शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

UdayanRaje: मारामारी झाली तर... जस्ट रिमेंबर दॅट! उद्यापासून नो लॉकडाऊन; उदयनराजे 'भडकले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 17:11 IST

Udayan Raje Protest in Satara, opposing Lockdown: कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले लॉकडाऊन हे सर्वसामान्य गरिबांची उपासमार करणारे असून हे लॉकडाऊन तत्काळ उठवा, अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला.

राज्य सरकारने कोरोनाच्या प्रकोपामुळे राज्यभरात विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच अन्य दिवस निर्बंध असल्याचे सांगत सर्वत्र बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. याविरोधात साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजेंनी आज आक्रमक पवित्रा घेतला. साताऱ्यातील पोवई नाका येथे उदयनराजेंनी चक्क कटोरा घेऊन रस्त्यावर भीक मांगो आंदोलन केले. यावेळी उद्यापासून नो लॉकडाऊन, म्हणत सरकारी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. 

निर्णय काहीपण असुदेत, उद्यापासून लॉकडाऊन उठवावा लागेल. तुम्हाला माहीत नाही कसं काय करायचं तोपर्यंत नो लॉकडाऊन. मारामारी झाली तर यू आर रिस्पॉन्सिबल, सुव्यवस्था कलेक्टरची आहे. पोलिसांना चोपून काढतील लोकं. नॉट आऊट ऑफ अँगर, बट आऊट ऑफ भंग, जस्ट रिमेंबर दॅट....अशा शब्दांत उदनराजेंनी सरकारी अधिकाऱ्याला सुनावले. 

कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले लॉकडाऊन हे सर्वसामान्य गरिबांची उपासमार करणारे असून हे लॉकडाऊन तत्काळ उठवा, अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला.

शनिवारपासून सक्तीचे लॉकडाऊन सुरू झाले आहे. या विरोधात खासदार उदयनराजे यांनी सातारा शहरात शनिवारी अनोखे भीख मांगो आंदोलन केले. जमा झालेले पैसे प्रशासनाकडे सुपूर्द करून उदयनराजेंनी कठोरपणे प्रशासनावर टीका केली. कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे, असे कुठला तज्ज्ञ सांगतो, त्याचे स्पष्टीकरण आधी जनतेला व्हायला हवे. आता केलेला लॉकडाऊन अत्यंत चुकीचा आहे. लोक नियम पाळणार नाहीत. उद्यापासून नेहमीप्रमाणे सर्व यंत्रणा सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला.

खासदार, आमदार यांच्याकडे जास्त पैसा आहे. लोकांनी त्यांच्या घरांवर दरोडे टाकावेत, असा अनाहूत सल्लादेखील उदयनराजेंनी दिला. लोक संतप्त आहेत, आता भुकेने व्याकूळदेखील होऊ लागले आहेत. त्यामुळे भुकेच्या त्रासापायी लोक पोलिसांवरदेखील हात उचलायला आता कमी पडणार नाहीत, असेदेखील त्यांनी ठणकावले.

सातारकरांच्या प्रश्नावर उदयनराजे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झालेला आहे. तसेच सरकारने याबाबत निर्णय जाहीर केला नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी सामान्य सातारकर करत आहेत.

राजेशाही असती तर त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं असतंकोरोनाचे कारण पुढे करून शासन वारंवार गोरगरिबांच्या पोटावर पाय आणत आहे. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी होते, असे लोक मरण पावतात. मात्र, भीक-भुकेपोटी मरणाचे प्रमाणदेखील वाढणार आहे, हे शासनाने लक्षात घ्यावे. कुठलेही कारण झाले की, लॉकडाऊन काय तुमच्या बापाचं राज्य आहे का? राजेशाही असती तर या सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं असतं, असा इशारादेखील उदयनराजे यांनी दिला.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस