शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

“ही जनआशीर्वाद नाही तर जन छळवणूक यात्रा”; शिवसेनेचा भाजपला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 15:35 IST

शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून, ही जनआशीर्वाद नाही तर जन छळवणूक यात्रा असल्याचा टोला लगावण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या काळातील जनआशीर्वाद यात्रेत जनता त्यांना आशीर्वाद देणार नाही मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले. ही विरोधकांना जबरदस्त चपराक आहेआम्हाला कुणी टार्गेट केले तरी काही फरक पडत नाही

मुंबई: केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेते राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. केंद्र सरकारचे चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवितानाच राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्र सोडणे, अशी या यात्रेची दुहेरी रणनीती असेल, असे सांगितले जात आहे. यापैकी तीन नेत्यांनी आपल्या जनआशीर्वाद यात्रांना सुरुवात केली असून, केंद्रीयमंत्री नारायण राणे दादरमधील शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन अभिवादन करून १९ ऑगस्ट रोजी जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून, ही जनआशीर्वाद नाही तर जन छळवणूक यात्रा असल्याचा टोला लगावण्यात आला आहे. (mumbai mayor kishori pednekar criticised bjp over jan ashirwad yatra)

TATA ग्रुप आता ‘ही’ सरकारी कंपनी खरेदी करण्यास इच्छुक; केंद्राने दिली तत्त्वतः मंजुरी!

मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले. ही विरोधकांना जबरदस्त चपराक आहे. काम केले म्हणून ते नंबर पाचमध्ये आले. विरोधकांचे मीठ आळणीच राहिले आहे. मातोश्रीने करून दाखवले. त्यामुळे मातोश्री टार्गेट राहणारच, पण विरोधकांनी मातोश्रीकडे लक्ष न देता, लसीकरणाकडे द्यावे. तसेही आम्हाला कुणी टार्गेट केले तरी काही फरक पडत नाही, असा टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. तसेच भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवरही त्यांनी टीका केली आहे.

धक्कादायक! देशात Covishield च्या बनावट लसी सापडल्या; WHO ने दिला गंभीर इशारा

ही तर ‘जन छळवणूक यात्रा’

कोरोनाच्या काळात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. पण जनता त्यांना आशीर्वाद देणार नाही. जनताच भाजपला त्रासली आहे. त्यामुळे जन आशीर्वाद मिळणार नाहीत. ही कसली जन आशीर्वाद यात्रा? ही तर जन छळवणूक यात्रा आहे, या शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या या यात्रेची खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रातील मंदिरे उघडी करण्यात आलेली नाही. राज्याबाहेरची मंदिरे उघडी आहेत. तिथे काळजी घेतली जातेय. पण मंदिरे उघडण्यापेक्षा विरोधकांनी दिल्लीतून व्हॅक्सिन आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा चिमटाही पेडणेकर यांनी काढला. त्या टीव्ही९ शी बोलत होत्या.

“मला तुझी एक गोष्ट पटली नाही”; ऑलिम्पिक पदक विजेत्या रवीवर PM मोदी नाराज!

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे ७ दिवस चालणाऱ्या जनआशीर्वाद यात्रेत एकूण १७० हून अधिक भागांना भेट देणार आहेत. दिल्लीतील भाजप नेतृत्वाने नारायण राणेंकडे कोकण आणि मुंबईची जबाबदारी दिली असून, मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी होत असल्याने मिशन ११४ ची जबाबदारी दिली आहे. मुंबई महापालिकेत ११४ जागा किंवा त्याहून अधिक जागा निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली असून, कोणत्याही परिस्थितीत हे मिशन यशस्वी करा, असे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंकडे मिशन देण्यात आले असून, महापालिका निवडणुकीत शिवसेनेविरोधात राणेंच्या ताकदीचा पुरेपूर वापर करून घेण्याचे भाजपने ठरवल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणKishori Pednekarकिशोरी पेडणेकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMumbaiमुंबई