शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

एकतर्फी वाटणारी लढत अखेर झाली दुरंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 04:30 IST

सातारा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि सेना - भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यातच मुख्य लढत होत आहे.

- दीपक शिंदेसातारा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि सेना - भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यातच मुख्य लढत होत आहे. दोघांच्याही हटके स्टाईलचीच मतदारांमध्ये जास्त चर्चा आहे. त्याबरोबरच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणुकीला चांगलाच रंग भरला आहे. उदयनराजे यांनी नरेंद्र मोदींवर टाकी केली आहे. कधी-कधी ते नरेंद्र पाटील यांच्या फर्राटेदार मिशी आणि माथाडी कामगारांवरील अन्यायावरही बोलतात. तर नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे यांनी गेल्या दहा वर्षांत दहशतीचे राजकारण केले, जिल्ह्याचा विकास केला नाही, उद्योग आणले नाहीत. त्यामुळे आता लोकांनी नवीन पर्याय निवडला पाहिजे, असे आवाहन करतात.जिल्ह्याच्या एका भागात प्रचंड पाऊस पडतो, तर दुसरीकडे दुष्काळ, जिल्ह्यात मेडिकल कॉलेज होत नाही. कोयना, उरमोडी, धोम - बलकवडी या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. रोजगाराच्या निमित्ताने जिल्ह्यातील तरुण युवक पुणे आणि मुंबईकडे वळू लागले आहेत. नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी काही पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि स्थानिकांना गावातच रोजगार मिळला, तर उमेदवारांना मते मागायला मतदारांनाकडे याचना करावी लागणार नाही.

सध्या केवळ एकमेकांवर आरोप करून आता मला निवडून द्या, मी तुमच्यासाठी नक्की काम करतो, असे म्हणून काहीच उपयोग होताना दिसत नाही. खासदार उदयनराजेंसाठी सुरुवातीच्या टप्प्यात ही निवडणूक अगदी सहज सोपी होती. फारसा तगडा उमेदवार नसल्याने उदयनराजेंनी मागील दोन निवडणुकांत चांगले मताधिक्य घेतले, पण यावेळी स्वत: उदयनराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अपार मेहनत घ्यावी लागत आहे. नरेंद्र पाटील यांनी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचारासाठी चांगली यंत्रणा उभी केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार उदयनराजेंसोबत असले, तरी मनाने अजूनही मदत करताना दिसत नाहीत. प्रत्येक जण आपली विधानसभेची तयारी या दृष्टीने या निवडणुकीकडे पाहत आहे.
>गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात विविध विकास कामे केली आहेत. पुढील काळातही जिल्ह्यातील अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. केवळ घोषणा करून थांबत नाही, तर प्रत्यक्षात काम केले जाते. विरोधकांना आमची कामे दिसत नाहीत. कारण ते यात्रेपुरते जिल्ह्यात येतात.- उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी>गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात कोणतीही कामे झालेली नाहीत. केवळ दहशतीच्या नावाखाली राजकारण केले जात आहे. त्यामुळे आता लोकांना विकास हवा आहे. जिल्ह्यात अनेक कामे करण्यासारखी आहेत, पण त्याकडे लक्ष्यच दिले गेले नाही. त्यामुळे या कामांकडे प्राधान्याने पहायला हवे.- नरेंद्र पाटील, शिवसेना>कळीचे मुद्देजिल्ह्यात दहशतवाद आणि रोजगाराचा प्रश्न आहे, पण याबाबत उपाययोजना उमेदवारांकडून होत नाही.उमेदवारांनी विकासाच्या मुद्दांवर बोलण्याऐवजी वैयक्तिक आरोपांवर अधिक भर दिला आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019satara-pcसातारा