शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

'हे' तर मोदी सरकारचं शूद्रपणाचं राजकारण; शरद पवारांनी पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर आसूड ओढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 12:20 IST

शरद पवारांच्या या मुलाखतीत प्रियंका गांधी यांना मोदी सरकारने राहत्या घराच्या बाहेर काढलं असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारला होता.

ठळक मुद्देभाजपाच्या हातात सरकार चालवायला देणे हे शिवसेनेच्या हिताचं नाहीसत्तेचा दर्प डोक्यात गेला की अशाप्रकारे गोष्टी होत असतातसत्ता ही विनयाने वापरायची असते

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत ही राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक मुलाखत ठरेल असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. या मुलाखतीत शरद पवारांनी देशाच्या राजकारणापासून राज्याच्या राजकारणापर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या मुलाखतीचे प्रोमो प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यात पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केल्याचं दिसून येते.

शरद पवारांच्या या मुलाखतीत प्रियंका गांधी यांना मोदी सरकारने राहत्या घराच्या बाहेर काढलं या प्रश्नाला उत्तर देताना हे मोदी सरकारचं शुद्रपणाचं राजकारण आहे. सत्ता ही विनयाने वापरायची असते, सत्तेचा दर्प डोक्यात गेला की अशाप्रकारे गोष्टी होत असतात असं टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोडलं आहे. ही संपूर्ण मुलाखत उद्यापासून तीन टप्प्यात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

तसेच उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत ही शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे. भाजपाच्या हातात सरकार चालवायला देणे हे शिवसेनेच्या हिताचं नाही, राज्यात सेंट्रल ऑफ पॉवर एकच असली पाहिजे असं पवारांनी सांगितले. तसेच पार्लांमेटमध्ये नरेंद्र मोदींच्या चेंबरमध्ये जाऊन काय संवाद झाला याबाबतही पवारांनी मुलाखतीत खुलासा केला आहे.

शरद पवारांचा विरोधकांवर घणाघात; भाजपाच्या हातात सरकार चालवायला देणं म्हणजे...

दरम्यान, बुधवारी या मुलाखतीचा पहिला टिझर प्रसिद्ध झाला. त्यात महाराष्ट्रातील सत्ता बदल हा अपघात होता काय?' असा मथळा असलेला हा व्हिडिओ उत्कंठा वाढवणारा ठरला. शरद पवारांची मुलाखत ऐतिहासिक ठरेल. अशी मुलाखत होणे नाही, असा दावा राऊत यांनी केला आहे. 'शरद पवार यांची मुलाखत घेण्याचं आधीच ठरलं होतं. शरद पवार हे राज्यातील देशातील प्रमुख नेते आहेत. लोकांनी बघितलेले आणि मी पाहिलेले पवार वेगळे आहेत. त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले, बदनामीकारक विधानं केली गेली. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हा लोकांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण मी म्हटलं होतं की, शरद पवार सरकार स्थापन करतील. त्यांनी बसलेली खीळ तोडून सरकार स्थापन केलं,' असं राऊत यांनी म्हटलं होतं.

तर संजय राऊत यांची एक मुलाखत घ्या आणि त्याला ‘एक नारद, शिवसेना गारद’ असे नाव द्या अशा संदेश मला व्हाट्सअप आल्याचा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढला. तसेच, सामना हे सध्या बाळासाहेबांचा सामना राहिला नाही. सामना सध्या वाचतंच, कोण? असे म्हणत सामना वर्तमानपत्र आपण वाचत नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा खपवून घेणार नाही; ‘लोकमत’च्या बातमीची सरकारकडून दखल

स्टँडअप कॉमेडियनने केली छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा; सोशल मीडियात संतापाची लाट

गँगस्टर विकास दुबेचा खात्मा, जप्त केलेल्या ‘त्या’काळ्या बॅगेतून उलगडणार अनेक रहस्य

जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, होता आणि यापुढेही राहील; पाकला सुनावलं

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीPriyanka Gandhiप्रियंका गांधी