शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

विरोधक आक्रमक, ठाकरे सरकारची आजपासून परीक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 07:09 IST

वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही, तर अधिवेशन  चालू देणार नाही, असा इशारा देणाऱ्या भाजपला राठोड यांच्या राजीनाम्याने बळ आले आहे. आता राठोड यांच्याविरुद्ध एफआयआर  दाखल झाला पाहिजे, ही मागणी विरोधक लावून धरणार आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य विधिमंडळाचे आठ दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून, राज्यावरील वाढता कर्जाचा बोजा, लॉकडाऊनमुळे घटलेले उत्पन्न या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या तोफांना सरकारला सामोरे जावे लागणार आहे. त्याच वेळी खोटे बोलायचे; पण रेटून बोलायचे हा विरोधकांचा धंदाच झाला असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही, तर अधिवेशन  चालू देणार नाही, असा इशारा देणाऱ्या भाजपला राठोड यांच्या राजीनाम्याने बळ आले आहे. आता राठोड यांच्याविरुद्ध एफआयआर  दाखल झाला पाहिजे, ही मागणी विरोधक लावून धरणार आहेत. राज्याचा अर्थसंकल्प वित्तमंत्री अजित पवार हे ८ मार्चला सादर करणार आहेत. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर झालेला प्रतिकूल परिणाम, उत्पन्न घटल्याने विकासकामांना लावावी लागलेली कात्री, केंद्र सरकारने मदतीचा अखडता घेतलेला हात, ही आव्हाने समोर असताना राज्याची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी अजित पवार कोणत्या उपाययोजना जाहीर करतात याबाबत उत्सुकता आहे.

मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रपरिषदेत तोफ डागली. केंद्र सरकारकडून जीएसटीचे २९ हजार कोटी, पुनर्वसनाचे ४ हजार ७०० कोटी रुपये येणे बाकी आहेत. वीज बिलावर ओरडणारे विरोधक मोदी आले आणि पेट्रोलने शतक गाठले त्यावर का बोलत नाहीत, असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी व मराठा आरक्षणप्रश्नी आम्ही सरकारसोबत आहोत, असे फडणवीस यांनी म्हटले, त्यांचा मी आभारी आहे, अशी पुस्ती मुख्यमंत्र्यांनी जोडली.खा. डेलकर मृत्यूप्रकरणीनिष्पक्ष चौकशी : मुख्यमंत्रीदादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोटमध्ये काही भाजप नेत्यांची नावे लिहिलेली असतील, तर मग तेही राजीनामे देणार का, असा सवाल करीत आपल्याला या आत्महत्येचे राजकारण करायचे नाही, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला हाणला. डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी निष्पक्षच होईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाUddhav Thackerayउद्धव ठाकरे