शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

UdayanRaje: मारामारी झाली तर... जस्ट रिमेंबर दॅट! उद्यापासून नो लॉकडाऊन; उदयनराजे 'भडकले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 17:11 IST

Udayan Raje Protest in Satara, opposing Lockdown: कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले लॉकडाऊन हे सर्वसामान्य गरिबांची उपासमार करणारे असून हे लॉकडाऊन तत्काळ उठवा, अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला.

राज्य सरकारने कोरोनाच्या प्रकोपामुळे राज्यभरात विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच अन्य दिवस निर्बंध असल्याचे सांगत सर्वत्र बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. याविरोधात साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजेंनी आज आक्रमक पवित्रा घेतला. साताऱ्यातील पोवई नाका येथे उदयनराजेंनी चक्क कटोरा घेऊन रस्त्यावर भीक मांगो आंदोलन केले. यावेळी उद्यापासून नो लॉकडाऊन, म्हणत सरकारी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. 

निर्णय काहीपण असुदेत, उद्यापासून लॉकडाऊन उठवावा लागेल. तुम्हाला माहीत नाही कसं काय करायचं तोपर्यंत नो लॉकडाऊन. मारामारी झाली तर यू आर रिस्पॉन्सिबल, सुव्यवस्था कलेक्टरची आहे. पोलिसांना चोपून काढतील लोकं. नॉट आऊट ऑफ अँगर, बट आऊट ऑफ भंग, जस्ट रिमेंबर दॅट....अशा शब्दांत उदनराजेंनी सरकारी अधिकाऱ्याला सुनावले. 

कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले लॉकडाऊन हे सर्वसामान्य गरिबांची उपासमार करणारे असून हे लॉकडाऊन तत्काळ उठवा, अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला.

शनिवारपासून सक्तीचे लॉकडाऊन सुरू झाले आहे. या विरोधात खासदार उदयनराजे यांनी सातारा शहरात शनिवारी अनोखे भीख मांगो आंदोलन केले. जमा झालेले पैसे प्रशासनाकडे सुपूर्द करून उदयनराजेंनी कठोरपणे प्रशासनावर टीका केली. कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे, असे कुठला तज्ज्ञ सांगतो, त्याचे स्पष्टीकरण आधी जनतेला व्हायला हवे. आता केलेला लॉकडाऊन अत्यंत चुकीचा आहे. लोक नियम पाळणार नाहीत. उद्यापासून नेहमीप्रमाणे सर्व यंत्रणा सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला.

खासदार, आमदार यांच्याकडे जास्त पैसा आहे. लोकांनी त्यांच्या घरांवर दरोडे टाकावेत, असा अनाहूत सल्लादेखील उदयनराजेंनी दिला. लोक संतप्त आहेत, आता भुकेने व्याकूळदेखील होऊ लागले आहेत. त्यामुळे भुकेच्या त्रासापायी लोक पोलिसांवरदेखील हात उचलायला आता कमी पडणार नाहीत, असेदेखील त्यांनी ठणकावले.

सातारकरांच्या प्रश्नावर उदयनराजे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झालेला आहे. तसेच सरकारने याबाबत निर्णय जाहीर केला नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी सामान्य सातारकर करत आहेत.

राजेशाही असती तर त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं असतंकोरोनाचे कारण पुढे करून शासन वारंवार गोरगरिबांच्या पोटावर पाय आणत आहे. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी होते, असे लोक मरण पावतात. मात्र, भीक-भुकेपोटी मरणाचे प्रमाणदेखील वाढणार आहे, हे शासनाने लक्षात घ्यावे. कुठलेही कारण झाले की, लॉकडाऊन काय तुमच्या बापाचं राज्य आहे का? राजेशाही असती तर या सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं असतं, असा इशारादेखील उदयनराजे यांनी दिला.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस