शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

"नितीशकुमार व भाजपाला यंदा मोठे आव्हान"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 05:40 IST

भाजपाला पुन्हा केंद्रातील सत्ता मिळवण्यासाठी जी राज्ये महत्त्वाची आहेत, त्यात बिहारचा समावेश होतो, कारण या राज्यांतून तब्बल ४0 खासदार निवडून येतात.

लखनऊः भाजपाला पुन्हा केंद्रातील सत्ता मिळवण्यासाठी जी राज्ये महत्त्वाची आहेत, त्यात बिहारचा समावेश होतो, कारण या राज्यांतून तब्बल ४0 खासदार निवडून येतात. त्यापैकी ३१ जागांवर गेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपा व मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आले होते. एकट्या भाजपाला २२ जागांवर विजय मिळाला होता, तर रामविलास पासवान यांच्या पक्षाला ६ आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टी यांचे ३ उमेदवार निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व नितीश कुमार यांचा जनता दल (संयुक्त) एकत्र होते आणि तिघांना मिळून ९ जागा जिंकता आल्या होत्या.पण मधल्या काळात बरेच बदल राज्यात होत गेले. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांत लालू यादव यांचा राजद, नितीशकुमारांचा जेडीयू, काँग्रेस यांनी बाजी मारली. या तिन्ही पक्षांनी मिळून राज्यातील सत्ता मिळवली. नितीशकुमार यांनी राजद, काँग्रेस व मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर सरकार बनवले. त्यावेळी नितीशकुमार यांच्या पक्षाला ६९, तर राजदला ७९ जागा होत्या आणि काँग्रेसचे आमदार होते २७. तरीही दोघांनी नितीशकुमार यांना पाठिंबा दिला.पण अचानक नितीशकुमार यांनी लालू व काँग्रेस यांची साथ सोडली आणि भाजपाप्रणित रालोआच्या तंबूत ते शिरले. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद शाबूतच राहिले. तेव्हाच्या वाऱ्याचा कल पाहूनच त्यांनी भाजपाशी घरोबा केला, हे स्पष्ट दिसत होते.पण हिंदुस्थान अवाम पार्टीचे जीतनराम मांझी यांचा पक्ष विरोधी आघाडीत आला. केंद्रात राज्यमंत्री असलेले राष्ट्रीय लोक समता पार्टीचे सर्वेसर्वा उपेंद्र कुशवाह यांनी रालोआ आणि भाजपाची संगत सोडून विरोधकांच्या आघाडीचा रस्ता धरला. भाजपाविरोधी वातावरण तयार होत असल्याचे दिसत असल्यानेच कुशवाह यांनी हा निर्णय घेतला.आता लोकसभा निवडणुकांसाठी तेजस्वी यादव जोरात कामाला लागले आहेत. लालू यादव यांचे दुसरे पुत्र तेजप्रताप यादव हे भरवशाचे नाहीत. पण राष्ट्रवादीचे नेते व बिहारमधून त्या पक्षातर्फे निवडून आलेले एकमेव खा. तारीक अन्वर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, तेही सध्या सभा घेत आहेत. राजद व काँग्रेसचे कार्यकर्तेही जोमात आहेत.दुसरीकडे गेल्या काही काळात नितीशकुमार यांच्याविषयी लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. सत्ताधारी पक्षाविषयी अशी नाराजी लवकरच होते. त्यात नितीशकुमार यांनी घरोबा बदलल्याचा राग लोकांमध्ये आहे. दारूबंदीमुळे राज्याचे उत्पन्न घटले आणि मद्यपीही चिडले आहेत. बिहारमध्ये जातीचे राजकारण व समीकरण जोरात चालते. आता जीतनराम मांझी यांच्यामुळे दलित, उपेंद्र कुशवाह यांच्यामुळे कुर्मी तसेच अन्य मागास जाती, राजदमुळे यादव व मुस्लीम आदींचे समीकरण जुळून येताना दिसत आहे. काँग्रेसची अद्यापही पारंपरिक व्होट बँक असून, ती मते या आघाडीलाच जातील, असा अंदाज आहे.मात्र भाजपा व नितीशकुमार हेही कामाला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर व्यासपीठावर बसणार नाही, हा पण नितीशकुमार लवकरच मोडणार असून, राज्यात त्यांच्या एकत्र सभा होणार आहेत. भाजपा नेते व उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी प्रत्येक मतदारसंघाचा दौरा करून बुथनिहाय कार्यकर्त्यांना काम आखून दिले आहे. संघटनात्मकदृष्ट्या भाजपाच बिहारमधील सर्वात बळकट पक्ष आहे. तशी संघटना अन्य एकाही पक्षाकडे नाही. पण जातीचे राजकारण जमले की मग सारे एकत्र येतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे यंदाची लढाई संघटनात्मक ताकद विरुद्ध जातींचे समीकरण अशीच दिसत आहे. त्यात जातींचे समीकरण सध्या तरी वरचढ दिसते.>दोन सिन्हा ठरले अडचणीचेबिहारच्या पाटणासाहिब मतदारसंघातून तीनदा निवडून आलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा भाजपाशी केवळ अधिकृत काडीमोड होणे बाकी आहे. त्यांनी पाटणासाहिबमधूनच विरोधकांच्या आघाडीतर्फे उभे करावे, असा प्रयत्न आहे. भाजपाशी काडिमोड घेतलेले आणखी एक मोठे नेते म्हणजे यशवंत सिन्हा. तेही बिहारचे आहेत. दोन सिन्हांमुळे बिहारमधील कायस्थ समाज भाजपाविरोधात जाईल, असे बोलले जात आहे.

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९