शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

नाना पटोलेच प्रदेशाध्यक्षपदी; काँग्रेसमध्ये माेठे फेरबदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 08:36 IST

Congress News : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील संघटनेत मोठे फेरबदल केले असून प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा नाना पटोले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

नवी दिल्ली/मुंबई :  काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील संघटनेत मोठे फेरबदल केले असून प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा नाना पटोले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पटोले यांच्या सोबतीला सहा कार्यकारी अध्यक्षही नेमण्यात आले असून त्यात ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरिफ नसीम खान, कुणाल रोहिदास पाटील, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. तसेच संसदीय मंडळात ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करतानाच प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीचीही पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार या कार्यकारिणीत सहा कार्यकारी अध्यक्ष, १० उपाध्यक्ष व ३७ सदस्य असतील. पण सरचिटणीस, सचिवांची नियुक्ती तूर्त करण्यात आलेली नाही. स्थानिक स्तरावरील निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी १९ सदस्यांची समिती, स्क्रीनिंग व समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रदेशाध्यक्षांसह नव्या पदाधिकाऱ्यांची नावे शुक्रवारी जाहीर केली. नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड जवळपास निश्चित होती. फक्त घोषणेची औपचारिकता बाकी होती. ती शुक्रवारी पूर्ण करण्यात आली.  आक्रमक नेते अशी पटोले यांनी ओळख आहे. शिवाय ते विदर्भातील आहेत. पटोले यांच्या निवडीमुळे पक्षात चैतन्य येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.  संघटनात्मक फेरबदल करताना कार्यकारी अध्यक्ष पदावर यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम या दोन मंत्र्यांच्या जागी प्रणिती शिंदे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांची निवड करण्यात आली आहे.  प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न १० उपाध्यक्ष आणि ३७ सदस्य  प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीचीही पुनर्रचना   स्थानिक निवडणुकांंच्या रणनीतीसाठी समितीउपाध्यक्ष शिरीष मधुकरराव चौधरी, रमेश बागवे, मोहन जोशी, हुसेन दलवाई, रणजीत कांबळे, कैलास गोरंट्याल, भाई नगराळे, शरद आहेर, एम. एम. शेख, माणिकराव जगताप. यामुळे पटोले यांच्या निवडीला झाला उशीर   दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये आलेल्या पटोलेंची  प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली तर जुन्याजाणत्या नेत्यांवर अन्याय होईल, अशी भावना असल्याने व तसे पक्षश्रेष्ठींना सांगितले गेल्याने पटोले यांच्या निवडीस उशीर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.  पटोलेंची निवड झाल्यास काँग्रेसमध्ये फूट पडेल, असेही बुजूर्गांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. कार्यकारी अध्यक्षांकडे विदर्भ, कोकण, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आदी प्रांतांची जबाबदारी दिली जाईल. मंडळात ज्येष्ठ नेत्यांचा समावेशसंसदीय मंडळात बाळासाहेब थोरात, शरद रणपिसे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, शिवराज पाटील, मुकुल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव, अविनाश पांडे, मिलिंद देवरा, विलास मुत्तेमवार, माणिकराव ठाकरे, भाई जगताप, के. सी. पाडवी, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, सुनील केदार, असलम शेख, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, विश्वजीत कदम, सतेज पाटील, वसंत पुरके, सुरेश (बाळू) धानोरकर, रणजीत कांबळे, सुरेश शेट्टी, हुसेन दलवाई, अनंत गाडगीळ, बाबा सिद्दिकी, आशिष देशमुख, डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुजफ्फर हुसेन, मोहन जोशी या वरिष्ठ नेत्यांचा समावेश केला आहे.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसPoliticsराजकारण