शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

“सर्व विरोधकांना एकत्र आणणं हाच शरद पवारांचा अजेंडा”: नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 18:19 IST

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीला गेले असून, सर्व विरोधकांची बैठक होणार आहे.

ठळक मुद्देहे सरकार किमान समान कार्यक्रमावर उभारण्यात आलयसरकारच्या कामावर लोक समाधानी महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे काम करेल - नवाब मलिक

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारबाबत साशंकता निर्माण करणारे वातावरण तयार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वबळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी टोलेबाजी केल्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बने खळबळ उडाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीला गेले असून, सर्व विरोधकांची बैठक होणार आहे. यावर, सर्व विरोधकांना एकत्र आणणं हाच शरद पवार यांचा अजेंडा आहे, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे. (ncp nawab malik says maha vikas aghadi govt will complete 5 years)

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना नवाब मलिक यांनी या सर्व प्रकारावर भाष्य केले. मोजके पक्ष सोबत नाहीत पण हळूहळू त्यांना एकत्र कसे आणता येईल हे ठरवण्यात येईल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

“कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा”; भाजपचा पलटवार

महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे काम करेल

हे सरकार किमान समान कार्यक्रमावर उभारण्यात आले आहे. सरकारच्या कामावर लोक समाधानी आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्षे काम करणार आहे. आज सरकार जाईल, उद्या जाईल या आशेवर भाजपा दररोज एक एक नवीन नवीन विषय काढत आहे. आज-उद्या सरकार पडेल अशी एक एक तारीख सांगत आहेत. मात्र त्यांची एकही तारीख योग्य ठरत नाही किंवा त्यांची भविष्यवाणी खरी ठरत नाही, असा टोला नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना लगावला. 

“मुस्लिम असल्यामुळेच मला जिहादी आणि देशविरोधी ठरवलं गेलं”: आसिफचा दावा

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरात भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली असून, २०२४ निवडणुकीपूर्वी विरोधकांना एकत्र आणण्याची रणनिती शरद पवार आखत असल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारी दुपारी ४ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र मंचच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच भाग घेणार आहेत. राष्ट्र मंचची पायाभरणी २०१८ साली यशवंत सिन्हा यांनी केली होती.  

टॅग्स :PoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा