शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

भाजपनं (नंबर)गेम केल्यानं नितीश नाराज; आज शिवसेना स्टाईलनं उत्तर देणार?

By कुणाल गवाणकर | Updated: December 27, 2020 10:19 IST

अरुणाचल प्रदेशात भाजपचा जेडीयूला धक्का; सातपैकी सहा आमदार फोडले

पटना: बिहारमध्ये संयुक्त जनता दलासोबत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानं अरुणाचल प्रदेशमध्ये संयुक्त जनता दलाला (जेडीयू) धक्का दिला. जेडीयूचे सातपैकी सहा आमदार भाजपनं फोडले. त्यामुळे जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अतिशय नाराज असल्याचं समजतं. या पार्श्वभूमीवर आज जेडीयूची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यामध्ये भाजपला धक्का देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नितीश कुमार भाजपला टक्कर देण्यासाठी त्यांचा जुनाच डाव नव्याने टाकू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपसोबत असताना शिवसेनेनं अनेक निर्णयांवरून मोदी सरकारवर तोफ डागली होती. नोटबंदीला सत्तेत राहूनही विरोध केला. पहिला आवाज आम्ही उठवला, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वारंवार म्हटलं आहे. याशिवाय काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीसोबत, बिहारमध्ये जेडीयूसोबत केलेल्या युतीवरूनही शिवसेनेनं भाजपला लक्ष्य केलं होतं. काश्मीर प्रश्न, गोमांस बंदीबद्दलची भाजपची भूमिका यासह अनेक विषयांवर शिवसेनेनं सामनामधून भाजपला लक्ष्य केलं होतं. आता तशीच रणनीती जेडीयूकडून वापरली जाऊ शकते.बिहारमध्ये एकत्र सत्तेत असताना अरुणाचल प्रदेशात भाजपनं जेडीयूला धक्का दिला. त्यामुळे आता जेडीयूकडूनही भाजपला त्यांच्याच पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. भाजपप्रणित एनडीएमध्ये राहून भाजपला धक्के देण्याची जेडीयूची रणनीती असू शकते. आज जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होत आहे. यामध्ये काही राष्ट्रीय मुद्द्यांवर भाजपपेक्षा वेगळी भूमिका घेतली जाऊ शकते. केंद्रात, राज्यात सोबत राहून भाजपवर वेळोवेळी शरसंधान साधण्याची भूमिका नितीश घेऊ शकतात. २०१२ मध्ये एनडीएसोबत; पाठिंबा मात्र यूपीएच्या उमेदवाराला२०१२ मध्ये नितीश एनडीएमध्ये होते. त्यावेळी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नितीश यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत सगळ्यांनाच धक्का दिला. त्यावेळी एनडीएनं राष्ट्रपतीच्या निवडणुकीत पी. ए. संगमा यांना उमेदवारी दिली होती. मात्र जेडीयूनं त्यांच्या ऐवजी काँग्रेसच्या प्रणब मुखर्जींना पाठिंबा दिला आणि त्यांच्याच बाजूनं मतदान केलं. शिवसेनेनंदेखील अशाच प्रकारचं राजकारण केलं होतं.२०१५ मध्ये महागठबंधनसोबत; समर्थन मात्र मोदी सरकारच्या निर्णयांचं२०१५ मध्ये नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत महागठबंधन करत विधानसभा निवडणूक जिंकली. राष्ट्रीय जनता दलापेक्षा जेडीयूचे कमी आमदार असूनही ते मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी अनेकदा केंद्र सरकारच्या निर्णयांचं समर्थन केलं. नोटबंदी, जीएसटी, बेनामी संपत्ती, सर्जिकल स्ट्राईकचं नितीश यांनी कौतुक केलं होतं.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे