शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

पक्षात नव्याने येणाऱ्या लोकांना पदं मिळाल्याने मूळ शिवसैनिक नाराज? संजय राऊत म्हणाले की...

By प्रविण मरगळे | Updated: October 31, 2020 13:38 IST

Shiv Sena Sanjay Raut News: राजकारणात कोणीही ठरवून आलो नाही, जे ठरवून आले ते टिकत नाही, विचारांशी प्रामाणिक नाहीत ते खुर्च्या बदलत असतात त्याने काही साध्य होत नाही असं त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देराजकारणात कोणतंही पद मिळावं म्हणून आलो नाही, मराठी माणसासाठी ही शिवसेनेची चळवळ उभी राहिलीविचारांशी प्रामाणिक नाहीत ते खुर्च्या बदलत असतात त्याने काही साध्य होत नाहीसत्ता येण्यासाठी ज्यांचा हातभार लागला त्यांच्याविषयी शिवसैनिकांच्या मनात कटुता असण्याचा प्रश्न नाही

पुणे - बाळासाहेब ठाकरेंनी मला शिवसेनेत नेता करून जमाना लोटला, सामना संपादक होऊन तीन दशकं झाली तरी मी अजूनही शिवसैनिक आहे, शिवसैनिकाला वय नसतं, पण आता काळ बदलला आहे, म्हणून मी ठाकरे सिनेमा निर्माण केला, नव्या पिढीला बाळासाहेब ठाकरे कसे होते ते कळावं, आम्ही त्यांच्यासोबत कसा संघर्ष केला ते समजावं, असा प्रयत्न माझा आहे असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, मी गेल्या ३० वर्षापासून सामनाचं संपादक पद सांभाळतो, त्याआधीपासून शिवसेनेशी जोडलो आहे, राजकारणात कोणतंही पद मिळावं म्हणून आलो नाही, मराठी माणसासाठी ही शिवसेनेची चळवळ उभी राहिली, ही चळवळ महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले, राजकारणात कोणीही ठरवून आलो नाही, जे ठरवून आले ते टिकत नाही, विचारांशी प्रामाणिक नाहीत ते खुर्च्या बदलत असतात त्याने काही साध्य होत नाही असं त्यांनी सांगितले.

"...म्हणून राज्यपालांकडे जाणं हा महाराष्ट्राचा अपमान"; संजय राऊतांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका

तसेच पक्षात येणाऱ्यांना पदं दिली जात आहेत, त्यामुळे मूळ शिवसैनिक नाराज असल्याचं दिसतं या पत्रकाराच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणतात की, मूळ शिवसैनिक असा काही वाद नाही. शिवसैनिक हा शिवसैनिक आहे. उदय सामंत यांना शिवसेनेत येऊन १० वर्ष झालं, शंकरराव गडाख राजेंद्र यड्राववकर हे निवडणुकीत आले, पण त्यांनी निवडून येण्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा घेतला होता, आता शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे तर येड्रावकर सहयोगी सदस्य आहेत, कधीकधी राजकारण आणि सत्ता स्थापनेची गरज असते त्यातून असे निर्णय घेतले जातात. मूळात सत्ता येणे महत्त्वाचे आहे, सत्ता येण्यासाठी ज्यांचा हातभार लागला त्यांच्याविषयी शिवसैनिकांच्या मनात कटुता असण्याचा प्रश्न नाही, मूळात शिवसैनिक हा शिवसैनिक आहे, सगळेच मूळ आहेत असं राऊत म्हणाले.

काही लोकांमध्ये ठाकरे सरकार पंधरा दिवसांत कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या..! "

 शिवसेनेला कोणीही हिंदुत्व शिकवू नये

आमचं हिंदुत्व राजकीय नाही, घंटा बडवली अने शेंडी ठेवली म्हणजे हिंदुत्व नाही. शिवसेनेची चळवळ मराठी माणसाची जोडली आहे. आम्ही राजकारणात पदं मिळावी म्हणून आलो नाही, ही चळवळ वाढली पाहिजे, महाराष्ट्राच्या गावागावात पोहचली पाहिजे यासाठी आम्ही काम केले. शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये, आजही आक्रमकपणे आम्ही हिंदुत्व मांडतो, एक वर्षापूर्वी आमच्या हिंदुत्वावर भाजपला शंका नव्हती, राजकारणात जे ठरवून येतात ते कधी टिकत नाही, विचारांशी प्रामाणिक राहा, विचार बदलल्याने काही साध्य नाही. बाळासाहेब ठाकरे कसे निर्माण झाले हे नव्या पिढीला कळावं म्हणून ठाकरे सिनेमा काढला,  सत्ता येण्यासाठी ज्यांनी हातभार लावला त्यांच्याविषयी शिवसैनिकांच्या मनात कटुता नाही, आता सगळेच मूळ शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे नेहमी विरोधकांचे ऐकायचे, त्यांच्यासोबत चर्चा करायचे, हीच परंपरा महाराष्ट्राची आहे, काँग्रेस असो शरद पवार असो सगळ्यांनी ही परंपरा कायम राखली आहे, संवाद राखणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, राजकारणासाठी आम्ही हिंदुत्वाचा वापर केला नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो असं संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे