शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

Param Bir Singh: परमबीर सिंगांचे पत्र म्हणजे सहानुभूमी मिळवून लक्ष विचलित करण्याचा प्रकार - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 7:53 AM

राज्य सरकारला कोणताही धोका नाही

 सांगली : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेली स्फोटके व त्यानंतर झालेल्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. यातून कोणीही सुटू नये, यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचे पत्र म्हणजे कोणाची तरी सहानुभूती मिळवून या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचाच प्रकार आहे, असा आरोप जलसंपदामंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केला.

वाझे प्रकरणावरून सरकारला कोणताही धोका नसून, सरकार पूर्ण स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले. सांगली पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य दिशेने चालू आहे. या प्रकरणात कितीही मोठ्या अधिकाऱ्याचा सहभाग असो, त्याच्यावर कारवाईची ठाम भूमिका घेतली आहे. एनआयएला तपासात सहकार्य आणि एटीएसचा तपास अधिक गतीने करून या प्रकरणाचे सत्य समोर आणण्यासाठी सरकार गंभीर आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली गाडी कोणी ठेवली, स्फोटके नागपूरहून आली की, कोठून आली आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू कसा झाला, याचे सत्य समोर आलेच पाहिजे. मात्र, कोणाची तरी सहानुभूती मिळविण्यासाठी व या प्रकरणावरून, त्याच्या तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी आता असे पत्र समोर येत आहे. या प्रकरणात ज्या ज्या अधिकाऱ्यांवर संशयाची सुई आहे, ते सुटू नयेत, हीच राज्य सरकारची सुरुवातीपासूनची भूमिका आहे.

सरकारने सुरुवातीपासूनच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन कितीही मोठा अधिकारी असला, तरी त्याच्यावर कारवाईची भूमिका घेतली. त्यामुळे या प्रकरणावरून सरकारला कोणताही धोका नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेJayant Patilजयंत पाटीलAnil Deshmukhअनिल देशमुखParam Bir Singhपरम बीर सिंग