शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

Pankaja Munde: गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीनं पंकजा भावूक; भाजपासाठी केलेल्या संघर्षासाठी आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 13:38 IST

त्याचसोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कपिल पाटील, भारती पवार यांचा फोन आला, त्यांना मी शुभेच्छा दिल्या. दिल्लीला बोलावणं आलं तेव्हा भागवत कराड यांनीही मला फोन केला त्यांच्यांशीही माझं बोलणं झालं आहे.

ठळक मुद्देभारतीय जनता पार्टीत निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. प्रीतम मुंडे, हिना गावित यांची नावं चर्चेत होती. माझ्या नाराजीची काही कारण नाही. मला कुठलाही आक्षेप नाही. पक्षाचा निर्णय सर्वमान्य आहेआम्ही कुठेही नाराज नाही. एखाद्याला संधी मिळाली तर त्यांना शुभेच्छा देणं आमचं काम आहे.

मुंबई – केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र या चर्चेवर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. मी कुठेही नाराज नाही, जे कोणी मंत्री झालेत त्यांचे मनापासून अभिनंदन आहे. पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाविरोधात नाही. पक्षाचा निर्णय मला पटला आहे असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.

याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या की, केंद्रातल्या सर्व नव्या मंत्र्यांचे अभिनंदन केले. मला अनेकांचे फोन आले, मेसेज आले. प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. हिना गावितांच्याही नावाची चर्चा होती. परंतु मुंडे साहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत. आम्ही कुठेही नाराज नाही. एखाद्याला संधी मिळाली तर त्यांना शुभेच्छा देणं आमचं काम आहे. प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. बातम्या येत होत्या की प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्या. ती चुकीची बातमी होती म्हणून ट्विट केले असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कपिल पाटील, भारती पवार यांचा फोन आला, त्यांना मी शुभेच्छा दिल्या. दिल्लीला बोलावणं आलं तेव्हा भागवत कराड यांनीही मला फोन केला त्यांच्यांशीही माझं बोलणं झालं आहे. माझं लोकांची नाते आहे. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज वैगेरे काही नाही. माझ्या नाराजीची काही कारण नाही. मला कुठलाही आक्षेप नाही. पक्षाचा निर्णय सर्वमान्य आहे असं पंकजा मुंडे यांनी सांगितले.

भाजपा मला संपवत आहे असं वाटत नाही

तसेच भारतीय जनता पार्टीत निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. प्रीतम मुंडे, हिना गावित यांची नावं चर्चेत होती. ती नावं न येता दुसऱ्यांना संधी मिळाली. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून नेतृत्व निर्णय घेत असतं. प्रत्येक राज्याच्या बाबतीत असं होत असतं. प्रीतम मुंडे खूप कष्टाळू आहेत, केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या इतकची मर्यादित नाही तर त्यांचे कामही चांगले आहे. सर्वाधिक मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आले. पक्षाने घेतलेला निर्णय पटलेला आहे. भाजपा मला संपवत आहे असं मला वाटत नाही. मी छोटीशी कार्यकर्ता आहे त्यासाठी पंतप्रधानापर्यंत मला संपवण्याचा प्रयत्न कसा होईल? असा प्रश्न पंकजा मुंडेंनी केला.

मी फक्त वंजारी समाजाची नाही, तर...

गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाला एकत्र करण्याचं काम केले आहे. मी फक्त वंजारी समाजाची आहे हे मान्य नाही. मी राज्याची महिला नेता, चांगली वक्ता आहे. वंजारी समाजातील व्यक्ती मोठा होत असेल तर मी त्याच्या पाठिशी आहे आणि राहणार आहे. पक्षाने भागवत कराड यांना संधी दिली आहे. त्यांचा पक्ष संघटनेसाठी फायदा होईल. भविष्यात पक्षाची ताकद वाढण्यासाठी त्यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात हे दिसून येईल. पक्ष वाढवण्यासाठी नेते चांगले निर्णय घेत असतात. पक्ष मजबूत व्हावा यासाठी निर्णय घेतले जातात. पक्षाच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. नव्या लोकांना संधी दिली जात आहे असं पंकजा म्हणाल्या.

टीम देवेंद्र, टीम नरेंद्र भाजपाला मान्य नाही

टीम देवेंद्र, टीम नरेंद्र असं भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष असं धोरण आहे. मी पणा भाजपात नाही. आपण, आपण ही संस्कृती भाजपात आहे. भाजपाच्या संस्कृतीला मानणारी मी पक्षाची सामान्य कार्यकर्ता आहे. वेळोवेळी मी हे सांगितले आहे. पक्षनिष्ठा माझ्या बापाने मला दिली आहे. राज्यात मुंडे-महाजन नेतृत्व करत होते तेव्हा तळागळातील लोकांना एकत्र आणून मुंडे साहेबांनी लोकांना संधी दिली आहे असं पंकजा मुंडेंनी सांगितले.

...अन् पंकजा मुंडे गहिवरल्या

प्रीतम मुंडे वडिलांच्या मृत्यूनंतर निवडणूक उभ्या राहिल्या तेव्हा त्या रेकॉर्डब्रेक निवडून येणारच होत्या. यंदाच्या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांनी स्वत:च्या मेरिटवर जिंकल्या माझ्याकडे येणारी गर्दी ही पक्षाकडे येणारी आहे. मी म्हणजे पक्ष नाही. ज्यांना मंत्रिपद मिळालं त्यांच्यामुळे भाजपाला ताकद मिळणार असेल तर चांगली गोष्ट आहे. माझ्या आईला जी पेन्शन मिळते ती दुसऱ्या टर्मसाठी मिळत नाही. गोपीनाथ मुंडेसाहेबांनी मला राजकारणाचे धडे दिले. फार मोठी पुण्याई आहे. त्यांच्यामुळे आज मी इथं बसली आहे. यामागे २५-३० वर्षाचा संघर्ष आहे. मी आताही काम केले तरी २५-३० वर्ष संघर्ष करावा लागेल. नेता हा नेता असतो. जो वंचित आहे त्यांना न्याय देण्याचं काम गोपीनाथ मुंडे साहेबांनी शिकवलं आहे. अनेकदाच वंचितांना न्याय देण्यासाठी पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे पक्षाची ताकदच वाढली कमी झाली नाही अशा शब्दात पंकजा मुंडेंनी वडिलांच्या आठवणीने गहिवरल्या.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेBJPभाजपाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार