शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

नितीन राऊतांचं ऊर्जामंत्रिपद जाणार? काँग्रेसमधील पक्षसंघटनेत पुन्हा मोठी उलथापालथ

By प्रविण मरगळे | Updated: February 10, 2021 10:44 IST

Congress Nana Patole, Nitin Raut News: नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू आहे

ठळक मुद्देनाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरूविधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांपासून के. सी पाडवी यांच्या नावाची चर्चा सुरु होतीनवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली

मुंबई – काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्यात येत आहे, यात विधानसभा अध्यक्षपदी असलेले नाना पटोले यांना राजीनामा द्यायला सांगून त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्षाच्या हायकमांड सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त केली होती, त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत होती.

नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू आहे, तत्पूर्वी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पटोले आणि राऊत यांच्या खांदेपालट होणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांपासून के. सी पाडवी यांच्या नावाची चर्चा सुरु होती, यातच आता संग्राम थोपटे हे नवीन नाव पुढे आलं आहे.

भोर मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा विधानसभा अध्यक्षपदासाठी होत आहे. प्रदेशाध्यक्षपदी विदर्भाला मान दिल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्राला अध्यक्षपदाचा मान देऊन प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न काँग्रेस हायकमांडकडून होऊ शकतो. ठाकरे मंत्रिमंडळात संग्राम थोपटे यांना मंत्री केलं नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस कार्यालयात तोडफोड केल्याची घटना घडली होती, मात्र ते कार्यकर्ते माझे नाहीत असं थोपटेंनी स्पष्ट केले होते, मंत्रिपद हुकल्याने आता त्यांना विधानसभा अध्यक्षपदी संधी देणार का? हे पाहणं गरजेचे आहे, याबाबत टीव्ही ९ने बातमी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला होता, त्यावेळी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास कोणी तयार नव्हतं, त्यात बाळासाहेब थोरात यांच्यावर हायकमांडने विश्वास दाखवत त्यांच्यावरही ही जबाबदारी टाकण्यात आली होती, त्यानंतर राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळालं, सत्तेत येण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली होती, आता प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांना संधी देण्यात आली आहे, पण पटोले फक्त प्रदेशाध्यक्षपद सांभाळणार की त्यांना मंत्रिपदही मिळणार हे आगामी काळात कळेल, परंतु तुर्तास ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे खातं नाना पटोलेंना मिळेल आणि राऊत यांना अध्यक्षपद दिलं जाईल असंही सांगण्यात येत आहे. परंतु नितीन राऊत मंत्रिपद सोडतील का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसNitin Rautनितीन राऊतNana Patoleनाना पटोले