शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाजपनं (नंबर)गेम केल्यानं नितीश नाराज; आज शिवसेना स्टाईलनं उत्तर देणार?

By कुणाल गवाणकर | Updated: December 27, 2020 10:19 IST

अरुणाचल प्रदेशात भाजपचा जेडीयूला धक्का; सातपैकी सहा आमदार फोडले

पटना: बिहारमध्ये संयुक्त जनता दलासोबत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानं अरुणाचल प्रदेशमध्ये संयुक्त जनता दलाला (जेडीयू) धक्का दिला. जेडीयूचे सातपैकी सहा आमदार भाजपनं फोडले. त्यामुळे जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अतिशय नाराज असल्याचं समजतं. या पार्श्वभूमीवर आज जेडीयूची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यामध्ये भाजपला धक्का देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नितीश कुमार भाजपला टक्कर देण्यासाठी त्यांचा जुनाच डाव नव्याने टाकू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपसोबत असताना शिवसेनेनं अनेक निर्णयांवरून मोदी सरकारवर तोफ डागली होती. नोटबंदीला सत्तेत राहूनही विरोध केला. पहिला आवाज आम्ही उठवला, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वारंवार म्हटलं आहे. याशिवाय काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीसोबत, बिहारमध्ये जेडीयूसोबत केलेल्या युतीवरूनही शिवसेनेनं भाजपला लक्ष्य केलं होतं. काश्मीर प्रश्न, गोमांस बंदीबद्दलची भाजपची भूमिका यासह अनेक विषयांवर शिवसेनेनं सामनामधून भाजपला लक्ष्य केलं होतं. आता तशीच रणनीती जेडीयूकडून वापरली जाऊ शकते.बिहारमध्ये एकत्र सत्तेत असताना अरुणाचल प्रदेशात भाजपनं जेडीयूला धक्का दिला. त्यामुळे आता जेडीयूकडूनही भाजपला त्यांच्याच पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. भाजपप्रणित एनडीएमध्ये राहून भाजपला धक्के देण्याची जेडीयूची रणनीती असू शकते. आज जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होत आहे. यामध्ये काही राष्ट्रीय मुद्द्यांवर भाजपपेक्षा वेगळी भूमिका घेतली जाऊ शकते. केंद्रात, राज्यात सोबत राहून भाजपवर वेळोवेळी शरसंधान साधण्याची भूमिका नितीश घेऊ शकतात. २०१२ मध्ये एनडीएसोबत; पाठिंबा मात्र यूपीएच्या उमेदवाराला२०१२ मध्ये नितीश एनडीएमध्ये होते. त्यावेळी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नितीश यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत सगळ्यांनाच धक्का दिला. त्यावेळी एनडीएनं राष्ट्रपतीच्या निवडणुकीत पी. ए. संगमा यांना उमेदवारी दिली होती. मात्र जेडीयूनं त्यांच्या ऐवजी काँग्रेसच्या प्रणब मुखर्जींना पाठिंबा दिला आणि त्यांच्याच बाजूनं मतदान केलं. शिवसेनेनंदेखील अशाच प्रकारचं राजकारण केलं होतं.२०१५ मध्ये महागठबंधनसोबत; समर्थन मात्र मोदी सरकारच्या निर्णयांचं२०१५ मध्ये नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत महागठबंधन करत विधानसभा निवडणूक जिंकली. राष्ट्रीय जनता दलापेक्षा जेडीयूचे कमी आमदार असूनही ते मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी अनेकदा केंद्र सरकारच्या निर्णयांचं समर्थन केलं. नोटबंदी, जीएसटी, बेनामी संपत्ती, सर्जिकल स्ट्राईकचं नितीश यांनी कौतुक केलं होतं.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे