शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

"ठाकरे सरकारचं षडयंत्र हाणून पाडणार"; OBC आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 15:23 IST

सरकारची नियत साफ असेल तर केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याची गरज भासणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ठळक मुद्देजोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण परत येत नाही तोवर भाजपा शांत बसणार नाहीहे सरकार दोन समाजाला आमनेसामने आणण्याचा प्रयत्न करत आहेओबीसी आरक्षण संपवण्याचं काम या सरकारने केले आहे

मुंबई - OBC आरक्षणाबाबत आपलं सरकार असताना ५ जिल्ह्यात ५० टक्क्याहून अधिक आरक्षण झाल्याची केस होती. मात्र आता या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ५० टक्क्यांहून कमी असलेल्या जिल्ह्यातूनही ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी झालं आहे. राज्य मागासवर्गीय आयोग गठीत करून इम्पिरिकल डेटा तयार करून तो केवळ सुप्रीम कोर्टात द्यायचा होता आणि त्यातून अधिक वेळ आपल्याला घेता आला असता. परंतु सुप्रीम कोर्टाच्या ७ वेळा तारखा घेऊनही राज्य सरकारनं पुढाकार घेतला नाही. काही जिल्ह्यात ५० टक्क्याहून जास्त आरक्षण झालं आहे कोर्टाने हवा तो निर्णय घ्यावा असं प्रतिज्ञापत्र दिलं असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारवर केला आहे.

मुंबईत भाजपा ओबीसी कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, ठाकरे सरकारने फक्त वेळकाढूपणा केला. मूळ केस ५ जिल्ह्यातील ५० टक्क्याच्या वर आरक्षणाची होती परंतु सरकारच्या नाकर्तेपणामुळे कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत एकही जागा ओबीसींसाठी आरक्षित नाही. ओबीसी आरक्षण संपवण्याचं काम या सरकारने केले आहे. ४ मार्च २०२१ सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्यानंतर मी विधानसभेत सांगितले अद्यापही वेळ गेला नाही. कोर्टाने इम्पिरिकल डेटा मागितला आहे. जनगणनेची आवश्यकता नाही. हे मी महाधिवक्त्यासमोर मांडले. त्यांनीही ते मान्य केले. सगळीकडून लाथा पडल्यानंतर आता सरकारने मागासवर्गीय आयोग गठीत करून इम्पिरिकल डेटा जमवण्याचं काम सुरु केले असं त्यांनी सांगितले.

तसेच सरकारची नियत साफ असेल तर केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याची गरज भासणार नाही. टाइमपास करणं सरकारने बंद केले आहे. जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण परत येत नाही तोवर भाजपा शांत बसणार नाही. फेब्रुवारी निवडणुकापूर्वी ओबीसी राजकीय आरक्षण परत द्यावं. हे किती लबाडी करतायेत हे जनतेपर्यंत पोहचवा. सरकारची लबाडी लोकांपर्यंत आणावी लागेल. भाजपाचा संघर्ष सुरूच राहील. ओबीसीमध्ये ३५० जाती आहेत त्यातील २५० जाती खूप लहान आहे. त्यांची लोकसंख्या विखुरलेली आहे. या सगळ्यांना एकत्रित करून संघटित करा. भारतीय जनता पार्टी ओबीसींची पार्टी आहे. मराठा आरक्षण देताना त्यात ओबीसी आरक्षणाला संरक्षण देण्याचं कामही आपण केले. परंतु हे सरकार दोन समाजाला आमनेसामने आणण्याचा प्रयत्न करत आहे. यातून दोन समाजात वाद होऊन भांडणं लावायची आणि वेळ काढण्याचं हे धोरण सरकार करतंय. मात्र सरकारचा हा डाव भारतीय जनता पार्टी हाणून पाडेल. सामाजिक सलोखा ठेवत ओबीसींच्या आरक्षणासाठी संघर्ष करेल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय