शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

"तर राज्यात कोरोनामुळे झालेले ३० हजारांहून अधिक मृत्यू टाळता आले असते"

By बाळकृष्ण परब | Updated: March 2, 2021 14:51 IST

Devendra Fadnvis Criticize Maharashtra Government : राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. 

 मुंबई - गेल्या वर्षभरापासून देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गाचे संकट अद्याप टळलेले नाही. (Coronavirus in Maharashtra)या वर्षभरात कोरोनामुळे महाराष्ट्रातही बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनाबळींमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. (More than 30,000 deaths due to corona could have been prevented in the state, Devendra Fadnvis Criticize Maharashtra Government )

आज विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर सुरू असलेल्या चर्चेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाकाळातील राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहासमोर आकडेवारी मांडत राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. फडणवीस म्हणाले की, सातत्याने कमी चाचण्या केल्याने राज्यातील कोरोना वाढला आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती आजही गंभीर आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचा प्रश्न नीट हाताळला असता तर ९ लाख ५५ हजार रुग्ण कमी राहिले असते. तसेच ३० हजार ९०० मृत्यू कमी झाले असते. आता ही जबाबदारी कुणाची? केंद्र सरकारचा आर्थिक पाहणीचा अहवाल अतिशय बोलका आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.   

फडणवीस पुढे म्हणाले की, ठाकरे सरकारला कोरोना हाताळण्यात अपयश आल्याचा दावा फडणवीस यांनी आकडेवारीसह केला. 'देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ९ टक्के लोकसंख्या आपल्या राज्यात आहे. पण देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूंपैकी ३३ टक्के एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ४० टक्के कोरोना रुग्ण राज्यात आहेत. सक्रिय रुग्णांची संख्यादेखील मोठी आहे. सध्या राज्यात ४६ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत,' अशी आकडेवारी फडणवीस यांनी विधानसभेत सांगितली.

कोरोनाकाळातील भ्रष्टाचारावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कोरोना काळात जम्बो कोविड सेंटरच्या माध्यमातून राज्यात जम्बो भ्रष्टाचार झाला. मृताच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणजे काय याचा अर्थ या सरकारने समजावून सांगितला, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरे