शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाच्या मुद्द्यावर राहुल गांधींना प्रश्न विचारण्याचा अधिकार विरोधकांना नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 04:10 IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दहशतवादाचे आघात सहन केले आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दहशतवादाचे आघात सहन केले आहेत. त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असे काँग्रेस नेते व दूरसंचार क्षेत्रातील ख्यातनाम तज्ज्ञ सॅम पित्रोदा यांनी म्हटले आहे.राष्ट्रीय सुरक्षा व दहशतवादाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य भाजप नेते लोकसभा निवडणूक प्रचारात राहुल गांधींवर कठोर टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पित्रोदा यांनी सांगितले की, राहुल गांधीच्या आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी दहशतवादाचे बळी ठरले. राहुल गांधी यांच्या राष्ट्रप्रेमाबद्दल शंका घेणाऱ्यांना त्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे.पित्रोदा म्हणाले की, अडवाणी यांच्याशी अनेक मुद्द्यांबाबत मतभेद असूनही मला त्यांच्याविषयी खूप आदर आहे. स्वप्रसिद्धीसाठी हपापलेले असणे व विरोधी मतप्रणालींच्या लोकांना देशद्रोही संबोधणे या विरोधात अडवाणींनी नुकतीच आपल्या ब्लॉगमध्ये ठाम भूमिका मांडली आहे. अडवाणी यांच्याकडून भाजप नेत्यांनी खूप काही शिकण्यासारखे आहे. दुसºयांना देशद्रोही ठरविण्याचा अधिकार भाजप नेत्यांना कोणी दिला? असा सवालही त्यांनी विचारला.आगामी लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला किती यश मिळेल या प्रश्नावर ते म्हणाले की, या निवडणुकांच्या निकालांतून अनेक आश्चर्याचे धक्के मिळणार आहेत. आपण विचारपूर्वक मतदान न केल्यास देशाचे भवितव्य बिघडूही शकते याचा विचार मतदारांनी करावा. नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप फरक आहे. मोदी यांनी जाणीवपूर्वक आपली प्रतिमा निर्माण केली आहे. राहुल हे प्रामाणिक युवा नेता असून त्यांना जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे. त्यांनी आजवर अनेक आव्हानांचा समर्थपणे मुकाबला केला आहे. स्वातंत्र्यासाठी लढण्याची पार्श्वभूमी असलेल्या काँग्रेस पक्षाचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. मात्र त्यांना विरोध करणाºया पक्षाचे स्वातंत्र्य चळवळीत नेमके योगदान काय आहे, असा सवालही पित्रोदा यांनी केला.।राहुल देशाचे नेतृत्व करण्यासाठी सज्जराजीव गांधी प्रचंड बहुमताच्या बळावर पंतप्रधान झाले होते. राहुल गांधी यांनी अगदी तळागाळापासून पक्षकार्याला सुरुवात केली आहे. त्यांच्यावर खूप टीका झाली. वैयक्तिक शेरेबाजीने कळस गाठला. तरीही राहुल गांधी यांचे नेतृत्व वाढत राहिले. ते आता देशाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस