शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

भाजपनं (नंबर)गेम केल्यानं नितीश नाराज; आज शिवसेना स्टाईलनं उत्तर देणार?

By कुणाल गवाणकर | Updated: December 27, 2020 10:19 IST

अरुणाचल प्रदेशात भाजपचा जेडीयूला धक्का; सातपैकी सहा आमदार फोडले

पटना: बिहारमध्ये संयुक्त जनता दलासोबत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानं अरुणाचल प्रदेशमध्ये संयुक्त जनता दलाला (जेडीयू) धक्का दिला. जेडीयूचे सातपैकी सहा आमदार भाजपनं फोडले. त्यामुळे जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अतिशय नाराज असल्याचं समजतं. या पार्श्वभूमीवर आज जेडीयूची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यामध्ये भाजपला धक्का देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नितीश कुमार भाजपला टक्कर देण्यासाठी त्यांचा जुनाच डाव नव्याने टाकू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपसोबत असताना शिवसेनेनं अनेक निर्णयांवरून मोदी सरकारवर तोफ डागली होती. नोटबंदीला सत्तेत राहूनही विरोध केला. पहिला आवाज आम्ही उठवला, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वारंवार म्हटलं आहे. याशिवाय काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीसोबत, बिहारमध्ये जेडीयूसोबत केलेल्या युतीवरूनही शिवसेनेनं भाजपला लक्ष्य केलं होतं. काश्मीर प्रश्न, गोमांस बंदीबद्दलची भाजपची भूमिका यासह अनेक विषयांवर शिवसेनेनं सामनामधून भाजपला लक्ष्य केलं होतं. आता तशीच रणनीती जेडीयूकडून वापरली जाऊ शकते.बिहारमध्ये एकत्र सत्तेत असताना अरुणाचल प्रदेशात भाजपनं जेडीयूला धक्का दिला. त्यामुळे आता जेडीयूकडूनही भाजपला त्यांच्याच पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. भाजपप्रणित एनडीएमध्ये राहून भाजपला धक्के देण्याची जेडीयूची रणनीती असू शकते. आज जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होत आहे. यामध्ये काही राष्ट्रीय मुद्द्यांवर भाजपपेक्षा वेगळी भूमिका घेतली जाऊ शकते. केंद्रात, राज्यात सोबत राहून भाजपवर वेळोवेळी शरसंधान साधण्याची भूमिका नितीश घेऊ शकतात. २०१२ मध्ये एनडीएसोबत; पाठिंबा मात्र यूपीएच्या उमेदवाराला२०१२ मध्ये नितीश एनडीएमध्ये होते. त्यावेळी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नितीश यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत सगळ्यांनाच धक्का दिला. त्यावेळी एनडीएनं राष्ट्रपतीच्या निवडणुकीत पी. ए. संगमा यांना उमेदवारी दिली होती. मात्र जेडीयूनं त्यांच्या ऐवजी काँग्रेसच्या प्रणब मुखर्जींना पाठिंबा दिला आणि त्यांच्याच बाजूनं मतदान केलं. शिवसेनेनंदेखील अशाच प्रकारचं राजकारण केलं होतं.२०१५ मध्ये महागठबंधनसोबत; समर्थन मात्र मोदी सरकारच्या निर्णयांचं२०१५ मध्ये नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत महागठबंधन करत विधानसभा निवडणूक जिंकली. राष्ट्रीय जनता दलापेक्षा जेडीयूचे कमी आमदार असूनही ते मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी अनेकदा केंद्र सरकारच्या निर्णयांचं समर्थन केलं. नोटबंदी, जीएसटी, बेनामी संपत्ती, सर्जिकल स्ट्राईकचं नितीश यांनी कौतुक केलं होतं.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे