शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप, भाजपाला जोरदार धक्का?; JDU आमदाराचा खळबळजनक दावा

By प्रविण मरगळे | Updated: January 8, 2021 10:34 IST

Bihar Political Update News: मागील काही दिवसांपासून भाजपाचे उमेदवार रोहित पांडेय यांची एक ऑडिओ क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देबिहारमधील जेडीयू आमदार गोपाल मंडल यांच्या विधानामुळे सध्या बिहारमधील राजकीय वातावरण पेटलं६ महिन्यानंतर मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार पायउतार होतील?जर तो आमच्यासोबत असता तर मंडल समाजाचे ३५ हजार मतं मिळून जिंकला असता

पटणा – अलीकडेच बिहारच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या, यात भाजपा आणि नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षानं काठावरचं बहुमत मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली, या निवडणुकीत भाजपाने ७४ जागा जिंकल्या तर जेडीयूला अवघ्या ४३ जागांवर समाधान मानावं लागलं. जास्त जागा जिंकूनही भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिलं. मात्र सत्तेची चावी स्वत:कडे ठेवली. मात्र आता बिहारच्या राजकारणात पुन्हा एक मोठी हालचाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिहारमधील जेडीयू आमदार गोपाल मंडल यांच्या विधानामुळे सध्या बिहारमधील राजकीय वातावरण पेटलं आहे. मंडळ यांच्या विधानामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप येणार असल्याचं बोललं जातं आहे. बिहारमध्ये सत्तेत असणाऱ्या NDA मध्ये सध्या धुसफूस वाढली आहे. यातच ६ महिन्यानंतर मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार पायउतार होतील आणि राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव राज्यात सत्ता स्थापन करतील असा दावा सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

मागील काही दिवसांपासून भाजपाचे उमेदवार रोहित पांडेय यांची एक ऑडिओ क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामुळे थंड असलेले राजकीय वातावरण पेटलं आहे. या क्लीपच्या व्हायरल झाल्यानंतर आमदार गोपाल मंडल यांची बदनामी झाली. यामुळे त्यांनी मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडली. माध्यमासमोर बोलताना गोपाल मंडल म्हणाले की, नितीश कुमार हे दबंग मुख्यमंत्री आहेत. ते ६ महिन्यानंतर पायउतार होतील, त्यानंतर राज्यात तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनतील असा दावा त्यांनी केला.

गोपाल मंडल यांनी स्वत:लाही दबंग आमदार असल्याचा दावा केला. आम्ही आदेश काढून कोणालाही जिंकवू शकतो, रोहित माझा छोटा भाऊ आहे, जर तो आमच्यासोबत असता तर मंडल समाजाचे ३५ हजार मतं मिळून जिंकला असता. मी १४ निवडणूक पाहून सांगू शकतो कोण जिंकणार आणि कोण हरणार आहे. इतकचं नाही तर ऑडिओ क्लीप व्हायरल होण्याचं खापर गोपाल मंडल यांनी भाजपाचे आमदार शैलेंद्र यांच्यावर फोडलं.

काँग्रेसचे आमदार फुटण्याचा माजी आमदाराचा दावा

बिहार विधानसभेतील काँग्रेसच्या १९ आमदारांपैकी ११ आमदार पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते व माजी आमदार भरतसिंह यांनी केला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊ पाहणारे आमदार हे मुळात याआधी दुसऱ्या पक्षांतून काँग्रेसमध्ये आले होते. या लोकांनी भरपूर पैसे देऊन विधानसभा निवडणुकांत उमेदवारीची तिकिटे विकत घेतली व ते आमदार झाले. बिहारमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार अखिलेशप्रसाद सिंह, काँग्रेसचे बिहार प्रदेशाध्यक्ष मदनमोहन झा, ज्येष्ठ काँग्रेस नेते सदानंद सिंह हेदेखील पक्षत्याग करू शकतात. या नेत्यांनी नेहमीच पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत, असा आरोप भरतसिंह यांनी केला आहे. राष्ट्रीय जनता दलाबरोबर काँग्रेसने युती करण्यास माझा ठाम विरोध होता. या युतीमुळे काँग्रेसने स्वत:चे खूप मोठे नुकसान करून घेतले.

२४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा १२३ आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला १२५ तर आरजेडीच्या नेतृत्वातील महाआघाडीला ११० जागा मिळाल्या होत्या. एनडीएमध्ये भाजपाला ७४ तर जेडीयूला ४३ आणि इतर पक्षांना ८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या आकड्यात किंचीत बदल झाला तरी नितीश कुमार सरकार अडचणीत येऊ शकते.

 

टॅग्स :BJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडNitish Kumarनितीश कुमारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार