शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीचं सरकार असताना राष्ट्रवादी भाजपासोबत यायला तयार होती, तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 16:17 IST

सगळ्या गोष्टी आपल्य बाजूने असताना, हे सरकार गेलं कसं, यावर विश्वास बसत नव्हता त्यानंतर १०-१२ दिवसांत नॉर्मल झालो. एक्स्ट्रिम दुःख किंवा आनंद होतं नाही. नंतर जो रोल मिळाला त्यात घुसलो आणि काम सुरू केलं असं फडणवीसांनी सांगितले.

ठळक मुद्देदोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी आणि भाजपा सोबत येण्याची स्थिती आली होतीपंतप्रधानांचा निरोप अमित शहांनी थेट शरद पवारांना सांगितला होता.बाळासाहेबांनी कधीच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्यास मान्यता दिली नसती

मुंबई  - राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीने अनेक गौप्यस्फोट होत आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यात राजकीय उलथापालथ होऊन देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद गेले तर इतक्या वर्षाच्या मित्रपक्षाने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ दिली, मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात संघर्ष झाला, हा संघर्ष इतका टोकाला गेला की दोन्ही पक्ष वेगळे झाले आणि शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात मुख्यमंत्री विराजमान केला.

द इनसाइडरला मुलाखत देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी योगी नाही, माणूस आहे, आनंदही होतं, दुःखही होतं. २०१४ मध्ये मी मुख्यमंत्री बनेन याची कल्पना नव्हती पण तसे संकेत मिळाले होते. पण या कानालाही कळू द्यायचं नाही, त्याप्रमाणे कधी बोललो नाही. आई, पत्नीलाही सांगितलं नव्हतं. पण २०१९ मध्ये माझ्यासह सगळ्यांना माहीत होतं मी मुख्यमंत्री बनणार पण तेव्हा मी झालो नाही, दुःख नक्कीच झालं, काही दिवस मला विश्वास बसला नाही, हे अचानक असं का घडलं? त्यानंतर कालांतराने ते स्वीकारलं, शिवसेनेचा राग निश्चितच आला होता. सरकार हातातून निसटतंय. सगळ्या गोष्टी आपल्य बाजूने असताना, हे सरकार गेलं कसं, यावर विश्वास बसत नव्हता त्यानंतर १०-१२ दिवसांत नॉर्मल झालो. एक्स्ट्रिम दुःख किंवा आनंद होतं नाही. नंतर जो रोल मिळाला त्यात घुसलो आणि काम सुरू केलं असं त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट; भाजपासोबत सरकार बनवायची थेट शरद पवारांची होती ऑफर, पण...

तसेच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारासाठी युती म्हणून मी त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गेलो होतो, विधानसभा निवडणुकीवेळी अनेक भाजपाच्या बंडखोरांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले, पण शिवसेनेची बंडखोरी भाजपा उमेदवारासमोर कायम राहिली. उद्धव ठाकरे भाजपा उमेदवाराच्या प्रचाराला कधी गेले नाहीत, पण मी शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात गेलो होतो. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपाने कधीच शब्द दिला नाही, या सर्वच गोष्टीतून मार्ग निघाला असता पण उद्धव ठाकरेंनी बोलणं टाळलं, फोन घेतले नाहीत, मागील ५ वर्षात एवढा संवाद असताना फोनवरुन बोलण्यासही नकार दिला त्याचं दु:ख वाटलं. तुमचं माझं पटत नाही तर तुम्ही तसं फोनवरुन स्पष्ट सांगितलं पाहिजे, व्यक्तिगत संबंधांना तडा नाही पण मनात नेहमी हे दु:ख राहणार आहे, त्यांची आणि माझी चर्चा झाली असती तर आता ज्याप्रकारे सरकार चालवतायेत तसं ते चालवावं लागलं नसतं, बाळासाहेब ठाकरेंना वचन देताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री बनवणार असं सांगितले होते का? बाळासाहेबांनी हे कधीच मान्य केले नसते असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.

त्याचसोबत दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी आणि भाजपा सोबत येण्याची स्थिती आली होती, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला एकटं पाडा, पण शिवसेनेला सोडू नका इतकं स्पष्टपणे सांगितले होते. पंतप्रधानांचा निरोप अमित शहांनी थेट शरद पवारांना सांगितला होता. भाजपासोबत यायला राष्ट्रवादी पूर्णपणे तयार होती, शिवसेनेने आता काय मिळवलं माहिती नाही. भलेही ते बाळासाहेबांचे सुपूत्र असतील त्यांचा अधिकार आहे, पण मी ज्या बाळासाहेबांना ओळखतो त्यांनी कधीही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्यास मान्यता दिली नसती असं देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासाने सांगितले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

"'मातोश्री'विरुद्धच्या बंडासाठी 'कृष्णकुंज'ला कुणाची चिथावणी होती सगळ्यांना माहीत आहे!"

बाबा रामदेव यांच्या पंतजलीकडून ‘कोरोनिल’ लॉन्च; ‘इतक्या’ दिवसांत कोरोना रुग्ण बरा होण्याचा दावा

संभाव्य कोरोनाग्रस्ताचा तडफडून मृत्यू; तब्बल २० तास मृतदेह घराबाहेरच पडून राहिला, त्यानंतर...

...अन् डॉक्टर आमदाराने अनेक किमी पायपीट करुन सीमेवरील सुरक्षा जवानाचे प्राण वाचवले!

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाShiv Senaशिवसेना