शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

'हे' तर मोदी सरकारचं शूद्रपणाचं राजकारण; शरद पवारांनी पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर आसूड ओढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 12:20 IST

शरद पवारांच्या या मुलाखतीत प्रियंका गांधी यांना मोदी सरकारने राहत्या घराच्या बाहेर काढलं असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारला होता.

ठळक मुद्देभाजपाच्या हातात सरकार चालवायला देणे हे शिवसेनेच्या हिताचं नाहीसत्तेचा दर्प डोक्यात गेला की अशाप्रकारे गोष्टी होत असतातसत्ता ही विनयाने वापरायची असते

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत ही राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक मुलाखत ठरेल असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. या मुलाखतीत शरद पवारांनी देशाच्या राजकारणापासून राज्याच्या राजकारणापर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या मुलाखतीचे प्रोमो प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यात पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केल्याचं दिसून येते.

शरद पवारांच्या या मुलाखतीत प्रियंका गांधी यांना मोदी सरकारने राहत्या घराच्या बाहेर काढलं या प्रश्नाला उत्तर देताना हे मोदी सरकारचं शुद्रपणाचं राजकारण आहे. सत्ता ही विनयाने वापरायची असते, सत्तेचा दर्प डोक्यात गेला की अशाप्रकारे गोष्टी होत असतात असं टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोडलं आहे. ही संपूर्ण मुलाखत उद्यापासून तीन टप्प्यात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

तसेच उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत ही शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे. भाजपाच्या हातात सरकार चालवायला देणे हे शिवसेनेच्या हिताचं नाही, राज्यात सेंट्रल ऑफ पॉवर एकच असली पाहिजे असं पवारांनी सांगितले. तसेच पार्लांमेटमध्ये नरेंद्र मोदींच्या चेंबरमध्ये जाऊन काय संवाद झाला याबाबतही पवारांनी मुलाखतीत खुलासा केला आहे.

शरद पवारांचा विरोधकांवर घणाघात; भाजपाच्या हातात सरकार चालवायला देणं म्हणजे...

दरम्यान, बुधवारी या मुलाखतीचा पहिला टिझर प्रसिद्ध झाला. त्यात महाराष्ट्रातील सत्ता बदल हा अपघात होता काय?' असा मथळा असलेला हा व्हिडिओ उत्कंठा वाढवणारा ठरला. शरद पवारांची मुलाखत ऐतिहासिक ठरेल. अशी मुलाखत होणे नाही, असा दावा राऊत यांनी केला आहे. 'शरद पवार यांची मुलाखत घेण्याचं आधीच ठरलं होतं. शरद पवार हे राज्यातील देशातील प्रमुख नेते आहेत. लोकांनी बघितलेले आणि मी पाहिलेले पवार वेगळे आहेत. त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले, बदनामीकारक विधानं केली गेली. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हा लोकांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण मी म्हटलं होतं की, शरद पवार सरकार स्थापन करतील. त्यांनी बसलेली खीळ तोडून सरकार स्थापन केलं,' असं राऊत यांनी म्हटलं होतं.

तर संजय राऊत यांची एक मुलाखत घ्या आणि त्याला ‘एक नारद, शिवसेना गारद’ असे नाव द्या अशा संदेश मला व्हाट्सअप आल्याचा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढला. तसेच, सामना हे सध्या बाळासाहेबांचा सामना राहिला नाही. सामना सध्या वाचतंच, कोण? असे म्हणत सामना वर्तमानपत्र आपण वाचत नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा खपवून घेणार नाही; ‘लोकमत’च्या बातमीची सरकारकडून दखल

स्टँडअप कॉमेडियनने केली छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा; सोशल मीडियात संतापाची लाट

गँगस्टर विकास दुबेचा खात्मा, जप्त केलेल्या ‘त्या’काळ्या बॅगेतून उलगडणार अनेक रहस्य

जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, होता आणि यापुढेही राहील; पाकला सुनावलं

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीPriyanka Gandhiप्रियंका गांधी