शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नवाब मलिकांचा इशारा; भाजपा आमदार अतुल भातखळकर अन् प्रसाद लाड यांचं पितळ उघडं पाडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 16:54 IST

भाजपच्या काही लोकांना राजकारणाशिवाय काही करता येत नाही ही वस्तूस्थिती आहे. गेल्या पाच दिवसात भाजपाने सरकार कामच करत नाही, रेमडेसिवीर उपलब्ध करुन देत नसल्याचा प्रचार केला आहे परंतु सत्यपरिस्थिती वेगळी असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

ठळक मुद्देतुमचा कारभार किती क्रिस्टल आहे याचा भांडाफोड आज ना उद्या करणारच, भतीजाचा भाग किती कुणी खाल्ला हेही समोर आणणार कांदिवली - मालाडचे जे आमदार आहेत ते कुठे रात्री बसतात, दुपारी कुठे बसतात. त्यांच्याजवळचे लोक ईडीमार्फत तुरुंगात आहेतमंत्री नवाब मलिकांनी दिला भाजपा आमदारांना इशारा...लवकरच भांडाफोड करणार असल्याचा दावा

मुंबई – रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून राज्यात सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याने विरोधकांवर गंभीर आरोप लावले. त्यानंतर या प्रकरणात एका फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला सोडवण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकरांनी रात्री पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणात आमदार प्रसाद लाड आणि अतुल भातखळकरांनी नवाब मलिकांवर जोरदार टीका केली होती. त्यावरून नवाब मलिकांनी या दोन्ही आमदारांना इशारा दिला आहे.(NCP Nawab Malik Warning to BJP Prasad lad and Atul Bhatkhalkar)  

नवाब मलिक म्हणाले की, माझा राजीनामा मागताय, पोलीस ठाण्यात तक्रार देताय, महामहिम राज्यपालांकडे जाताय..या देशात मोदी नावाचा कायदा आलाय का? त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार राज्यपाल महोदयांकडे देण्यात आले आहेत का? मोदी कायदा आला असेल आणि अंमलबजावणीचे अधिकार हे राज्यपाल यांच्याकडे असेल तर त्याची माहिती द्यावी अशी मागणी करतानाच मला बोलण्याचा अधिकार आहे आणि मी बोलणारच असा स्पष्ट शब्दात त्यांनी विरोधकांना फटकारलं आहे.  

भाजपाकडून सरकारवर आणि वैयक्तिक वारंवार होणाऱ्या टिकेला आज नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिलेच शिवाय येणाऱ्या काळात भाजपाच्या कारनाम्यांचा भांडाफोड करणार असल्याचं ते म्हणाले. आजच्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी भाजपच्या माजी आमदाराने रेमडेसिवीरचा केलेला काळाबाजार याची माहिती माध्यमांसमोर पुराव्यानिशी मांडली. याचवेळी काही कागदपत्रे आणि व्हिडिओ माध्यमांना दिले.या देशात कोरोनाचे आकडे वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर मात्र रेमडेसिवीर मिळत नाही असे चित्र निर्माण झाले. त्याचकाळात भाजपाच्या सुरत येथील कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत असल्याच्या प्रकरणावर आम्ही बोट ठेवले. मात्र गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी रेमडेसिवीर वाटप करण्यास किंवा साठा करण्यास परवानगी दिली नसल्याचा स्पष्ट खुलासा केला होता. त्यादिवसापासून भाजपाचे काही नेते ५० हजार रेमडेसिवीर आणून देऊ असा दावा करत होते असं मलिकांनी सांगितले.

त्याचसोबत माझ्याकडे बोट दाखवत असताना क्रिस्टल कंपनीच्या मालकाला सांगू इच्छितो की, तुमचा कारभार किती क्रिस्टल आहे याचा भांडाफोड आज ना उद्या करणारच, भतीजाचा भाग किती कुणी खाल्ला हेही समोर आणणार आहे. कांदिवली - मालाडचे जे आमदार आहेत ते कुठे रात्री बसतात, दुपारी कुठे बसतात. त्यांच्याजवळचे लोक ईडीमार्फत तुरुंगात आहेत. त्यांच्याकडून काय काय घेतलंय. किती देवाणघेवाण झाली याची माहितीही येणाऱ्या काळात सांगू असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी आमदार प्रसाद लाड आणि अतुल भातखळकर यांना दिला आहे.

दरम्यान नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्हयात काळाबाजार सुरू आहे त्याची संपूर्ण माहिती, फोटो आणि व्हिडिओ देत असून नंदुरबारमध्ये कारवाई सुरू झालीय. इतर दोषींवर कारवाई होईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. राज्यात २ लाख ७० हजार कोरोनाची आकडेवारी वाढत आहे त्यामुळे चिंता निर्माण करणारी परिस्थिती आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशात, राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झालेला आहे. ही सत्य परिस्थिती आहे असे असताना भाजपच्या काही लोकांना राजकारणाशिवाय काही करता येत नाही ही वस्तूस्थिती आहे. गेल्या पाच दिवसात भाजपाने सरकार कामच करत नाही, रेमडेसिवीर उपलब्ध करुन देत नसल्याचा प्रचार केला आहे परंतु सत्यपरिस्थिती वेगळी असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकPrasad Ladप्रसाद लाडAtul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस