शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

'हे' तर मोदी सरकारचं शूद्रपणाचं राजकारण; शरद पवारांनी पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर आसूड ओढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 12:20 IST

शरद पवारांच्या या मुलाखतीत प्रियंका गांधी यांना मोदी सरकारने राहत्या घराच्या बाहेर काढलं असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारला होता.

ठळक मुद्देभाजपाच्या हातात सरकार चालवायला देणे हे शिवसेनेच्या हिताचं नाहीसत्तेचा दर्प डोक्यात गेला की अशाप्रकारे गोष्टी होत असतातसत्ता ही विनयाने वापरायची असते

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत ही राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक मुलाखत ठरेल असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. या मुलाखतीत शरद पवारांनी देशाच्या राजकारणापासून राज्याच्या राजकारणापर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या मुलाखतीचे प्रोमो प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यात पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केल्याचं दिसून येते.

शरद पवारांच्या या मुलाखतीत प्रियंका गांधी यांना मोदी सरकारने राहत्या घराच्या बाहेर काढलं या प्रश्नाला उत्तर देताना हे मोदी सरकारचं शुद्रपणाचं राजकारण आहे. सत्ता ही विनयाने वापरायची असते, सत्तेचा दर्प डोक्यात गेला की अशाप्रकारे गोष्टी होत असतात असं टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोडलं आहे. ही संपूर्ण मुलाखत उद्यापासून तीन टप्प्यात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

तसेच उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत ही शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे. भाजपाच्या हातात सरकार चालवायला देणे हे शिवसेनेच्या हिताचं नाही, राज्यात सेंट्रल ऑफ पॉवर एकच असली पाहिजे असं पवारांनी सांगितले. तसेच पार्लांमेटमध्ये नरेंद्र मोदींच्या चेंबरमध्ये जाऊन काय संवाद झाला याबाबतही पवारांनी मुलाखतीत खुलासा केला आहे.

शरद पवारांचा विरोधकांवर घणाघात; भाजपाच्या हातात सरकार चालवायला देणं म्हणजे...

दरम्यान, बुधवारी या मुलाखतीचा पहिला टिझर प्रसिद्ध झाला. त्यात महाराष्ट्रातील सत्ता बदल हा अपघात होता काय?' असा मथळा असलेला हा व्हिडिओ उत्कंठा वाढवणारा ठरला. शरद पवारांची मुलाखत ऐतिहासिक ठरेल. अशी मुलाखत होणे नाही, असा दावा राऊत यांनी केला आहे. 'शरद पवार यांची मुलाखत घेण्याचं आधीच ठरलं होतं. शरद पवार हे राज्यातील देशातील प्रमुख नेते आहेत. लोकांनी बघितलेले आणि मी पाहिलेले पवार वेगळे आहेत. त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले, बदनामीकारक विधानं केली गेली. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हा लोकांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण मी म्हटलं होतं की, शरद पवार सरकार स्थापन करतील. त्यांनी बसलेली खीळ तोडून सरकार स्थापन केलं,' असं राऊत यांनी म्हटलं होतं.

तर संजय राऊत यांची एक मुलाखत घ्या आणि त्याला ‘एक नारद, शिवसेना गारद’ असे नाव द्या अशा संदेश मला व्हाट्सअप आल्याचा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढला. तसेच, सामना हे सध्या बाळासाहेबांचा सामना राहिला नाही. सामना सध्या वाचतंच, कोण? असे म्हणत सामना वर्तमानपत्र आपण वाचत नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा खपवून घेणार नाही; ‘लोकमत’च्या बातमीची सरकारकडून दखल

स्टँडअप कॉमेडियनने केली छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा; सोशल मीडियात संतापाची लाट

गँगस्टर विकास दुबेचा खात्मा, जप्त केलेल्या ‘त्या’काळ्या बॅगेतून उलगडणार अनेक रहस्य

जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, होता आणि यापुढेही राहील; पाकला सुनावलं

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीPriyanka Gandhiप्रियंका गांधी