या पातळीला गेले त्यांना लोकांनी उत्तर दिलं आहे. संपूर्ण देश बंगालमधील जनादेश पाहत आहे. लोकांना विकास हवा परंतु तुम्ही पक्षपाती राजकारण करता. मी माझ्या राज्यातील लोकांचे आभार मानते. आम्ही पैसे, ताकद आणि सर्व एजेंसीविरोधात लढलो. अनेक अडचणींना सामना करून विजय मिळवला. बंगालमधील लोकांनी मतदान केले आणि देश, जगातील अनेकांनी आशीर्वाद दिला असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

भाजपला सत्तेतून बाहेर करेपर्यंत 'खेला होबे'

ममता म्हणाल्या, मतदानानंतर राज्यात कसल्याही प्रकारचा हिंसाचार झाला नाही. मतदानाच्या बरोबर आधी, ते आमच्यावर कशा प्रकारे दबाव टाकत होते, आम्हाला माहीत आहे. आता जोवर भाजपला सत्तेतून काढत नाही, तोवर 'खेला होबे'. १६ ऑगस्टला खेला दिवस साजरा करणार असल्याचं ममता म्हणाल्या. बंगालच्या जनतेने 'मा, माटी आणि मानुष'ची निवड केली आहे. त्यांनी अर्थशक्तीला नाकारले आहे. भाजप हुकूमशाहीवर उतरला आहे. त्रिपुरात आमचा कार्यक्रम रोखला गेला, हीच लोकशाही आहे का? ते देशातील संस्था नष्ट करत आहेत. मोदी सरकारला प्लास्टर करण्याची आवश्यकता आहे. आता आपल्याला काम सुरू करायचे आहे असंही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी