शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी की उद्धव ठाकरे? महाराष्ट्र कुणाच्या कामगिरीवर अधिक समाधानी, जनतेने दिला असा कौल

By बाळकृष्ण परब | Updated: January 15, 2021 22:43 IST

Maharashtr News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारगिरीच्या जनतेने केलेल्या मूल्यमापनामधून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.

मुंबई - केंद्र सरकार आणि विविध राज्यांमधील सरकारांच्या कोरोनाकाळातील तसेच एकंदरीत कामगिरीबाबत जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेमधून जनतेचा कल समोर आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारगिरीच्या जनतेने केलेल्या मूल्यमापनामधून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.

एबीपी न्यूज आणि सीव्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यामध्ये सरासरी ५८ टक्के लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर समाधानी दिसून आले. तर राज्यातील सरासरी ४७ टक्के लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर समाधानी दिसून आले. दरम्यान, देशव्यापी विचार केल्यास देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीवर ६६ टक्के जनतेने समाधान व्यक्त केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर किती समाधानी आहात अशा विचारण्यात आलेल्या प्रश्नाला  ४६ टक्के लोकांनी खूप समाधानी, ३२ टक्के लोकांनी समाधानी, २० टक्के लोकांनी असमाधानी असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे सरासरी ५८ टक्के लोक सरकारच्या कामगिरीवर समाधानी दिसून आले. 

तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीचा विचार केल्यास ४८ टक्के लोक खूप समाधानी, २५ टक्के लोक समाधानी, तर २६ टक्के लोक असमाधानी असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यातील सरासरी ४७ टक्के लोक पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे दिसून आले.   

दरम्यान,देशात सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या स्थानी आहेत. या यादीत ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या कारभारावर ७९ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्या (७८ टक्के), आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी तिसऱ्या (६७ टक्के) स्थानी आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर ५८ टक्के लोक संतुष्ट आहेत. विशेष म्हणजे पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण